न£8006 ४५४७5 २८१९1६०
(|॥५॥४/८॥२5७/१|_ (_|3२,र
0) 192585
/ ४०६] ॥४5७0/॥५)
017--881--5-8-74--15.000 0५१1411. या ०1२७171२₹ 1.1017१,17र्रर
(1) ४०. ह९९66५1071 1४७०. ओली, पकी ७॥०:-९ "१
» नत 2&" १-- रची. ७ 2 त १९०७७ दीळ । बजिरुच्ता त
गृ॥18 ७660 ५०] ७७ “(3 (711 6 ॥1)णछिल एत. त्ता 18० 115711:00. 960160".
च्छ
गृ1]८
पेश्षवाईताल
कमससंयाम
ट्र भड शः | ्ि - 11111. | री ) पय धर “) ९. ह क र र गाड टचे लेखक
विठठल वामन हडप
र
५)
र > भो र वो ड्न्श डू हव्य श्र १५), पी श्र
कै «५००००४९५४० (३ ७» हि,”
किंमत पर
प्रकाशक बळवंत विष्णु परचुरे पर'चुरे, पुरामिक आणि मंठळी, बुकसेलर्स व पब्लिशर्स, माथवबाग, मुंबई नं. ४. 1 ञ ळू
“कादंबरीमय पेशवाईचे पुनमुद्रण, भाषांतर, रूपांतर वगरेसंबंधीं सर्व प्रकारचे हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत.]
खर क्र ह. मुद्रक अनंत सखाराम गोखले “वि'जय' प्रेस, ५७० शनवार, पुणें.
प्रास्ताविक
क्ल -__4$*क्े७-
गृणााड 7608116016 816026 ( वसईचा वेढा) (॥6 ॥0॥0& १1207/0प8 6ए९' ०४6०१66 07 1181'8888.
-ण(ज/०1८ र्यी. >< > > व
गू'))6 81686 (वसईचा वेढा ) 88 087016१ 00. जाणा हठ 8३'७0एता ताळा शांटण्यपा, हा) छत. ७67568ए600'1106, 8७ ए७"॥७]७ ७७88 118४6 11 710 00016 1788116086 ताह- १(:१॥-१॥ -ण/47१8807. >< > >< स्ुरठयांच्या इतिहासामध्ये अतुल पराक्रम, अचाट साहस, अलोकिक तेज अद्वितीय रणात्साहू व अपार स्वानिसान हे गुण व्यक्त करणारे जे कांददी युद्धप्रसेंग आहेव, त्यांमध्यें वसईचा रणसंप्राम द्वा अप्रस्थानीं गणण्यासारखा आहे यांत शका नाहीं. फिरंगी लोकांन हिंपथमीचा व हिर प्रजेचा अत्यंत छळ केला, म्हणून संतस झालेले निस्सोम स्वथरमांनिमानी महदाराष्ट्रवीर एकत्र होऊन टढ निश्वयानें शत्रूस जिक्ण्याकरितां वसईवर चढाई कचन गेळे; व तेथें मोठया आवेशानें तीन महिनेपर्यंत सतत अभिंगोलांचा भयंकर वषीव होत असतांदी वेढा देऊन बसले; आणि अखेर आपल्या बाहुबलानें शत्रूस पादाकान्त करून वसईवर आपला स्वधर्मसंरक्षणाचा बाणा दाखविणारा भगवा झेंडा फडकविण्यास समर्थ झाले; तो वोररसाने ओतप्रोत भरलेला वृत्तान्त ऐकून ज्याचें अतःकरण आनंदाने व कोतुकानें थक होणार नाहीं असा मतुग्य विरळा. --के० पारसनीस. > >< ><
“पेशवांईतीळ धघमेसंत्राम' दी 'कादंबरीमय पेशताई' माठेंतील दद्दावी कादंबरी आज महाराष्ट्र-सरस्रतीच्या चरणीं अ्पग करण्यांत येत आहे. के० पारसनीस यांच्या पूवॉक शिरोलिखिनांवीह., एराग्रे.] एका 'कदिवरीची रूपरेखा
1
स्थूलतः पण यथार्थतेनें प्रतिबिम्षित झाली असल्यानें तिचे येथें पुनर्दिंग्दर्शन करणें नलगे.
ह्या कथानकाच्या ऐतिहासिक भूमिकेचे विशदीकरण कथानकाच्या ओघाने व जागजागी निर्णयात्मक टिप्पणी देऊन करण्यांत आलेंच आहे; पण कथानकात बर्णिलेल्या कांहीं प्रसंगांचें व पात्रांचे ओचित्य काय हें येथें थोडक्यांत सांगणें अशक्य आहे.
ह्या कादंबरॉंत वर्णिलेल्या चिमाजीअप्पा, बाजीराव, मानाजी आंग्रे, शंकराजी नारायण फडके, खंडूजी माणकर, गंगाजीनाईक अणज्रकर वगेरे नाईकबंधु, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, :भजी मोरे, अंताजी व रामचंद्र रघुनाथ कावळे, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, रामाजी महादेव बिवलकर, सेनापाति पेरीरा, सेनापाते पेड़ो डि मेलो, सेनापाति अंटोनिओ कार्डिम फ्रो, आल्काकोव्हा, लुई खुथेलो वगेरे भूमिका ऐतिहासिक आहेत याविषयीं बहुशः जागोजागी कथा- नकांत टिप्पणी देऊन प्रमाणें देण्यांत आलीं आहेतच. भगवानजी, भरव, अंताजी ऊफ अँटोनिओ, फ्रॅरिसस, रॉबर्टसन, फादर पोर्टो, डोमिंगो, सिद्धेधरशास्त्री, थोडशास्त्री, भय्याशास्त्री, सोफिया, पोरशिया, मेरी, बार्बारा, मार्गारेट, कॉन्स्टन्स चगैरे कांहीं काल्पनिक भूमिकांची पूर्वोक्त ऐतेह्यासिक भूमिकांना जोड देऊन कथानकाची रचना करण्यांत आली आहे. रामानंद ही भूमिकाही काल्पानिेकच आहे; ती भूमिक्रा रंगविणारी व्यक्ति मात्र खरीखुरी आहे.
असें जरी आहे, तरी काल्पनिक भूमिक्रांची जोड कथानकाला देऊनही शोतिह्मापिक वास्तवतेचा कोठेंद्दी भग न होईल अशी शक्य तितकी खबरदारी घेण्यांत आली आहे. शिवाय काल्पनिक भूमिका रंगवितांनाहवी पूर्ण औचित्य राखण्यांत आलें आहे. इतिहासावरून तत्कालीन परिस्थितीचा मनाला जो बोषं होतो, तो कथानकांत यथावत दर्शविण्यासाठी अश्या काल्पनिक्र पात्रांची आवश्य. कता असतेच, व अशीं पात्रें दिमतीला घेण्याची कादुंबरीकाराला पूर्ण मुभाही असते. असें असतांही काल्पनिक भामेका रंगवितांना मीं इतको खबरदारी घेतली आहे की, तत्कालीन इतिहासाचे सामाजिक-धार्मेक-राजक्रीय अशा सवीगांनीं निरीक्षण करणाऱ्या नेरीक्षकांनादी त्याच नांवाची नाहींत तरी त्या इष्टा- रने र्वभावधर्माचीं माणसें त्याकाळी तितक्याच प्रामुख्यानें समाजांत वावरत असलीं पाहिजेत हें सामान्यतः मान्य करावें लागेल.
ष्
त्याप्रमाणेच कादंबरत वर्णिलेल्या प्रसंगांचेंही, चुळणें व निमळ येथील शुद्धी- करणाचे प्रसंग, मंडपेश्वर येथील युद्धप्रसंग, असे कांह प्रसंग काल्पनिक असले तरी उपलब्ध ऐतिह्यासिक़ साथनांवरून तसे प्रसंग त्या ठिकाणीं अथवा अन्यत्र त्या काळीं घडले असण्याचा बराच संभव आहे. थोडाफार फरक असेल तो तप- शिलांत; पण इतिह्वासानें मान्यता दिलेली संभवनीयता म्हणजे इतिदह्वासाचे-निदान लत्कालीन लोकस्थिताचें प्रतिबिम्बच होय असें मान्य करण्याला कोणा'चा प्रत्यवाय असणार नाहीं असें मला वाटतें.
मात्र प्रस्तुत कादंवरींतील शुद्धीकरणाच्या प्रसंगांविषयी-कथानकांत जागोजागी निर्णयात्मक टिप्पणी दिल्या असतांही-येथें दोन शब्द सांगणें अवशय आहे. ह्या प्रसंगांशीं सध्यांच्या शाद्वेसंघटणाच्या चळवळीचा संबंध जोडून त्यांची ऐतिह्यासिक- दृष्ट्या अवास्तवता सिद्ध करण्याचें मनावर ध्यावॅसें कोणा टीकाकाराला वाटल्याछ त्यानें टीकास्त्र उचलण्यापूर्वी वसई-साष्टी प्रांतांतील तत्कालीन खिस्ती धर्स- प्रसाराचा भडक इतिहास सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करावा, म्हणजे वसईच्या वद्या- च्या पूर्वी-पोतुंगीजांची अस्मानी सुलतानी तेथे गाजत हाती तेव्हांद्दी-साधारणतः पोतुभीज अत्याचारांना त्या प्रांती प्रारंभ झाल्यापासून ख्रिस्ती धर्मप्रसाराबरोबरच कियेची प्रतिक्रिया या न्यायानें शुद्धिसंघटणाची चळवळ तितक्याच जोमाने सुरू दवीती व ती जशास तसें या न्यायानें प्रस्तुत कादंबरीत वार्णल्याप्रमाणेंच सुरू होती, असें आढळून येईल. इतकेंच काय, पण तेव्हांचें शुद्धीकरण सभ्यांपेक्षांदी जास्त सुलभतेनें व जास्त जोमाने चाले. हिंदुजनांच्य़ा नाजुक धार्गिक भावनांचा फायदा! घेऊन ख्रिस्ती मिशनरी हिंदूंच्या विहिरीत भाकरीचे किंवा मांसाचे तुकडे टाकून हिंदुंचे गांवचे गांव बाटवून सोडीत; त्या भ्रष्टीकरणाळा आळा घालण्यासाठी तत्कालीन जाणत्या ब्राह्मणांनी तीर्थत्नानासारख्या अत्यंत सो'या विधीने शुद्दीकरणा- ची मोद्दीम यशस्वितेनें चालविली. ही त्यांची कल्पकता आज शुद्धिसंधघटण करणा- ऱ्या हिं धर्माभिमान्यांनी अवश्य धडा घेण्यासारखी आहे. प्रसंग पडला कीं उपाय सुचतो हे कांहीं खोटे नाही. ही शुद्धीकरणाची कल्पकता वसई-साषी प्रांतांतील ब्राह्मणांनाच सुचली होती असें नाहीं; अशीच, किंबहुना याहीपेक्षा कुतूहल जनक अशी एक असामान्य कल्पक्रतेची गोष्ट शीखांच्या इतिह्वासांतही नमूद आहे. रणजितथिंगाचा एक सेनापाति हवारोदिंग लळवा हा अफगाणिस्तान जिकण्याला गेला होता. शीख लोकांना गोमांस वर्ज असून डुकराचें मांस प्रिय असतें ह मदशर
द
आहेच. हरिसिंगाची फोज अफगाणिस्तानच्या मोहिमेवर असतांना प्रसंगोपात्त अफगाण लोकांनीं शिजविलेले अन्न लुटून आणुन त्यावर आपला निर्वाह करीत असे. शीख लोक गोमांस खात नाहींत असें अफगाणांना स्रमजतांच अफगाणां- नीं मुद्दाम पुष्कळ गाई मारून त्यांचें मांस शिजवून तयार ठेविलें. पुढे तें लुटण्या- का शीख लोक आले तेव्हां त्यांना तें गोमांस आहे. असें कळलें. त्याबरोबर हरिसिंगानें एक डुकराचे हाड मिळवून तें त्या मांसान्नांत घाळून सर्व मांस खूप ढवळिले, आणि 'वाः ! गुरुजीका खालसा ! “वा: ! गुरुजीका फत्ते! असा आपला संत्र म्हणून 'ह डुकराचे मांस आहे; सवोनी खुशाल खा' असें आपल्या शिपायांना सांगितलें. शिपायांनींही ते मांस डुकराचें आहे असें समजून निःरेक- पणे सेवन केळे. तात्पर्य, बचावाच्या वेळीं जशास तसें वर्तन ठेवल्याशिवाय गत्यंतर नसते, व असे वर्तन ठेवील तोच आणीबाणीच्या वेळीं बचावतो.
आतां, वसई-साष्टरी प्रांतांतील शुद्धिसंघटणाच्या चळवळीला पेशव्यांचे साह्य होते किंवा नाहो. अशी कांहाजण कदाचित शंक्रा घेतील. ल्या चळवळोला पेशव्यांनी प्रत्यक्ष प्रोत्साहन दिल्याची उदाहरणे जरी इतिहासांत उपलब्ध नाहींत, तरी विरोध केल्याचोंही उदाहरणे उपलब्ध नाहोंत. उलटपक्षीं पेशवाई अमलांतील कांहीं उदाहरणे अशी दाखवितां येतील कॉ, ज्यांवरून पेशवे ह्या शुद्धीकरणाच्या म्वळवळीला अनुकूल होते असाच स्पष्ट निष्कर्ष निघतो. त्याप्रमाणेंच त्राह्मणांतीळ पोटजातिभेद व ब्राह्मणेतर जातींचे घर्माधिकार ह्या बाबतीतही पेशव्यांचे धोरण सर्रास उदारपणाचें व प्रगमनशीलतेचं हात याविषयांही कोणाला शंका घेण्याचें फारसे कारण नाहीं. शेवटच्या बाजिरावाच्या कारकीर्दीतील सर्वेच बजबजपुरी सोडली तर बाजीराव, नानासाहेब, माधवराव, सवाईमाधवराव व रघुनाथराव ह्या पेशव्यांच्या कारकोदोत पेशव्यांच्या धर्मवेषयक प्रगमनशीलतेचे पुरावे कांहीं थोडेथोडके नाहींत. शिवाजीमहाराजांपासूनचा काळ घेतला तरीदेखील मराठशाहीच्या राज्यकत्यांची धर्मवेषयक प्रगमनश्ीलता ठळकपणे दिपून येत. ह्या गोष्टी येथे विस्तारशः निवेदन करण्याला स्थलळावकाश नाहीं, त्याला नाइलाज आहे. ज्यांना याचें स्थूलतः प्रत्यंतर पहावयाचे असेल त्यांनीं क॑ न्यायमूर्ते रानडे यांच्या "४1856 ०. ॥॥2 एशक्षा08 17?0॥6” ह्या ग्रंथांतील रिशिषांतील के? न्यायमुर्ते तेलंग यांचा “0126010128 ता ४क७- ४७७ 0110010166 हा निबंध पहावा.
२9
आतां, वसई येथे विजय प्रास झाल्यावर पेशव्यांनीं त्या अनुभवापासून घ्यावयाचा तो धडा घेतला कीं नाहीं याचा विचार करूं लागल्यास त्याचें उत्तर उघड उघड' नकारात्मक्रच' द्यावें लागेल, विश्षेषतः पेशव्यांनीं आंग्म्यांच्या दौलतीवर निखारा ठेवण्याची चूक केल्यासुळें आरमारी सामर्थ्यांच्या द्टीने महाराष्ट्र्वराज्य ज॑ अगदींच दुबळे झालें, ती चूक वस्र एथे नवें जंगी आरमार स्थापून पेशव्यांना सहज सुधारतां आली असती. अनायासे वसई-साष्टो प्रांती असलेले पोर्तुगीजांचे जह्याजांचे व युद्धोपयोगी साहिःयाचे अतेकर कारखाने पेशव्यांच्या हाती. आले होते. सुधारलेल्या युद्धोपयोगी साहित्याचे महत्त्वही वसईच्या लटाईत पेशक्य़ांच्या चांगलेंच निदर्शनाला आलें होते. पण त्या अनुभवाचा पेशव्यांनीं यत्किंचित देखील उपयोग करून घेतला नाहो व केवळ मुलुखागेरीवर भिस्त ठेवून मराठी साम्राज्याचा विस्तार त्यांनीं आरंभिला, म्हणूनच तो त्यांचा उद्योग परिणामी हळुहळू अंतर्गत अव्यवस्थेच्या बुजबुजाटा- "वा फाफटपसारा ठरला. पण या चिकित्सक टीने पेशवाई-कारभारांचें समालोचन करण्याचें हें स्थळ नसल्यानें त्या बाबतींत मुग्ध राहणेंच श्रेयस्कर होय.
प्रस्तुत कादंबरीविषयी प्रसिद्धपर्णे कागदोपत्री अनुपलब्ध अशी कांहीं महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या कामी मठा अणजूरकर गंगाजी नाइकांचे वंशज श्री० दिवाकर भाई नाईक याचें बरेंच साह्य झालें आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
“कादंबरीमय पशवाई'मधील आजवरच्या नऊ कार्दंअऱ्यांतून बाळाजी विश्व नाथ पेशवे व थोरले बाजोराव पेशवे यांच्या कारकोरदीतील पेशवाई मराठशर्ह्राच्या उत्कर्षाचा वृ ताऱ्त निरनिराऱ्या प्रसंगांच्य़ा अतुरोधानें नित्रेदन करण्यांत आला. एकट्या बाजिरावांच्या कारकोदोंवर्च आजवर 'पेशवाईचा पुनर्जन्म, “पेशवाईतील पुनर्वभव', "पेशवाईचा दरारा', 'पेशवाईलील दुर्जव', “पेशवाई तील पश्चिमादिग्विजय', व 'पेशवाईतील धर्मपंप्राम' अशा सहा कादंबऱ्या विरचिल्या गेल्या. पण बाजिरावांनी आप्या कारकोदात दिढोच्य़ा बाद: शह्वातीला हह देऊन मराठशाहीची सर्भेतोपरी प्रतिष्ठा वाढविण्याचा जो उच्योग आमरणान्त केला, तीच त्यांची अत्यंत भरीव अशी कामागेरी होय. व्या कामागीरांचें स्वरूप, त्याप्रमाणेंच राजकारणांत व मत्तानांच्प़ा खासगी बाबनीत-
टॅ
ही बाजिरावांना दरबारी प्रतिस्पध्यांकडून व धर्मठ आस्तपरांकडून जो जाच सोसावा लागला व ज्या जाचाला बाजिरावांच्या अकाल निधनाबद्दल बव्हंशी जबाबदार धरतां येईल, त्या जाचाचें स्वरूप वाचकांना यथावत पटवून देणारी
"पेशवाईतील उत्तरदिग्बिजय'
ही बाजीराव पशव्यांच्या कारकीदीवरील अखेरव्वी व 'कादंबरीमय पेशवाई'मधील अकरावी कादंडरी पुढे यथानियम प्रसिद्ध होईल एवढें सांगून वाचकांची तूर्त रजा घेतो.
व्यंकटपुरा, सातारा. र ता. १०॥६॥१९३०, | ववठ्ठल बामन हडप
म्य ७
शवाईतील धससंग्राम
> ष् र
क पर यातर चका डम लयाकाकनकळ
विषयप्रवेदा
छुस्त कदा नेहर्माच वर्षांच्या सहाही त्रतूंत अत्यंत उत्साद्दजनक व आनंद: कारक असतो, यांत सांगण्यासारखे नवल कांहींच नाही; पण इ० सन १७२३९,
सालांतील वसंत त्तु वसई-साष्री भागांतील रयतेला विशेष उत्साहजनक व आनंदकारक आणि नवजीवनदायी वाटत होता. याचें कारण दोन अडीच शतकां- पूर्वीपासून पोतुभीजांच्या अमानुष जुलमी अमलाचें ग्रहण जें कॉकणपट्टीच्या त्या भागाला लागलें ह्वोते, तें सुटण्याचा ऐन रंग आतां बहुश: प्राप्त झाला होता. बाजीराव पेशवे व छत्रपाते शाहूमहाराज यांच्या वतीने बाजीराव पेशव्यांचे परम प्रतापी कनिष्ठ बंधु श्रीमंत चिमाजीअ'पा पेशवे यांनीं वसई-साष्टी भागांतील पोतुंगीलांच्या जुलुमाविषयीचीं तेथल्या 9जेची गाऱ्हाणी मनावर घेऊन अश्या जुलमी पोठुंगीजांचा नायनाटच केला पाहिजे अशा निर्धाराने वसई साष्टी प्रांती येऊन पोतुगीजांशीं जो धर्मसंप्राम मांडला होता, त्याला आतां साधारणतः तान वर्षांचा काळ लोटला होता.% एवढ्या काळांत उभय पक्षांची अनेक निकराची युद्धे
--:<->>> न
७ ८० ७
* वसईच्या मोहिमेचा कार्यकारणभाव शाधावयाचा तर प्रत्यक्ष मोहिमेच्या काळाच्याही मार्गे जाणें अवशय आहे. पोतुंथीज लोकांनीं वसई प्रांतांत पदापण केलें तेव्हांच वस्तुतः धर्मच्छल सुरू केला. पण त्या छळाचा बोभाटा छत्रपतॉंच्या कानीं व्यवस्थितपणे गेला असा प्रथम छत्रपाते संभाजीमह्ाराजांच्या कारकीदीत; व तो बोभाटा गंगाजी नाईक अणजूरकर यांनीं नेला. पण संभाजीमहाराजांच्या कारकीर्दीत व पद्वात् मराठशाह्वीची सर्वच घडी विस्काळेत झाल्यानें त्या बोभाट्या- '्वा कांहीं उपयोग झाला नाहीं. पुढें इ* सन १७२२ मध्यें गंगाजी नाईक वृ इतर क्षत्रिय-प्रभु मेडळीनें पुन्हा शाहूमहारा ज, बाजीराव पेशवे व चिमाजीअप्पा यांजपार्णी फिर्याद नेली; त्याप्रमाणेच मालाडकर सरदेसाई बंघुद्दय अंताजी व रामचंद्र रघुनाथ कावळे यांनीही तशीच फिर्याद पेशब्यांपा्शी नेली; व त्यांना
च €6* « १० पेशवाईतील धमेसंप्राम होऊन त्या युद्धांत बहुश: प्रत्येक वेळो मराठ्यांनाच विजयश्रोने माळ घातली होती व पोतुंगोजांना ठिकाठिकाणची ठाणीं हातची सोडून व वर आणखी अनेक्र सनिकांच्या, सेनापतांच्या रक्ताचे आणि अपार युद्धसाहित्याचें उदक मराठ्यांच्या हातावर सोडून तेथून पळ काढावा लागला होता
पोतुगीजांच्या अत्याचारांचा हृदयद्रावक वत्तान्त निवेदन केला. तरोही पेशव्यां- ना इतर मद्दत्वाच्या राजक्षीय भानगडो मिटवितां मिटावेतां पुढे बरीच वर्षेपर्यंत वसइकडील राजकारणांत पूर्णपणे मन घालण्याला अवसर सांपडला नाहो पुढें कृष्णराव महादेव जोशो हा बाजिरावांचा मेहुणा इ० सन १७३० मध्ये कल्याण- चा सुभेदार झाल्यापासून त्यान गगाजी नाईक, अंताजी रघुनाथ प्रभरतांच्या साह्याने त्या भागांतील लाकांचो गाऱ्हाणी भागाविण्यालळा सुरुवात केलो होती. पुढे थोड्याच दिवसांत काकणपटद्टीत सिहोने थेमान मांडल, तेव्हां त्याच्या पारिपत्याचा प्रश्न तांतडीने हातीं घेणे पेशव्यांना भाग पडले (पेशवाईतील पाश्चर्मादाग्विजय' पहा ) त्या वळी वविमाजोअप्पांना पोतुगाजांच्या अत्याचारांची यथावत कल्पना आलो व त्यांना बाजोराव पशाव्यांच्या सल्याने पार्तुगोजांचे पारेपत्य करण्याचे काय इ० सन १७३७ च्या उन्हा यांत हाती. घतले शेकराजापंत फडके, गगाजी नाईक, विठ्ठल शिवदेव, रामाजी मह्ादेव, खड्जी माणकर. अताजी रघुनाथ, रामचद्र हारे पटवधत, नारायण जोशो, मोरोजो शिदे, विमणाजो व बाजी भीवराव, कृष्णराव जाशो वगर मडळो प्रारंभापासून चिमाजो- अ'पांसह फिरंग्यांशी लढत हातो. माहमेच्या पाहूज्याच सपाट्यांत ठाण्याचा किल्ला ता. १७1३1१७२३७ रोजीं मराठ्यांनो काबोज करून साष्टीत प्रवेश केला. लगेच थोड्याफार कालानें त्याच पाहेल्या सपाठ्याला मराठ्यांनो अनाळा, मांडवी, लांदळवाडी, टकमक, वेसावे, काळरर्ग, मनोर, बेलापूर इतको ठाणीं पाहून्याच वषा कावोज केला. पजन्यकाळ येतांच चिमाजो अप्पा आपल्या शूर सरदारांवर मोहिमेचे काम विसंग्न माघारे पुण्याला गेल तों माघारीं शत्रूने पुन्ह्यम उचल खाळो. चिमाजी- अप्पा व बार्जाराव हे निजामाचे पारेपत्य करण्यासाठी उत्तरकडे चालले होते. त्यांना हे वतमान कळनांच त्यांनां मल्हारराव हाळकर व दिदे यांना इवर मराठा सरदारांची कुमक करण्यास वसई प्रांती पाठावेळे व त्यांच्या मागोमाग थोड्या दिवसांनी चिमाजीअप्पाही निघाले. पुन्हा जानेवारी ३० सन १७१३१९, ध्ये मोहिमला जाराचे तोड लागले. पुढें दोन आठवड्यांच्या आंत माहोम, डहाणू,
विषयप्रवेशा ११
२४/४५/४१९४ ७ ../”२.४४४...४ ४७.४ ७.४ ७७७४ ४७४ ७४.७७, ४५ /१ “के. १९. ११५४०१५...” ७७९ ४४९६ ७५१७ १९८७ ४..५./”७९..५९०.५९.५”९./९.../०७.../९७..४७४४ ४७८०४२७७४७ “७..»0 ““९ “७७
आतां पो्तुंगीजांचा खास अंमळ असा वसईचा किल्ला व त्या किल्ल्यांतील कांहीं कोसांचा टापू एवढ्याच भागावर बाकी उरला होता. तेवढा प्रदेश व तेवढा किल्ला जिंकल्याशिवाय आपल्या धर्मसंप्रामाची खरी सार्थकता होणार नाहीं हें ओळखुन त्याविषयीं योग्य ती उपाययोजना करण्यासाठींच चिमाजी- अप्पा व बाजीराव पेशवे यांनीं जंजिरे अर्नाळा ह्या मजबूत ठाण्यांत तळ दिला होता. आतां वसईचा किल्ला एवढें एकच मजबूत ठाणें पोर्तुगीजांच्या ताब्यांत बाकी राहिलें होते, व तें ठाणें पाडाव क्वेल्याने कोंकणपटरींतून पोर्तुगीज सत्तेचा नायनाट केल्याचे श्रेय मराठ्यांच्या पदरीं पडणार होतें हे जितके खरु तितकॅच हेंही खरें की, हा विजय मराठ्यांना दुःसाध्य होता. पण तो असाध्य होता असेंद्दी नाहीं. पोर्तुगीजांनी आपले सर्व सामर्थ्य वसईच्या किऴ्यांत एकवटून व किल्ल्या 'ची सर्व बाजूनीं मजबूत तटबंदी करून मराठ्यांशी तॉड देण्याची जय्यत तयारी केली होती व मराठेही पोतुर्गाजांच्या वर्मा घाव घालून त्यांचा नाश करण्याला डोळ्यांत तेल घाळून टपून बसले होते. आतां प्रश्न होता तो वर्मी घाव नेभका कसा घालावा एवढाच. वसईसारखें मजवूत ठाणें स्वसंरक्षणासाठी हातीं असल्या- मुळें पोतुगीज लोक विजयी मराठ्यांना कांहींसे भारी-निदान तुल्यबल तरी होऊन बसले होते. अर्थात वसईचा संग्राम झालाच तर मोठ्या निकराचा होणार हँ उघड होतें. बरें, मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यांत असलेल्या तेवढ्या टापू - खेरीज बाकोच्या सर्व भागांत मजवूत नाकेबंदी कष्न पोर्तुगीजांचा कोंडमारा केल्यामुळें पोर्तुगीजांचे आपल्या ताव्यांतील टापूपलोकडील भागाशी दळणवळण अजिबात खुंटल्यासारखें झालें हाते. बाहेचन त्यांना मदत येण्याचीही फारशी आक्या उरली नव्हती. त्यांना बाहेरून मदत यावयाची आशा फक्त सुंबईकर इंग्रजांकडून व गोंग्यांतील मुख्य सरकाराकडून; पण चिमाजीअप्पांनीं व्यंकटराव घोरपड्याला अगोदरच गोव्याकडे पाठवून तिकडील पोतुंगीज सत्तेला खासा
"१.५ ४.” ८-४ ७८७ 0. ४ ४७४५” ७-७ ७७७ &कळकक ककी कलक
नारगोळ, खतलवाडा, अशेरी व तारापूर हो ठाणीं मराठ्यांनी घेतलीं. तारापूर - चा संग्राम फारच निकराचा झाला. फेब्रुवारी-मार्चोत खंडूजी माणकर वगैरेंनी वांद्रे, धारावी, वेसावें ही ठिकार्णे काबीज केलीं. तात्पर्य, चत्र शुद्ध १ शके १६६१ (ता. २९॥३॥१७३९ ) पर्यंत पोर्तुगीजांचा वसई साष्टीकडील बहुतेक प्रांत मराठ्यांना कावीज केला असून फक्त वसई व आजूबाजूचा टापू एवढाच भाग कथानकाच्या आरंभकालीं पोतुंगीजांच्या ताब्यांत शिळक उरला होता.
१२ पेशवाईतील धर्मसंभ्राम
"७४0७५ »५..४
पायबंद लावण्याची खबरदारी वेळींच घेतल्यामुळे व व्यंकटरावानें तिकडे जाऊन ग्रोतुगीजांची हाडें खाशी खिळखिळी केल्यामुळें गोंग्याचा पोर्तुगीज गव्हनर जनरल काउंट डी सॅडो मिल यालाच त्राहि भगवान् होऊन गेलें होतें. तो वसई: ला मदत कोठून पाठविणार !% बरें, त्यांतूनह्दी त्यानें वसईकरांचा शकय तेवढा उपराळा करण्याचें मनांत आणले असत तरी तें साहित्य स्वाहा करण्यासाठीं मराठ्यांच्या खुण्की व आरमारी फोजा आ पसरून बसल्याच होत्या.
रह्वातां राहिले इंग्रज. त्यांनी मनांत आणलें असतें तर वसईकर पोर्तुगीजांना साध्य करणे त्यांना अगदींच अशक्य नव्हते. पण ते पडले मोठे धूर्त, कावेबाज व मतलबी लोक, त्यांना तरी पोलुगीजसतारूपी गोरी सवत कोठें हवी होती! त्यांतूनद्दी त्यांनीं पोतुंबीजांना उपराळा केला असता, पण केव्हां ! पोतुगीजांच्या द्वातून मराठ्यांचा पूर्ण मोड होइल व कोकणच्या किनाऱ्याला आपणाला आपला व्यापार व आपली सत्ता यांचा अनिरुद्ध फैलाव करण्याला मार्ग निष्कंटक द्ोईल अशी त्यांची खात्नी असती तर ! प्रथम प्रथम मुंबईकर इंग्रजांनीं मराठ्यांविरुद्ध वसईकर पातुंगीजांना चोरून भारून थोडें फार साह्य केलें, नाहीं असें नाहीं. पण ते साह्य वसईकर पारतुंगीजांना अपुरे पडलें व दिवसोंदेवस त्यांचा पाय खोलांत जाऊं लागला. मग इंग्रज तरी फाटलल्या आकाशाला ठिंगळे कोठवर लावीत बसणार ! त्यांनी पाहिले कॉ, ह्वा मोहिमेत मराठे सववत्र विजयी होऊन पोर्तु- गीजांची कोंकणपट्टांतील सत्ता मुळापासून खणून काढणार, व (इंग्रजांनीं आमच्या शत्रूंना मदत केळी' असा पेशव्यांचा ठपका आपल्या माथां येणार, पूर्वीच पेशवे व इंग्रज यांच्यांत जे परस्पर स्नेह्मावाचे संबंध ह्वोते, त्यांना अनुसरून वागा: बयाचें तर इंग्रज पार्तुगीजांना मराठ्यांविष्द्ध साह्य न करण्याला, इतकेंच काय पण
क्ट ०७ पटला स्वन
* व्यंकटराव घोरपडे हा बाजीराव पेशव्यांचा मेहुणा. यानें पेशव्यांच्या आज्ञे- वरून बारा हजार घोडेस्वार व चार हजार पायदळ एवढें प्रचंड सैन्य घेऊन ता० २३॥१॥१७१३९. रोजीं गोव्यावर चाल केली. गोव्याच्या गव्हर्नर जनरलने वसईच्या बचावासाठी बहुतेक सेन्य पूर्वीच पाठविल्याकारणानें त्यांची गोव्या- कडील बाजू बरीच लंगडी पडली होती. त्यामुळे व्यंकटरावाचा मार्ग सोपा झाला. त्यानें राचोळ'चा किल्ला म्हणजे गोव्याचे नाक घेऊन तिकडील पोतुगीज सत्तेला चांगलाच पायबंद लाविला.
विषयप्रवेद् १३
बक क ४-० “0 टी" * ५ >५ > -> * - ५६५५ -. -टी£ शा --- -५-५- -“५- नव्ह र्व य १
जरूरच तर मराठयांना साध करण्याला बांधलेले होते. निदान त्यांनीं त्या झगडथांत पूर्णपणें तटस्थ राहणें तरी अत्यंत डाचेत होते. असले करारमदार मतलबापुरते पाळावयाचे हें जरी इंग्रजांचे प्रारंभापासनर्चे ब्रीदवाक्य असलें, तरी मतलबासाठी म्हणून देखील ते पोतुंगीजांना साह्य करून मराठ्यांना दुखवू शक्रत नव्ह
इतकेंच काय, पण केवळ मतलबासाठींच आपण पातुर्गीजांना कितीही मदत केली तरी मराठेच अखर विजयी होणार हे ओळखन देखत्या दुधा दंडवत या न्यायाने मुंबईकर इंग्रजांनी पुढें पुढे मराठ्यांनाच थोडेबडत चोरटे साह्य केलें मराठय़ांना मात्र त्या साह्याचा 'चांगलाच उपयोग झाला. आणि तेन्हांचा सुंबईचा गव्हर्नर जोन हार्न याची जर बदली झाली नसती, तर कदाचित् मराठयांना पुढेही वसईच्या मोहिमेच्या अखेरपारवेतों मुंबईकर इंग्रजांकडून हृराजिनसी साह्य झालें असतें. पण जॉन हॉनेच्या जागी स्टीफन लो या नांवाचा नवा गव्हर्नर आला, त्याचा कल थोडासा पोर्तुगीजांच्या बाजूला झुकूं लागला होता. तरीही स्टीफन लोदेखील पोर्तुगीजांच्या विनेतीला पूर्णपणे मान देण्याला तयार होईना. त्यानें पोर्तुगीजांची सुद्धसाहित्याची मागणी साफ नाकारून द'णागोटा वगेरे जीवनोपयोगी साहित्य तेवढें जलमार्गाने पाठविण्याचें कबूल केले होतें £ पण चिमाजीअप्पांना त्यांच्या हेरामाफत अगोदरच हो बातमी कळली असून त्यांनीं तो दाणागोटाही वसईपर्येत जाऊन पोचं नये अशाविषयीं योग्य ती खबरदारी घेण्याला ठिकठिकाणच्या आपल्या सर्व मराठे सरदारांना बजावले होते.
अथात त्या धर्मसम्रामांतील अखेरचा निश्चयात्मक विजय आपल्या आटो. क्यांत आहे असेंच चिमाजीअप्पा व त्यांचे इतर मराठे सरदार सार्थादार यांना वाटत होते. आणि म्हणूनच त्य़ांनीं वसईचा सुख्य पोतुगीज सेनापाते मार्टेनो डे सिल्व्हेराह व वसईचा किल्लेदार जॉन डी पेरीरा यांच्याशी असें सलोख्याचें बोलणें लावलें होतें की, “आज क्रिंवा उद्यां लाकर क्रिंवा उशिरां आम्ही वसई
*॥१५४५ टच
*% पारसनीस व किंकेडकत “हिस्टरी आफ दि मराठा पीपल', भाग २ पृष्ट २५७ पहा,
8 गोव्याच्या गव्हर्नर जनरलनें अंन्टोनिओ कार्डिम फ्रो याच्या जागीं वसई येथे सेनापतिपदावर मार्टिनो डि सिरू्म्हेरा याची इ० सन १५३९५च्या प्रार्भी नेमणूक केली.
१9 पेशवाईतील धर्मसंग्राम
7५- > 1८ 2 नी “> ४ ७- फट शीका 0000 ७७ कीक” कळी कक्टीण
काबीज करणार यांत संषषय नाही. मंग विनाकारण रक्तपात करण्यांत अर्थ काय! तुम्ही सामोपचाराने किळा आमच्या स्वाधीन करून आमचा प्रांत सोडून निघन जात असाल, तर आम्ही तुम्हांला सुखरूपपणे जाऊं देऊं
ह्या सलोख्याच्या बोलण्यावर वसई येथील पोतुंगीजांकडून अजून उत्तर मिळा- वयाचं होतें. ह्या गोष्टींचा विचार करण्यासाठीं वसईकर पोतुंगीज अधिकाऱ्यांना जी मुदत देण्यांत आली होती, ती गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीं संपत होती. मात्र सलोखा होईल ह्या भरवशावर चिमाजीअप्पा व बाजीराव यांनीं पुढच्या संग्रामाची तयारी शिथिल पाडली नव्हती. त्यांनीं वसईच्या वेढ्याची सर्व सिद्धता जारीनें चालविली होती, व मोहिमेला सुरुवातही झाली होती.
इतके पोतुंगीज जेरीला आले होते, त्यांच्या सत्तेच्या अंतकाळ इतका समीप आला होता, तरी त्यांच्या मगरुरीला व अमानुष अत्याचारांना यत्किंचित देखील आळा पडला नव्हता. उलट ते जिवावर उदार होऊन चिडल्यासारखे झाले होते; व त्यांना धिंगाणा घालण्याला आतां वसईचा टापू तेवढाच शिल्लक उरल्यासुळें त्या टापूत त्यांनीं नुसतें सैतानी अकांडतांडव आरंभिले होतें. दिवा विझतांना मोठा होतो त्यांतलीच त्यांची गत झाली होती. त्यांच्या सैतानी अकांडतांडवा- चा एक मासला वसईजवळीळ चुळणें गांवच्या लोक्तांना गुढीपाडव्याच्या पूर्व दिवशीं अचानक पहावयाला सांपडला. त्या दिवशीं सूर्यास्तापूर्वी त्या गांवांत पुढीलप्रमाणें जाहोरनामा फडकू लागला.
ळू खै ळर सर्वे लोकांस जाहीर करणेत येतें कौ, जे लोक आमच्या प्रभ येशच्या
परमळृपर्ने प्रभूच्या धर्माचा अंगिकार करून पावन झाले आहेत, त्यांच्या
वर प्रभूचची-त्या आकाशांतील बापाची पूर्ण कृपा आहे. कां की, त्या
लोकांनीं आपल्या मनांवरील सेतानाची सत्ता झुगारून देऊन प्रभूच्या
चरणांचा आश्रय केला आहे. अशा प्रभूच्या सर्व ख्रिस्ती लेकरांस
अभय आहे.
आज प्रभूच्या परमपवित्र धर्मावर सेतानाचे भक्त मराठे यांनीं परम
संकट आणलें आहे. ते प्रभूची ह्या भागांतील सता व प्रभूचा धर्म नाम-
कॅ. वसईच्या धमसंग्रामांतील ही शेवटची मोहीम होय. ह्या मोहिमेला खरी सुरुवात माघ ४द्ध १०-ता० २७॥१३॥१७३९ रोजीं झाली.
विषयप्रवेश १५ "7-5 आआआ“ 7 ल काठ झटत आहेत. जे पुण्यवान लोक संतानाच्या तान्यांतून प्रभु येशूच्या कळपांत येऊन निरंतरचे पावन झाले, त्यांना पुन्हा सैतानाच्या ताब्यांत देण्यासाठीं पेशवे व रामानंदस्वामे वगेरे त्यांचे इस्तक दृष्ट ब्राह्मण यांनीं शुद्धीकरणाची घातकौ वळवळ ठिकठिकाणी जोरानें सुरू केली आहे. क्षा चळवळींत प्रभूच्या लेंकराचें कल्याण ददोणे शक्य नाहीं; व त्या चळवळींत सांपडून नाममात्र शुद्ध होणाऱ्या लोकांस हिंदरधमेद्दी लाभणार नाहीं. कां कौ, एकवार कोणत्याही निमित्ताने भ्रष्ट झालेला हॅ: पुन्हा पावन होऊन हिं] धमात प्रविष्ट होऊ शकत नाहीं असें हिंदूतील मद्दाविद्वान अश्या धमेमातडांचद्दी मत आहे.
पेशवे व त्यांचे हस्तक ब्राह्मण यांनीं पोर्तुगीज सत्तेञिरुद्ध व आमच्या प्रभु येशूच्याविरद्ध लोकांना चिथवून आमच्यावरुद्ध सध्यां सुरू असलेल्या धर्मसंम्रामांत शस्त्रप्रहण करण्याला प्रवत करण्यासाठीं ही शुद्विसंघटणाची घातकी चळवळ जोरानं चालविली आहे. कां कॉ, ह्या चळवळीच्या जोरावर त्यांना संव लोकांची एकी करून आमच्याविरुद्ध बंड करावयाचे आहे. पण आमचा मोड तर ह्या आमच्या शत्रृंच्या हातून होणे शक्यच नाहीं. कां कॉ, आमच्या डोक्यावर आमच्या प्रभु येशूर्चे- त्या आकाशांतीळ बापाचे कृपाछत्र रुळत आहे. मात्र प्रभूच्या आज्ञेला पायांखालीं तुडवन ज लॉक आमच्या शात्रेंना सामील होतील, त्याप्रमार्णेंच शीद्व् संघटणाच्या चळवळीला बळी पडून त्यांना तारक असलेल्या प्रशूच्या धर्माची अवहेलना करतील, पुन्हा हिंः धमाचा स्वीकार करून उद्यीक हिंधमाप्रमाणे गुढ्या तोरणे उभारतील, त्यांना आमच्य प्रभूच्या पवित्र इच्छेनुसार स्थापन झालेल्या धर्भशासन- मेडळामार्फत अत्यंत कठोर शासन करण्यांत येईल.
त्याप्रमाणेंच आमच्या शत्रुच्या पक्षांतील कोणाही पापी मतु-्याला आमचे जे धर्मब्रांथव कोणत्याही प्रक्रार॑ साह्य करतील, त्यांनाही कठोर शासन करण्यांत येश्ळ. मात्र ज्या अभागी लोकांनीं अजून आमच्या प्रगूच्या पवित्र लिस्ती धमाचा अंगीकार केला नसेळ, असे लोक ख्रिस्ती होऊन आमच्या प्रभूच्या कळपांत सामील होऊन स्वतःचा उद्धार करून घेतील तर
१६ पेशवाइतीळ धमसंग्राम
२-० ४.५ ४०५४-0४ ७ ४-० ७) क. १५८४ २.५४ १५४१.” ४.५४...” ४७ “४.४ ७.५ ४७./४ ७४...” ४५ ४७ “७ “९.१५ ४ 0४..५ 0५०८७.४ 0.०४ ४७४ ४७.८४”... १७.७४ केक २.७४
त्यांचें हे आमच्या आकाशांतील बापा ! हे प्रभो येशू ! तू तारण कर. त्याचें रक्षण व संगोपन आमच्या हातून होवो. रामानंदस्वामे व पेशव्यांचे इतर हस्तक यांना पकडून जो कोणी आमच्या स्वाधीन करोल, त्याला योग्य बक्षिस दिलें जाईल. ठर ळू कर
याप्रमाणे जाहीरनामा गांवांत फडकला, व तेव्हांच त्याच आशयाचो दवंडीही गांवांत सर्वत्र पिटण्यांत आली.
तो दिवस गेला, दुसऱ्या दिवशीं गुढीपाडवा होता तोही दिवस गेला व तिसऱ्या दिवशीं म्हणजे चेत्र शुद्ध द्वितीया शक्रे १९६१ सिद्गार्थांनाम संवत्सरे क्ला दिवशी सूर्योदयाच्या सुमाराला त्याच चुळणे गांवांतील देवीच्या देवालया- समोर एक अत्येत विस्मयजनक देखावा दिसू लागला. हृत्यारबेंद गोऱ्या पोर्तुगीज शिपायांनी कांही काया शिपायांच्या मदतीने गावांतून कोंडवाड्याकडे किवा कसाईखान्यांत गुरे हांकळून न्यावी त्याप्रमाणें सुमारें पन्नास तरुण लोकांना तेथें आणून देवोच्य़ा पटांगणांत एका भल्या मोठ्या तारेच्या कुंपणांत कोडून ठोबले' होतें. त्या कुंपणाच्या अलीकडे देवालयाच्या सभामंडपांत दोन उच्चासनें मांडण्यांत आलीं असून त्यांपेक्ती एका उच्चासनावर एक सुमारे तीस वर्षांच्या उमरी- चा रुबाबदार पण खुनशी चेहऱ्याचा तरुण बसला होता. त्याच्य़ा एकेदर वेषावरून तो लष्करी अधिकारी असावा असा स्प्ट बोध होत होता. त्याप्रमाणेच त्याच्या चर्येवर झळक्रणारा खुनश्ीपणाचा आनंद व तारेच्या कुंपणांतील बदीवान तरुणां- च्या दोनवाण्या मुद्रा यांकडे तुलनात्मक दृष्टीने पाहतां तो अधिकारीच त्या लोकांना केद करण्याला कारण असावा असास्पट्ट बोध होत होता. त्या तरुण अधिकाऱ्या- च्या थेट समोर देवालयाच्या पटांगणापर्लाकर्डाल पाषाणी दोपमालांपाशो, जथें पूर्वी द्रसाल शिमग्याची होळी उभारली जाई, त्या जुन्या जागीं एक सुमारें पांच हात उंचीचा, पायाच्या जांबेइतका जाड निमुळता लोहस्तंभ पुर्न उभा करण्यांत आला होता. त्या लोहसंभाच्या टोंकाला ख्रिस्ताचा कूप लटक्रविण्यांत आला होता. त्या लोहृस्तेभापासून थोड्या अंतरावर एक आरस 'चोरस चार हात लांबी- रुंदार्चे व तितक्याच खोलीचे अमिकुंड प्रज्वालित करण्यांत आले होते. लोह-्तंभा- पासून थोड्या अंतरावर एक समारे तिशीच्या उमरीचा भरदार शरीरबांध्याच। वाणोदार तरुण, एक समारे एकर्वास बावीस वर्षांच्या उमरीची नाकाडोल्यांना
विषयप्रवेश १७ नीटस अशी स्त्री, तिलाच बिलगून तीन वर्षीच्या वयाचा एक तरतरीत व निमगोऱ्या वर्णांचा देखणा बालक व एक पन्नाशीच्या उमरीचा निमम्हातारा अशी चार मंडळी थोड्याच वेळांत बंदीवान म्हणून आणून उभी करण्यांत आलो. तो तरुण व तोम्हातारा यांचे तोंडवळे इतके सारखे होते कों, त्यावरून ते पिता- पुत्र असावे असें कोणालाही ठाम वाटले असतें. त्याप्रमाणच त्या बालकाच्या व त्या तरुण स्त्रोच्या चखत इतका सारखवटपणा होता काँ, तो बालक जरी त्या स्त्रीला बिलगून उभा राहिला नसता, तरी तीं मायलेकर॑ आहेत हें कोणींही ओळखले असते. आणि तो तरुण मधून मधून त्या स्त्रीकडे व त्या बालकाकडे इतक्या स्नेहमय दृष्टीनें पाहो को, त्यावरून ती स्त्री त्याचीच धमंपत्नी असावी व तो बालक हे त्यांचेच अपत्य असावे अशी कोणालाहो नि:शेकपणें खात्री वाटली असती. पण इतके कशाला ! तो बालक तेथे येतांच मधून मधून केविलवाण्या नजरेनें त्या तरुणाकडे, त्या सरीकडे व त्या निमम्हाताऱ्याकडे पाहून अनुक्रमे “बाबा ! “आई !' 'आजोंबा' अशा हांका मारूं लागला; त्या ऐकून कोणाची नि;संदेह् खात्री पटली असती कों, ताँ सर्व एकानच कुटुंबांतील माणसें आहेत. त्या चौघांचेहो हातपाय लोहडाखलांनी बद्ध केलेले होते-हाय ! त्या लहानग्या गोजिरवाण्या अर्भकाचे हातपायही हाखलाबद्ध होते. ती मंडळो तेथें येतांच त्यांच्या ऱोखलाबद्ध पायांतून एक सांखळी आवून त्या सांखळाचीं दोन टोक दोत बाजूना एकेका दगडाला बांधून टाकण्यांत आलों. त्या अधिक्राऱ्याने एकवार ह्या बंदीवानांकडे पाहिल, तेव्हां त्याला कोणो पाहिले असतें तर ताबड तोब ओळखले असतें को, तो अधिक्रारी त्या मडळोचा हाडवेरी आहे. ह्या सर्वे मेंडळोराभोवार सुमारे पन्नास गोऱ्या हत्यारबंद शिपायांचा खडा पहारा होत!. त्या उव्चासनावर बसलेल्या अधिकाऱ्याच्या मार्गे चार हत्यारबंद शिपाई अत्यंत अदबीने उभे हाते. तो तरुण अधिक्रारी व तेथले एकंदर हत्यारबंद शिपाई यांचे चेहरे तजेलदार व आधकारमदानें घुंदावलेले दिसत होते. पण इतर सर्व मंडळीच्या चर्येवर मात्र म्लानतेची केविलवाणी काळसर छाया पसरलेली होती. त्या मेडळोंत बंदीवान म्हणून उभ्या असलेल्या चौर्घा मंडळीच्या चर्येवरही निराशेची व म्लानतेचीं घनदाट अभ्रे दाटलेली दिसत होतीं. पण अश्राच्छादित आकाशांत मधून मधून विदुळृता चमकावी त्याप्रमाणें
तो बंदीवान तरुण, ती तरुणी व तो म्हातारा यांच्या तेजस्वी पण संतत्व पे....२
१८ पेरावाइतील धर्मसंप्राम
* बहई*--/५-”%, ५.>%-“ ४ शा “४१४ 4 “/४- ४9 “४ “४ “४-१ *%*€ “ “१ १४.” ” “४ /५४५-५४१४ ५ ४.”% “७ “४७/१५/१७५५” “ ७.///४, “४७.” ४ % “ह. “ “ -€<*/*- .“ ४१%.” »“*९_/% “९ वज वहत
नेत्रांतून मधून मधून तिरस्कारयुक्त संतापाची चमक मारत होती. त्यांच्यांतील त्या अर्भकाच्या चर्येवर मात्र सतापाचा मागमूसही नव्हता. त्याला आपल्या सभोंवारच्या परिस्थितीची काय जाणीव ! त्याला जाणीव फक्त त्याच्या शंखलाबद्ध हातांपायांना होणाऱ्या वेदनांची होती; त्या वेदना व सभोवारच्या भेसूर परिस्थितीमुळे उत्पन्न झालेले भय यांमुळे त्याची कोमल चर्या असमि- स्वालांनी होरपळून गेलेल्या नाजुक पुन्पाप्रमाणे कोमेजून गेली होती.
ती चार वँदीवान मंडळी तेथे हृत्यारंद शिपायांच्या कडेकोट पहाऱ्यांत येऊन थडकतांच तेथे पूर्वीच तारेच्या कुंपणांत डाम्गून पडलेल्या लोकांच्या तोंडून हळहळीचे मानसोद्रार निघे लागले व कांहींच्या डो/यांतून दःखाश्रही वाहूं लागले. तो ठढोहस्तंभ व तें घडाडलेलें अभिकुंड पाडून त्या केद्यांच्या चर्याही एकदम पालटल्या, जीविताविषयी पूर्णपणें निराश झालेल्या जीवांच्या चर्येवर ज्या प्रकारची अत्यंत भेसूर पण किववित बेफिकिरीची छाया पसरते, तशा प्रकारची छाया तो तरुण, ती स्त्री व तो निमम्हातारा मनुऱ्य यांच्या चर्येवर पसरली होती. आयुप्याच्या अखेरच्या क्षणापर्यत जीवाची जीविताविषयींची आशा सुटत नाहीं असा जगाचा सवसाधारण अनुभव असतो. पण कांही अपवादात्मक प्रसंग असे प्राप्त होतात को, त्या प्रसंगी जीवाचा प्रत्यक्ष अंत होण्यापूर्वीच त्या अंताच्या पूर्णे जाणिवेच्या जबरदस्त धकक्याने त्या जीवाचा 'जीविताविषयींचा आशातंतु तुट्रन गेलेला असतो. त्या अभागी केंद्यांची स्थिति अशीच होती.
ते केदा तेथ येऊन डांवून पडतांच त्या अधिक्राऱ्याने तुच्छतापूर्ण खुनशी दृष्टीने एकसारखं दोनतीन वेळां त्यांच्याकडे पाहिळे व लगेच आपल्या मागच्या एका काळया शिपायाकडे वळून विचारलें, “ आल्बुकक ! पोटोंसाहूंबांना यावयाला अजून कितीसा अवकाश आहे?”
“ साहेब इकडे यावयाला निघाले आहेत. ते एवद्यांत यावयाला हृवे होते. अजून कां आले नाहींत नकळे.” आल्तुकक उत्तरला.
“ मा्गीतच काणा वदमाषानें त्यांच्यावर एखादे संकट ओढवून आणलें नसेल ना! ” ता तरुण अधिकारी समोर जमलेल्या सर्वे लोकांच्या घोळकयाकडे एकवार लक्ष्यपूदेक पहात म्हणाला, “ खरच, तो वेरड उदड्धमजी हा मंडळींत अंगठे दिसत नाही. आणि तो स्यामीददी दितत नाही. त्यांचा तुम्ही कां पवाडून
विषयप्रवेश १९ आणलें नाहीं! तमच्यापा्शी मीं जी वहिमी माणसांच्या नांवांची यादी कालप्च दिली होती, त्यांत त्यांचीं नांवे प्रथमच होती; खरे ना! ”
“ होय साहेब ! ' आल्बुकक उत्तरला.
तो तरुण अधिकारो आपल्या मागच्या दुसऱ्या एका काळ्या शिपायाकडे वळून म्हणाला, “ जॉन! तूं तर त्या बेरडांना चांगला ओळखतोस. आपल्या माहितांतील वहिमी माणसांवर नजर ठेवून त्यांना कैद करून आणण्याची जबाब- दारी तुझ्यावर होती. खरे ना?"
जान उत्तरळ!, * होय साहेब !--
“ होय साहेब काय * तूं तमी कामगिरी नीट बजावली नाहींस!”
“ साहेब ! रात्रभर मी दळभजी ज्या घरांत रहात असे त्या घरावर सहास्त्र पहारा ठेवला होता. पण त्यापूर्वीच तो जो कोठें बाहेर गेला होता, तो आज उजाडेपावेतों घरा आलाच नाही. आणि तो स्वामि तर आमचें पैन्य गांवांत येऊन पॉचण्यापूर्वींच वाहेरगांबीं कोठें निघून गेला असल्याचें सला नक्की कळले. अशा स्थितींत माजा काय इलाज चालणार! ”
“ हें तू अगोदरच माझ्या नजरेला कां नाहीं आणलेंस? ” तो अधिकारी किचित् त्रासिकपणाने जॉनला म्हणाला, “ असा हलगर्जांपणा अशा महत्वाच्या कामी सुळींच उपयोगाचा नाहीं. पोटोंसाहेबांशी त्या हरामखोर रामानंदाचा उना दावा आहे हे तुला कसे माहीत नाहीं! जा पाहूं! अगोदर पोटोसाहेबांचा तपास करूनयेजा
याप्रमाणे त्या अधिकाऱ्याचा हुकूम होतांच जांन तसाच पोटसिाहूवाच्या तपासासाठी निघाला. ता थोडा दूर जातो न जातो तोच तेथें एक पालखी प्रेऊन थडकली, ती पालखी पहातांच कोणी तरी बर्डे घर पोकळ वांत? या थाटाची गोरी मिक्षेक्रीण आली हें देवालयासमोर जमलेल्या सवे मंडळीला अजमावतां आळे. इतका अचक अंदाज त्याना करतां येण्याचे कारण अलीकडे पोतुगीजांच्या पडत्या काळांत अशा प्रकारचे प्रतिष्ठित भिकार देशांत सवेत्र फारच लोटले होते. शएतिष्टित गोऱ्या भिकारणानीं स्वतः पालळखींतन भिक्षा
म----२->---८-->-
% गोव्यांतोल पातेगीज सतेला उतरती कळा लागल्यावर तेथीलठ लोकांचे जे हाल होऊं लागले त्याचच! हः परिणाम होय. अक्षा प्रकारची विपन्नावस्था पोर्त गोज समाजाला टरस्थांनांत त्यापूर्वीच प्रात मालो होती. टॅव्हर्निअर इ० सन
२० पेशवाइतीळ धर्मसंप्राम
७७७०७००५५७, > 0५ 2४ “७४ ५.०७ “0४५५०५७७४० ४.७७. “७४० ४०”/ ४०४४५१५.
2२.२८. *.” ८ शाष्श* ४४१४” ४४८0 शध”:
मागावयाला निघावयाचे व त्यांच्या बरोबरच्या नोकरांनी पुढे जाऊन भिक्षा योळा करावयाची, असल्या प्रतिष्टित मिक्षांदेहाचा पारेपाठ होता. त्या परि- पाठाला अनुसरून त्या पालखीबरोबर दोन तरुण व सुंदर दासी होत्या. त्यांना पहातांच . तो कोणा प्रातिष्ठित भिकारणींचा लवाजमा आहे हें कोणालाही आळखतां येण्याजोगे होते.किंबडना त्या काळांत पालखींतून भिक्षा मागावयाला निघणाऱ्या ह्या मिजासखोर गोऱ्या भिकारणींचा इतका सुळसुळाट झाला होता को, त्यामुळें खरोखरोचे प्रतिष्टित च पालखीपदस्थ लोक पालखींतून त्या प्रांती हिडण्याला कच लागल होते. पुरुष पालखीतून मिरवणारे असे थोडेच. पालखीपदरस्थ श्रीमंतांच्या वायका काय त्या देवदर्शनाला अथवा एखाद्या समारंभाला जावयाला निघाल्या कॉँ पालखीतून जावयाच्या; पण पडदानशोन पालखीत एखादो मिजासखोर गोरी मिकारोण बसली आहे कौं कोणी थोरामोठ्याची बायकामडळी बसलो आहे हे सामान्य जनांनी कसें ओळखावे ! बरें, अशा पालखीपदस्थ थोरामोठ्यांच्या बायका कधीतरी पालखीतून वाहेर पडावयाच्या; एरव्हों नेहमी गांबांतन रस्तोरस्ती पालख्या हिंडावयाच्या त्या अशा गोऱ्या भिकारणोच्या. त्यामुळें पालखी व त्या पालखीबरोबर थोडासा चारदोन माणसांचा लवाजमा दिसतांच सकृहशनीं जो तो मनांत खणगांठ बांधी कौ, गोरी मिकारीण आलो.
आज ती पालखी आलेली पहातांच देवालयासमोर जमलल्या कांहॉ लोकांना तर त्याहूनही जाल्त बोध झाला को, हद्दी किक्ृेदारीणबाइची पालखी असावी. त्या अधिकाऱ्याने तर प्रथम म्हणज पालखी दाश्र्पिथांत यावयाच्या पूर्वो केवळ पुढें आलेल्या दोघी दासोना पाहूनच ती सोफियाची पालखी आली असावी असें अजमावन चटकन् उठून पुढें जाऊन पाहूले. तेथल्या कांहो लोकांना वाटलं कॉ, गोरी भिकारीण आलेली पाहून गोऱ्या कातडीला मान देण्यासाठी तो अधिक्रारी उठला. पण त्याच्या उठण्याचे कारण निराळेच होतें. तें त्याच्या बरोबरच्या शिपायांना मात्र माहोत असावे. कारण ते लगेच एकमेकांकडे पाहून डोळे मिचकावून हंसले. ते कां हंसले असावे बरें !
तय डा -- न --%--ाटप- णक नगाडी सकर >> डन गजनी वाड नाणी पाटणा
१६४८ मध्यें लिहितो, 'पूर्वाची श्रीमत कुटुंबे हृ्ठी भिक्षा माग लागलो आहेत, तरी त्यांनी आपला थाट टाकून दिलला नाहीं. पोतुगीज बाया पालखीत बसन भिक्षा मागण्यास जातात आणि बरोबरचे नोकर आंत जाऊन भिक्षा गोळा करितात. ज्या ज्या ठिकाणीं पोर्तुगीजांनी राज्य कमावले, तेथं सर्वत्र असाच थाट उत्प्नन झाला, आणे त्याचा परिणामही तोच झाला.'
प्रकरण पहिलें सोफिया र
सु फिया कोणत्याही कारणानें कां असेना, पण त्या प्रांती-नव्हे, गोवेंभ्रांतीद्दी
गाजलेली बाई होती. ती आजला वयानें सुमारे एकवीस वर्षांची होती. पण तिला पाहून कोणीही ती सोळा वर्षोच्या वयाची तरुणी असावी असेंच म्हटले असतें, इतक्री तिच्या शरिराची ठेवण व घडण बांधेसूत होती. सोफिया रूपाने फार सुंदर होती असें जरी नाहो, तरी ती मोहक होती एवढे मात्र निःसंशय. तिच्या नेत्रांत असें कांद्दी विलक्षण पाणी होतें को, तिला नजरबदीचा जादूटोणा माह्वीत नसतांही ती ज्याच्याकडे पाही त्याची नजरवंदी करून सोडी. आतां, पाणीदार नजर देखील दोन प्रकार्वी असते. एक प्रकारची पाणीदार नजर सद्विचारी माणसांच्या मनांत आदर व अनुकंपा उत्पन्न करते आणि दुर्जनांना विलक्षण धाक-द्रारा दाखावेते. ज्याचे आचार-विचार पवित्र गँगा- जलाप्रमाणें निमळ असतात, अश्या पाणीदार दटटींच्या माणसांच्या दृष्टींतच अशा प्रकारचे पवित्र पाणी खेळत असेतॅ. दुसऱ्या प्रकारची पाणीदार नजर सजनांच्या मनांत तिरस्कार उत्पन्न करते व दुराचारी जनांच्या अंतःकरणांत गुदगुल्या करते. ज्यांचे आचार-विचार अपवित्र असतात, अशा दुराचारी माणसांपैक्री ञ्यांची दृश्ि पाणीदार असते त्याच्या दटींत असलें पाणी खेळत असतें. सोफिया- च्या दृष्टींत ह्या दुसऱ्या प्रकारचें पाणी खेळत होतें. इतकें असूनही ज्याला ज्याला सोकियाची ओळख झाली, तो तो मतुण्य कधींद्दी तिच्या मोहइजालांत गुरफटला जात नसे. त्यामुळें सोफिया इतकी सुंद्र व इतकी चंचल असूनद्दी आणि जगाच्या रहाटीप्रमार्णे तेव्हांदेखील स्तरोलंपट नादान लोकांची तेव्हांच्या समाजांत वाण नसून सुद्धां[फार काय, खुद्द सोफियाच्या जातभाइत तेव्हां सवे प्रकारचे अना वार परमावधीला पोचलेले असतांनादेखीलळ जगाच्या बाजारांत सोफियाच्या दुःशीललांछित सोदर्यांला पुरे मोळ मिळणें अशक्य झाल्यामुळें एका काळी लक्षाधिशाची सहचारिणी शोभणारी ती आज गिक्षापात्राची मिरासदारीण झाली ह्षोती ! एका काळीं तिने जिथें सोनें वेचले [तथे गोंवऱ्या वेंचणें आज तिच्या कपाळीं आलें झेतें !
गवि पेशवाईतील धमसंग्राम
पोफण' हो गोव्यांत एका नादान पण श्रीमान् अशा पार्तुगीज धमंगुरूच्या ॥.लोसम्रादिरातील एका परमसुंदर मुसलमान स्त्रीच्या पोटा जन्माला आलेली छतरी. गोड्यातील पोर्तुगीज लोकांच्या पाशवी अत्याचाराच्या इतंहःसांत अशी उदाद्दर्ण भसळ्य असल्यानें व आजचा त्या प्रांतांतील वारयोषितांचा मोठा वर्ग तत्काठीन उरत्याचारांची प्रत्यक्ष साक्ष देत 2।सल्याने सोफियाची अः त्या कोणा नीच ॥र्टयाज धम]ुरूच्या विलासमंदिरांत कशी ओढली गेली, ह्या हृदयद्रावक प्रसंगाचे कणेन एथे र केन्यानही भागण्याजोगें आहे. एवढे मात्र खरे को, सॉफया ही जन्मतःच जागी हावी. ती जन्माला येऊन महिना लोटला नाही तों तिच्या अ इन परलोकचा पराया यला गह्वातां राहिला बाप;पण विलासदासीच्या अपत्याला किमत देण्याइतकी तोणुसळ, "दा बापाच्या अगी मुळीच नव्हती. त्याने लगेच एळ; अनाथाल्यांत (गा एक आहिन्याच्या तान्ह्या अभकाला पाठविले. तेथे साफिडा वयाला पंधरावे पापे लारपादेतो राहिली. ती वयांत आल्यावर तिच्या जन्मदात्यः बापाने तिच्या पासा. एवढच केले.-तेव्हांच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलपाशा' एक शब्द खच वरून ९ फाशी जी कोणी तरुण लम लावील त्याला पोर्तुरीज सेन्यांत शिले- दोरी [भळण्याचा व्यवस्था केली. तेव्हां बेकार गोऱ्या लोकांना सुळींच दुष्काळ नंज्हूता तशात अधेवाटग्या, बेशिस्त व व्यसनी तरुणांनां तर तो सारा देश गज बजून नळा दवता. अशा अर्धेबाटग्या तरुणांना संन्यांत जागा देऊन त्यांच्या पोटा- पाण्याची रव करण्याचे प्रयत्न सरकाराकडून प्रथमपासून कसून चालले होते हे खरे. पग लाखांनीं असली धेडगुजरी व नादान प्रजा निर्माण झालो, तितक्या
नाना धा १ ०? णा णा पा? न्स हक्क कता
* पोुगोज लोक हिंदुस्तानांत आले ते ऐषआरामी व चनी वनले. त्यांना पायदळांत नोकऱ्या करणें कमी प्रकारचें वाटूं लागले व हिंदु- स्थानांतील राजे-रजवाडे ब इतर लोक यांच्याशी झगडण्याला भरवशाची फोज तर पाहिजे, तेव्हां ती संपादन करण्यासाठीं अल्बुकके याने युरोपांतील पोतुगीज काकांचे 'एतशीय ख्रियांशीं लमे लावून देण्याची युत्तिक् प्रथम काढली. अशीं छक्के लाकाणऱ्या स्त्रियांना बक्षीस मिळे व पुरुषांना नोकर्या मिळत. ध्यामुळे
बेडाटः* प्रजा पुष्कळ वाढली. परंतु त्यामुळ उत्पन्नापेक्षा खर्च जास्त येऊं खान. रारी ही व्यवस्था कायम ठेवण्याबद्दद धर्माधिकाऱ्यांचा फार आग्रह अद २ शाटगे लोक घमेंडखोर व आळशी असत, आणणि त्यांना नोकऱ्या देऊन
सोफिया २२ सवांची सोय सरकार तरी कुठे लावणार ! त्यामुळें सोकियाशोीं ७म़ करून शिलेदारी मिळविणारा बेकार तरुण सांपडण्यालळा मुळींच अडचण पडली नाहो. त्याला .सोफिया आवडली व तो सोफियाला आवडला; दोघांचे लम झाले ब तो तरुण शिलेदार बनला. पण बिचाऱ्याने सहा माहिने देखील शिलेदारीचा किंवा संसार- सुखाचा उपभोग घेतला नाहीं. तो अकस्मात् एका प्राणांतिक आजाराला बळी पडला व सोफिया विधवा झाली. तेव्हां तिला नुकतेच पंधरावे वर्षं पूर्ण झालें होतें.
सटका 0 2
पण सोफियेला वेधव्यपकांत फार दिवस रुतून बसावें लागले नाहीं व तोही पतिनिधनासुळें अरत बसणारी स्त्री नव्हती. वधव्य वांट्याला आल्यापासून दोन महिन्यांच्या आंत [तेने एका वडा लष्करी अंमलडाराशी आपले लग्न आपण होऊनच जुळार्वळे. कोणाला वाटेल कॉ, सोफियाचे नशीब ह्या “सऱ्या विवाह- संबंधाने उद्याला आले. पण तसेंच कवळ नाही. तिच्या ध्रमपाशांत अडकून तिचा पाते साळेला ता “करी अंमलदार ह्या लम्नाच्य़ा वेळो. ताठ वर्षांच्या वयाचा होता व हे त्याचे सहावे लम होते. सोफियाने जाणून बुजून अशा जख्खड थेरड्याशी लगर लावले ते केवळ त्याच्या संपतीकडे पाहून लावले, व अशा विषम लग्नाचा परिणामही पुढे त्या काळच्या अस्सल पोतुगीज किंवा बाटग्या ख्रिस्ती स्त्रीसमाजाच्या सार्वत्रिक झधःपातमय जोविताला अनुसरून
-न--->>>< -*न टण पणा“
पोसण्याचा खर्च सरकारावर पडे. ह्या अवाढव्य खर्चामुळे पुढे पुढें सरकारांत पेशाची टंबाई पटू लागली व त्या अवाढव्य खर्चावर पोसले जाणारे पोर्तुगीज लोक व त्यांची प्रजा यांचे जे पेढार बनलें; तेही शिस्त मोहून बंडखोरां- प्रमाणे वागू लागलें. ते लोक आपल्या बंदुकी देखील इकडील राजे लोकांना विकीत व पोट भरण्याकरितां वाटेल तें नीच कृत्य करीत. याविषयीं तक्रारी इ० सन १५४८ मध्यें राजाकडे गेल्या व अशा बेकार लोकांना लष्करी नोकर समजून पगार सुरू करण्याविषयी शिकारस करण्यांत व त्या शिफारशींची योग्य अंमलवजावणीही झाली. पण त्या उडाणरप्पू घमेंडखार लोकांना पगार सुरू झाला तरी जुगारासारख्या व्यसनांत त्याचा अपव्यय होऊं लागला व त्यांची देना कायम- च राहिली. पोतुचीजांच्या उतरत्या कळेंत पुढें पावणेदोनशें वर्षांनीं पोर्तुगीजांचा हा अधःपात कोणत्या थराला गेला असेल याचो ग्रोग्य कल्पना कोणासही करतां येईल.
२४ वेशवाईतील धमॅसंप्राम
->%..» ०८%.” *.“ “४-१ “४ ./२%.५/%_४७. ४७ ४७.५४. “../७_/४१४.७% ८४४ ७ “२५.०९ “0७ 4४% ४१९» ७७.४”
“7५-/ळ््क
उह्वावयाचा तोच झाला.% त्या लष्करी अंमलदारा'चें सोफेया्शा लम झाल्यावर थोड्याच दिवसांत त्या अंमलदाराची ठाण्याच्या किछेदारीच्या कामावर नेमणूक झाली. अथात् सोफियादी त्याच्याबरोबरच एकदम गोव्याहून ठाण्याला आली. व्या वेळचा सोफियाचा श्रीमंतीचा थाट कांहीं ओर होता. ती अगोदरव विलासप्रिय व चंचलवत्तीची होती, तशांत तिचा हा दुसरा पति तिच्या पंधरा
% डानव्हर्सीसारख्या अनेक इतिहासकारांनी आपल्या इतिह्दासांत हिं उस्थानांतील तत्कालीन पोतुगीज समाजाच्या सावंत्रिक अधःपाताचें शब्दचित्र रेखाटून ठेविले आहे, तें असे!--'...व्यापाराने हि]स्थानांतील पोतुगीज लोक धनाढ्य झाले होते व शिवाय लष्करी भपका व धरमोधिकाऱ्यांचा डामडोळ अतोनात बाढला होता. लोक आपलीं सर्व कामें गुलामांकडून करून घेत असत. त्याप्रमाणेच घरदाज गणल्या जाणाऱ्या पोतुगीजाने कोणताही धंदा करणें अप्रतिष्टितपणाचें समजलें जाई. त्यांच्या बायकांनाही घरातील कार्मे करणे प्रशस्त वाटत नसे. ललप्कर, धभंखातें, सरकारी नोकरी व थोडाबहुत समुद्रावरील व्यापार यांशिवाय इतर कोणताही धंदा पोतुगीज लोक स्वतः करांत नसत. त्यामुळें ते आळशी व व्यसनाधीन बनले. आळशी पुरुषांच्या झुंडी रस्त्यातून व जुगारीच्या अड्ड्यांतून हिंडताना दिसून येत. जुगारींचा सरकाराला कर मिळत असून तेथें सर्वे प्रकारची चैन चाले. नाच, तमाशे, गाणेंबजावरणे, जादूटोणा, खुषमस्करी इत्यादि चैनीच्या प्रकारांचा तेथें सुकाळ असे. बायकांना पुरुषांत मिसळण्याची मनाई असल्याने त्या पडद्यांत वसून गाणे, खेळणे, भांडणे, खुषामस्करे व गुलाम यांच्याशी भेष्टाचार करणें इत्यादे प्रकारच्या चेनींत कालक़मणा करीत. त्या उष्णतेचा ताप टाळण्यासाठी बहुशः अर्थनमावस्थेंत रह्वात. त्या कपटाविर्वेत निष्णात असत, व मोगल लोकाच्या जनानखान्यांतील अनाचारांप्रमाणेच अना- प्वार ह्या पोतुगीजांच्या जनानखान्यांत चालत. नवर््याशीं कपट लढवून, त्याला गुंगीचे ओषध वगेरे पाजून त्या स्त्रिया आपला अनीतिमय प्रीतिव्यवहार यथेच्छ चालवीत. प्रार्थनेकरेतां मंदिरांत वगरे जाणें झाल्यास त्या स्त्रिया मोठा थाटमाट करीत. त्यांचा पोषाक बहुमोळ भरगर्व्वांचा असून तो हिरे, माणके, मोत्यें वगैरे रत्नानीं मढविळेला असे. त्या डोक्यांत, दंडांत, हातांत व कमरेत नाना प्रकारचे झल्यवान् अलंकार धारण करीत; डोक्यावरून पायांपर्यंत झिरझिरीत वस्त्राचा अुरखा घेत; व बंरोबर पहारेकऱ्यांचा ळवाजमा येऊन भरगच्चीच्या म्यान्यांत
सोफिया २५९ सोळा वषांच्या भरजवानींतील उमरीच्या मानानें तिचा अ!जोबा शोभण्याइतका वृद्ध असल्यानें त्यानें आपल्या ह्या तरुण पत्नीला प्रसन्न ठेवण्यासाठी मनसोक्त आचरण करण्याची मोकळीक तिला ठेवली होती. स्वातंत्र्य, तारुण्य, सोंदर्य, नेसर्गिक वत्तिचांचल्य, दुःसंगति व अपार धनवेभव इतक्या सर्वे गोष्टींचा एकत्र समुच्चय सोफियाच्या ठायीं होतांच ती ताळतंत्र सोडून बेफामपणानें वार्गू लागली यांत आश्चर्य तें काय ! तिच्या बेफाम वर्तनाला तेव्ह्ांच्या चालीरीतींप्रमाणें फक्त एकाच गोष्टीचा आळा होता. आजकालच्या युरोपाय समाजाप्रमाणे त्या काळी स्त्रियांना पुरुषांत मोकळेपणाने सरास मिसळण्याची मोकळीक नव्हती, त्यामुळे सोफियाला उजळ माथ्याने समाजांत वावरतां येत नत इतकेंच काय ते; पण पडद्याआड पाहिजे तसें वतन ठेवावयाला तिळा कोणताच आडपडदा नव्हता. त्य़ा काळच्या चाली-रीतीप्रमाणें सोफिया इतर जनाना हटकून दिसावयाची ती फक्त प्रार्थनामांदेरांत जातांना. त्या वेळां ती भरजरी रेशमी पोश्याक करी. तोंडाला सुवासिक्र उटणी फांशी. तिच्या पोलव्याला व झअग्याला लक्षावधि रुपये मोलाच्या मर्भिमॉक्तिकांच्या किनारी लावलेल्या असत. ती आपल्या मस्तकावर एखाद्या मह्वाराणीच्या सुकटाशीं स्पर्धा करणारा मणिमुक्ताखचित अलंकार धारण करी. तिच्या दंडात काहींत बाजबंदांसारखे रत्नखचित अलंकार असत. ग. यांत टपोऱ्या मोत्यांचा हार असे व ह्वातांत ह्विऱ्याच्या बांगडया असत. उ'बड्या अंगानें बाहेर पडावयाचे नाद्दी म्हणून तो पायांपासून डोकीपर्यत रेशमी बुरखा घेई; पण त्या घुरख्यालाही बहुमोल मोत्यांची (नार असे व तो बुरखा इतका झिरझिरीत असे की पहाणाऱ्या लोकांनाच काय, पण खुद्द तिलाह्दी आपण बरखा घेतला आहे असा भास देखील होऊं नये. ती अशा वेळीं पायांत मोजे
टन-----८. अना कटा टला ट््ाऱ->>>.__ त. --- -_->---- र
५ 00-72. या
बसून प्रार्थनामंदिरांत जात. त्या स्त्रिया पायांत मोजे न घालतां मोत्यांनीं मढ- बेलेळे सपाट पायांत घालीत. त्या सपाटांची टांच समारे सहा इंच तरी उंच असे. त्या स्त्रिया गालांना रंग फांशीत. मेदिरांत पोचल्यावर एक दोन नोकर त्यांना धरून आंत नेत, कारण उंच टांचांमुळें त्यांना मुळींच चालतां येत नसे. ह्याप्रमाणे मंदिरांत दद्ा्वाळीस पावलें चाळून जाण्यास त्यांना निदान पाव तास तरी लागे. अक्षा मंदगतीने 'वालणें ह तेव्हां मोठ्या स*यपणाचे लक्षण समजलें जात असे'.--सरदेसाईळत “ब्रिटिश रियासत' (पूर्वार्ध).
२६ पेशवाईतील धर्मसंग्राम
न घालता उघड्या पायांत फाल्च उंच टांचांचे मोत्यांनां मढविळेळे भरजरी सपाट घाली. अशा थाटानें ती भरगच्ची पालखींत बसून खास पहार््यांतून प्रार्थना-मैदिराकडे निघाली की, लोक नुसते तिच्याकडे मंत्रमुग्धाप्रमार्णे टकमक पहात जागजागी उभे राहात. तिच्या पहारेकऱ्यांचा एकंद्र थाटमाट तिच्या! थाटमाटाला साजेसाच असे व आपणाप्रमारणेंच रूपानें संदर व उमद्या अशाच पहारकऱ्यांची ती नेहमीं निवड करी. तो प्रार्थना मेदिरापाशीं जाऊन पोचली काँ तिला हात देऊन आंत चालवीत नेण्यासाठी बरोबरच्या पहारेकऱ्यांत अह- महमिका सरू होई. दरवाजापासून बेठकीपर्यंत जाईतो तिला अर्धी घटका तरी वेळ लागे. एवढ्या वेळांत प्रार्थनामदिरांतील लर्व लोक वभुक्षित नजरेने तिच्याकडे टेक लावन पहात बसत. प्राथना आटोपून परत येतांनाही हया'च गोष्टींची पुनरा वाते होई. सोफयांच्या सोदर्याने व डामडोलाने तेव्हां ठाण्याच्या ख्रिस्ती रहि- बाशांना इतके वेडावून सोडले होतें को, कथोहा प्रार्थनामादेरांत न येणारे लोकही थ्या दिवशी रोफया प्राथना मादेरांत येई, त्या दिवशी हटकून तेथे येत. तेवढ्या साठा ते साफया कधी प्रार्थनामादिरांत कोणत्या दिवशी जाणार याबद्दल बातमी काढण्यांत तत्पर असत, व बातमीदारांनाही अशा बातम्या पाचवृन योग्य किफायत करतां येई.
पण एथेंहो पुन्हा सोफियाच्या देवाने दया दिला. ती आपल्या तेनातीतील एका हलकट पण छानछोकोच्या उडाणरप्पू तरुणाच्या नादी लागली. त्या नादी: पणाचा द्वा हां म्हणतां इतका कळस झाला काँ, त्या लफंग्या माणसाच्या साह्षानें [तेने प्रत्यक्ष आपल्या नवऱ्याला विष चारून ठार मारण्याचा बेत केला. तिच्या दुदवाने तो वेत सिद्धोळा जाण्यापूर्वीच उघडकीला आला व तिच्या नवऱ्याने तिच्याशी काडीमोड करून तिला आपल्या घराबाहेर काढून दिलें. ज्या लफंग्याच्या नादाने तिनें हे आसुरी कृत्य आरंमिलें होतें, त्याला मात्र देहान्त शासन मिळाले. आणि हा प्रकार तिचे त्या किछेदाराशीं दुसर लम लागल्यावर अवघ्या एका वर्षोत झाला तेव्हां तिच्या वयाला सोळावे वर्षही पुरें झाले नव्हतें.
एवढ्यावरच सोफियाचचें भाग्यचक्क थांवलें नव्हतें. तिच्या आयुष्याचे धिंडवडे अजुन निघावयाचे होते. वरच्याप्रमाणेंच आणखी दोन वेळां तिच्या विवाहाचा योग जुळत आला. पेकी पहिल्या म्हणजे एकूण तिसऱ्या वेळचा तिचा पाते हा एक पोर्तुगीज सरदार होता. तो एकंद्रींत सोफियाला प्रिय वाटणारा असाच
7९)
सोफिया प तरुण, मान्यतेचा व वेनवतपन्न पात होता; आणि त्याच्या संगतींत सोफियाचीं दोन वर्षे सुखाने गेळा. पण तो सरदारही नादी होता, व त्या नादापायींच त्याचा ठाण्याच्या किल््यांत एके दिवशीं खून झाला. खरा प्रकार असा को, त्याचा खून झाला, पण लोकापवाद मात्र असा उत्पन्न झाला कॉ,सोफियानें मारकरी घालून त्याला ठार केलें. तिने आपल्यापूर्वीच्या पताला विषप्रयोग करून ठार मारण्याचा व्यृह् रावेला होता ही गो2 जगजाहीर असल्यानें असा लाकापवाद उत्पन्न होऊं शकला; व तो हां हां म्हणतां इतका विकोपाला गेला को, अखेर धर्मशासनमंडळासमोर सोफियाची पतिहत्येच्या अपराधाबद्दल रीतसर चौकशी होऊन तिला मुंडण करून जिवंत जाळण्याची शिक्ष! ठोठावली गेळो. पण त्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापू ज्रींच सोफिया तुरुंगावरील लांचखाऊ बाटग्या अधिकाऱ्याचे हात ओले करून तंथून निसटली व थेर गोव्याला पळुत गेली.
गोव्यांतच काय, पथ्वीड्या कोणत्याही भागावर गेलें तरी मानवजातीचे सर्व- साधारण नेसार्गेक मनोविकार थोडेच बदललेले असणार ! सोफिया जी गोव्यांत गेली, ती एकदम योनिनी बनून तेथल्या एका मठांत वास्तव्य करू लागली या ठिकाणींही तिच्या तारुण्याने व सांदर्याने तिला दंगा दिला म्हणावें किंवा त्या दोन साधनांचा तिने स्वार्थसद्धीक3 उपयोग करून घेतला म्हणावे, त्या नव्या दिशेनें तिच्या आयुग्यांची नोक कांही काळ म्हणजे सुमारें एक दोन वर्षे सुरळीत- पर्णे चालली व अखेर नी एकवार जी अथांग भवसागरांत वहात गेलो, ती पुन्ह्म मार्गाला लागली नाही. योगिनी म्हणून आयुष्य कंठीत असतांनाच तिचा तेथल्या गव्हूर्नराच्या पुतण्याशीं-लुई बुथेलो या नांवाच्या एका तरुण व वैभव. शाली लष्करी अधिकाऱ्याशी-परिचय झाला, व थोडधाच दिवसांत त्या परिचया- चे प्रेमांत रूपान्तर होऊन त्या दोघांचें लमन झालें. लझञानंतर लौकरच लई बुथेलो- ची ठाण्या'चा किठेदार म्हणून नेमणूक झाली व अर्थांतच सोफिया त्याच्याबरोबर ठाण्याला आली. ती ठाण्याची राणी म्हणून सत्ता गाजवू लागली. पुन्हा ततचा थाटमाट सुरू झाला, रंगढंग सुरू झाल, सर्व कांद्दी पूर्ववत सुरू झाले.
पण लुई बुथेलो सोफियाइतका सुंदर नव्हता व तो हडेलह्वप्पी गडी होता. तो सोफियाला फार दिवस प्रसन्न ठेव क्कला नाहीं. त्याच्या संसारांत सोफिग्र; दिवस कंठीत असतांना तिच्या प्रेमसंवेंधाला पुन्हा फांटे पुटं लागले. त्याच सुमारालळ बुथेलोळा त्या प्रांताचा मुख्य सेनापात नेमण्यांत आले. अर्थात ती योगायोगाची
२८ पेशवाईतील धरमसंप्राम
गोष्ट होती. मराठ्यांनी बुथेलोच्य़ा शिरजोरपणामुळें चिडून, त्याने प्रत्यक्ष पेशव्यांना एका प्रसंगीं तडजोडीच्या बोलण्यांत शिव्या देऊन त्यांचा अपमान केला होता तो डाव मनांत धरून व ठाण्याचा ढा काबीज करण्याचा निर्धार करून किळथाला वेढा । दिला, तेव्हां बुथेलळोन मुंबईकर इंग्रजांना विनेति करून त्यांच्यापासून कांही युद्ध" साहित्य व कांही चांगले गोलंदाज मागविले, इंग्रजांनीं बुथेलोच्या मागणीप्रमाणे नाहीं तरी कांही अंशीं त्याला मदत केली. तेव्हां मुंबईहून जे गोलंदाज ठाण्याला आले, त्यांत राबटसन या नांवाचा एक धाडसी व सुंदर असा अविवाहित गोलंदाज तरुण होता. राबर्टसन गोलदाजीच्या कामांत चांगलाच वाकबगार होता. त्याची मडमकी पाहून सोफिया त्याच्यावर आषक झाली. पण ह| प्रकार बुथेळी: च्या हाताखालील एक संनानी आल्काझोव्हा १ बुथेलोच्या हाताखालील दुस्यम संनापाति पेड़ो डि मेलो यांच्या दटेत्पत्तीला येऊन त्यानी बुथेलोला सावधगिरीची सूऱ्वना दिली. बुथेलोने ताबडतोब राबटंसनला पकडून धर्मशासनमंडळासमोर हजर केलें व त्या मंडळाने रॉबटसनला हद्पारीची शिक्षा ठोठावली, वास्तविक त्याला प्राणदेडाचीच शिक्षा व्हावयाची, पण तो इंग्रजाचा प्रजाजन व सेवक असल्यानें हृद्पारांच्या शिक्षेवर बचावला.
पण रोबटसनने जाता जातां ह्या गोटीबद्दल बुथेलोवर साधला तेवढा तूड धतला. त्यानें इंग्रज गोळदाजांना गोळंदाजीच्या कामांत हेतपुरःसर कुचराई करावयाला लावल, आणखीही नाना भानगडी केल्या; व त्यांचा परिणाम अखेर ठाण्याच्या ७ढाइईत बुथेळोच्या माथी अपशयाचें खापर फुटण्यांत झाला. मराठे व पोुंगीज याची खडाजेगीची लढाई होऊन सर्वे पोतुगीज सेन्य त्या लढाईत कापले २ले, मराठ्यांन| ठाण्याचा किळा काबीज केला व बुथेलोला तेथून वसई- कडे पळ काढून आपला जीव बचावावा लागला. ठाण्याचा किछेदार पे्टो 8 मेलो व मुख्य पोलीस अधिक्रारी अन्टोनिओ डि आल्काकोव्ह्या यांना आपल्या मुख्य सेनापतीच्या पळपुटेपणामुळें नाइलाजाने किळ्या मराठयांच्या स्वाधीन करून तेथून निघून जावे लागलें. ही ठाण्याच्या पाडावाची अशुभ वार्ता गोवे एथें गव्हर्नर - जनरळळा कळतांच त्यानें आपल्या पुतण्याला ताबडताब सेनापातिपदावरून दूर केलें व त्याच्या जागीं अँटोनेओ कार्डिम फरो ह्या नव्या अनुभवी व धिम्या स्वभावाच्या सेनापतींची नेमणूक केळी. सोफियाला बुथेला ह कुरूप असल्या-
॥ पारसनीस व किंकेडकृत (हिस्टरी ऑफ दो मराठा पॉपळ', भांग २ रा.
सोफिया २९
“९५००४४४०७४.” ४.” ४-५... “0१. "४.५४%-४४./१५.० ४.४. ९.१५.” ४.४५”/९.९.. ९.४ .”९./४९.%./४*./४१.१ ४५-४४. ४४.४.” ९.१... ५१ /४..५१९.”” २-४१..४ ४४-४१ ५८/४०/१४४४. कळच
मुळें आवडत नव्हताच. शिवाय त्याने तिच्या नूतन प्रियकराला हद्दपार केल्या- मुळें ती त्याच्यावर जास्तच रुष्ट झालो हातो. त्यांत आणखी ह्या नासुष्कीच्या पराजयाची भर पडली. त्यामुळे बुथेलो गोव्याला माघारा जावयाला निघाला तेव्हां सोफिया त्याच्याबरोबर तिकडे न जातां वसईतच कायम राहिली. तिचे वेभव गेले, मान्यता गेली, सर्वत्र चो छोः थूः झालो; तरोहो ती फारशी न डग. मगतां पुन्हा आपले नशीब उद्याला येईल ह्या आशेने आजवरच्या सर्व पतोना नागवून जें काय जडजवाहीर तिच्या गांठीला हातें त्यावर शक्य तों आपला पूर्वीचाच इतमाम कायम ठेवून अनुकूल कालाची वाट पहात होती. आपल्या वांट्याला अशो विपत्न दशा आणिण्याला आल्काकोव्हा व पेंडो डि मेलो हे दोघे कारण झाले हो गोष्ट [तिनें मनांत वागाविलो हाती, व त्या दाघांवर सूड घेण्याची साधि केव्हां प्रास होते अश्या संधीकडे तिचे डोळे लागून राहिले हाते.
इतकी विपत्न दशा प्राप्त झाली, तरी ज्या एका माणसामुळे सोफियाच्या जन्माची अशी होळी झाली होती त्या रॉबर्टसनला तो विसरली नव्हती व तिलाही तो विसरला नव्हता. दोघांचाही गुप्त पत्रव्यवह्ठार सुरू होता व लोकरच योग्य साधे पाहून रॉबर्टसन सोफियाला मुंबईला नेऊन तिच्याशी लम्न लावणार होता. पण दोघांची गांठ कशी पडणार हाच अवघड प्रश्न होता. रोबर्टसनला पोतुगीजांच्या हद्दीत यावयाला बंदी हाती, व सोफियाला वसईची हद्द सोडून बाहेर जाण्याला बंदी होती. तरी पण अक्षा निराशामय अंधारांतही तिळा एक आशेचा किरण सांपडला. सेनापाते अँटोनिओ फ्रो याला मराठयांच्या चढावाच्या धोरणामुळे सर्व काम आंवरतां येईना, व तशांत डि मेलो आणि आल्काकोव्हा हे दोघे महत्त्वाकांक्षी अधिकारी सेनापाति फ्रो याच्या आज्ञेंत वागेनात, तेव्हां गोव्याहून फ्रोच्या जागीं मार्टिनो डि सिल्म्हेरा याची नेमणूक झाली; त्याच वेळी डिसोजा डि पाररा याला वसईचा किल्लेदार नेमण्यांत आलें. ह्या दोन नव्या तडफदार अधिक्राऱ्यांच्या नेमणुकीमुळें पेडठो डि मेलो व आल्काकोव्हा यांचे महत्त्व बरेच कमी झाले. तकशांत नवा सेनापाते मार्टिनो डि सिल्व्हेरा ह्या सोफि- च्या पूर्वपरिवयाचा असल्यानें व सोफियाचे जे कांहीं रंगेल चद्दाते होत त्यांपेकी तो एक असल्याने वारा वाहील तशी पाठ फिरविण्यांत तरत्रेज असलेल्या सोफियाला स्वतःची वसईतील नजरकेदेंतून मुक्तता करून घेण्याइतकी त्याची
३० पेशवाहतील धर्मसंप्राम
कलह 00 -. “४ “1 ४४०४४४ 0५ “० षि शोधा शोफ्शीप्शा “प वी 2९. ९१ “धरा ण. थ्या
मर्जी संपादन करतां आली. तिचा विचार सिल्व्हेाराला आणखी प्रसन्न करून घेऊन त्याच्याशीं लम लावण्याचाही होता. पण इतक्या थोड्या काळांत म्हणजे सुमारे चार पांच वर्षीच्या अवधींत सोफियाचे एका मागन एक चार पति कोणत्या ना कोणत्या कारणानें मत्यूसुखी पडल्यामुळें व सोफिया द्दी दगलबाज खरी आहे असाही तिच्या नांवाचा सर्वत्र बश्ना ज्ञाल्याकारणानें “ती नवरे खाणारी लांस आहे व तिचा सहवास सर्वनाश करणारा आहे' असा सार्वत्रिक समज झाला होता. यासुळें ती तरुण व सेंद्र असतांही कोणी तिच्याशी लग्न करण्याला तयार हाईना. तिच्याविषयीचा हा सार्वत्रिक गैरसमज लोकरच सिल्व्हेराच्या कानीं आला व सिल्व्हेरा स्वभावतःच असल्या शकुन-अपशकुनांवर भरंवसा ठेवणारा असल्यानें त्यानें सोफियाशीं लम करण्याचें धाडस क्रेळें नाहीं. तात्पर्य, सिन्व्हेरापासून फक्त स्वतःची नजरकद टाळण्यापुरताच उपयोग सोफियाला करून वेतां आला. पण त्यानें आपणांशी लम केले नाहीं याबद्दल तिचा लिल्न्हेरावर राग दोता व त्याच्यावरही सूड घेण्याचा तिचा मानस होता. आतां पुढें काय करावयाचें हा प्रश्न सोफियापुढें होताच. तिच्यापाशी जी काय थोडीबहुत पुंजी शोती, ती पूर्वीच्या थाटामाटाने आजवर राहण्यांत खर्च झाली द्रोती. तिचे बहुमोल अलंकारह्ी त्या थाटामाटापार्यी सर्वे संपले होते. वर; ता अप- शकुनी म्हणून चिच्याशीं कोणी लम करावयालाही तयार होइना व ती देशद्रोद्दी म्हणून तिला सरकारांतूनही आश्रय मिळेना. अशा स्थितींत तिला तत्कालीन परिस्थितीला व वूर्वपरंपरेला अनुसरून एकच मार्ग मोकळा होता, तो मिक्षांदेहीचा. पण तो मार्ग अवलंबितांनाही तिनें आपले डामडोळ कायम राखले होते. सुशंगारित म्याना नेंच्यापाशीं होताच व कांहीं नोकर-चाकरही होते. श्रीमती मिक्षांदेहीच्या प्राथमिक तयारीपुरती थोडीशी पुंजीही तिच्या गांठीला होती. शिवाय थोरा- मोग्याची बायको हें नांव, तारुण्य व सोंदर्य ह्या तीन देवी देणग्याही तिच्यापाशी होत्या. त्या सर्व साहित्यांत तिन॑ आणखी एका महत्त्वाच्या साहित्याची भर बातली. देशांत लूटमार करणाऱ्या लोकांच्या एका टोळीपासून तिनें दोन तरुण व सुंदर हिंड मुली थोड्याशा पेशांना विकत घेऊन त्यांना आपल्याबरोबर गिक्षादेदीची दोक्षा दिली व फाद्र पोर्टो या नांवाच्या एका पाद्माच्या थोळखीनें संडपेश्वरक ता त्याच्या वास्तव्यस्थानाशजारीं कान्हेरी येथे एक टमदार घर
क
क॑ णि जिल्ह्यांत बी. बी. अण्ड सी. आय. रलबच्या बॉरवळी रटेशनापासून
सो'फया ३१ विकत घेऊन तेथें वास्तव्य करून तेथून मिक्षांदेहीप्रीत्यर्थ आजूबाजूच्या भागांत संचार सुरू केला.
दरम्यान सोफियाला तिच्या इंग्रज प्रियकराचें पत्र आले. त्यांत पुढील भावार्था- चा मजकूर होता. “ [प्रेय सोफिया !
“ चविमाजीअ'पा पेशव्याच्या मदतीसाठी वसई-ठाण्याकडे कांहीं इंग्रज गोलंदाज रवाना व्हावयाचे आहेन ब त्यांत मीही आहे. अथात आपली मेट होण्याचा हा सुयोग आहे. माझ्या महत्त्वाकांक्षा फार जवर आहेत,
च तुझ्या माझ्या शत्रूंवर सुड घेणे ही त्यांतली एक महत्त्वाकांक्षा आहे पण
आधीं करावें व मग सांगावें ल्ला बाण्याचा मी असल्यानें तूर्त जास्त कांहीं
लिहीत नाहीं. मला तुझें नवीन मकाण तुझ्या पत्रावरून माहीत झालेंच
आहे. तेथें येऊन मी तुला भेटेन. गोरा वांद्र इकडील अपयशाने काळे
तोंड करून माघारा गोव्याला गेला हें बरे झालें. इते.
सदव तुझा रॉबी.?”
पूर्व दिशेस सुमारें पाच मेलांवर कान्हेरी गांव असून तेथील व त्याच्या शेजारी मंडपेश्वर येथील बाद्धांची कोरींवलेणीं फार प्रसिद्ध आहेत. ही लेणीं म्हणजे प्राचीन काळच्या बौद्धांची मोठी वसाहतःच होय. लेण्यांत वोद्धांना रह्वाण्याकरितां खोल्या, प्रार्थनामंदिरे, सभागृहे, समाधिस्थानें वगेरे सर्व सोयी केलेल्या होत्या. लेण्यांतील शिलालेखांवरून तीं हइ०सनच्या दुसऱ्या शतकांत तयार झालीं असे दिसतें. हिंस्थानांत बाद्ध धर्माचा ऱ्हास हइ०सनच्या सहाव्या शतकांत झाला, तरी त्यानंतरही त्या लेण्यांत बोद्धांची वसती होती. त्यामुळेच इ*्सन १५३४ मध्यें पोतुंगीजांनीं साष्टी बेट घेतलें तेव्हां त्यांना तेथें बोद्ध सांपडले. मुंबई बेट पोतं- गाजांच्या ताब्यांत गेलें तेव्हां त्यांच्या मिशनरींची वक्रा2 कान्हेरी-मेडपेथ्वराकडे वळली. तेथील लेण्यांतून त्यांनीं ख्रिस्ती धर्माच्या प्रार्थना सुरू केल्या. हें काम करणारा मुख्य पाद्री ऐंटोनिओ पोर्टो ह्या होय. एका वसई्रांतांत दोन वषाच्या अवधींत त्यानें हजारी लोक बाटावेठे, ह्या पोटीची आठवण फार दिवसपर्यंत लोकांना चागली होती. त्याने कान्हेरी-मेडपेथ्वराच्या लेण्यांत जे बेरागी व साधु सांपडले त्यांना बाटवून लेण्यांत शिस्ती प्रार्थना करण्यास भाग पाडे. हे काम
२२ पेरावाइईतील धमसंप्राम
र > अथथ धा “५/५/५ बटर वड 2.
सदर पत्र सोफियाला मिळाल्यावर बरेच दिवसपर्यंत तिनें आपल्या प्रियतम रौवर्टसनची वाट पाहिली. ती रोज आपल्या इतमामासद्द मिक्षेला बाहेर पडे; पण सहसा वस्तीला परगांवीं रहात नसे. शिवाय रोबर्टसन आला तर ताबडतोब खवर मिळण्यासाठी तिनें एका विश्वासू नोकराला मुद्दाम आपल्या घरा ठेवून दिलें होते. सोफियाला रोबईसनचें पत्र आल्यावर थोड्याच दिवसांत कसलेल्या इप्रज गोळंदाजांची एक टोळी ठाण्याच्या वेड््यांत मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे ह्या पेशव्यांच्या सरदारांना येऊन मिळाल्याचो वार्ता सोकियाच्या कानो आली तेव्हां तिला प्रसन्नतापूर्वक वाटलें कॉ, 'आपल| राबी त्या टोळॉंत खास असेल'. लगेच थोड्या दिवसांनी ठाण्याच्या वेद्च्यांत पेडो 15 मेलो हा एका इंग्रज गोळंदाजाच्या तोफेच्या गो>्याला बळो पडला--व त्यामळे पोतुगीज त्यानें सरकारचे व फांजेचें पाठबळ घेऊन जबरदस्तीने केले, क्ला त्रहीकरणाला अडथळा करणारांचा अतोनात छळ करण्यांत आला. श्या लेण्यांत मुरूुय चेत्य जेथें आहे, तेथे सेंट मायकेलचे मादिर स्थापन करण्यांत आले. हली त्या लेण्यांत ख्रिसी धमाची कांहींच खूण सांपडत नाहीं. मराठ्यांनी वसई काबीज केली तेव्हां त्या लेण्यांतील व सभोवारच्या प्रांतांतील ख्लिस्ती धर्माची चिन्हे त्यांनीं पार नष्ट केलो. मात्र ख्रिस्ती लोकांनो भम केलेल्या मूतांच कांहों अवशेष तेथे अजनही पहावयास सांपडतात, होच ख्रिस्ती धर्माची खूण हाय ! फादर पोर्टो मंडपेश्वर येथें आला, तेव्हां तेथे सुमारें पन्नास योगी हाते. ते एकदम भिऊन पळून गेळे. नंतर त्यानें देवालयांत जाऊन त्याचे स्रिस्ती मांदेर बनांवेलें. पुडे ह्याच ठिकाणी पोतुगीज राजा तिसरा जॉन याने बाटलल्या लोकांच्या मुलांकारेतां एक विद्यापीठ स्थापन केले, आणि त्याच्या खचासाठी पूर्वीच्या हिंर मादेरांचे सर्वे उत्पन्न लावून दिले. ह्या मंदिराचे सभाग्रह्ह फार मोठें म्हणजे शभर हात लांब व तोस हात रंद होतें. तेथे पांच ख्रिस्ती धमंगुरु तेव्हां रद्दात असून त्यांना सालीना दौडशें खंडी तां;ळांची नेमणक्र होती पुढे मराठ्यांनी हें विद्यापोठ मोडून त्याचीं लांकडें ठाण्यास नेली व हिं] देवदेवतांच्या माते ख्रिस्ती लोकांना चुन्याने वुजविल्या होत्या, त्या पुन्हा उघड्या करून पूवंवत् त्यांची पूजा सुरू केली.
-- प्र डफनें ह्या प्रसंगीं एंटोनिओ फ्रो मारला गेला असे म्हटले आहे. तें 'चुकीचें आहे. कारण इस्माइल ग्रेिशिअस यानें आपल्या “(0) 011610९
सोफिया ३३
अहा न कल “2 7१८४५९८-१ नट २. "न - “८ ४५८८५८८*५४८४- “६ “ध्या यी 2८ अहा *£“०५ “टोध्टप- 0४% "२८०५५७७९४५
सैन्याची दाणादाण उडून ठाण्याचा किला पूर्णपणे मराठ्यांच्या स्वाधीन झाला अशी बातमो आली. तेव्हां सोफिया मतांत म्हणाली काँ, 'माझ्य़ा राबानेच डि मेलोवर ह्या सूड घेतला असेल. खासं झाले'. पग काय असेल तें असो, रौबटसन कांही सोफियाला भेटला नाहीं. तो आज भेटेल, उद्यां भेटेळ, अशी सोफियाला पुढे कैक दिवस आशा वाटत होती; पण फुकट ! ठाण्याच्या किळयावर मराठ्यांना दुसरा विजय प्राप्त होऊन करिळा कायमचा त्यांच्या अंमलांत आल्याला आज उणेपुरे सहा महिने लोटले होते, तरी रोबर्टसनचा पता नव्हता. रावर्टसन जर जिवंत असता तर आपणांला खास भेटला असता अशी सोफियाची खात्री होती, व चया अर्थी तो इतक्या दिवसांत भेटला नाहो त्या अथी तो त्याच वेत्यांत ठार झाला अशी सोफियेने आपल्या मनाची समजूत करून घेतली होती.
4
सोफियाची तिच्या इंग्रज म्रियकराच्या बाबतींत निराशा झाली एवढी एक अखेरची गोष्ट सोडून दिली तर तिन मिक्षांदोहे पक्तरल्यापासूत त्या धग्नांत तिला चां लीच किफायत होत होती. मात्र ती तिच्या अकलेची किफायत हाती, केवळ धद्यांतील किफायत होती असें नाही. ती मिक्षेकरीण असली तरी बडी मिक्षकराण होतो. अर्थात् ती बड्या बड्या लोकांकडे भिक्षेला जाई. गतकालांतील थोरपणा, वर्तमानकाळांत देखील उपलब्ध असलेल्या तारुण्य व सोंदर्य द्या दैवा देणग्या मधुर व चितवेधक भाषण, हृदयस्पर्शी नेत्रकटाक्ष, नवलाईचा डामडाळ, नाते-अनीतीविषयीं बेफिकिरी, मोहरु रूपाच्या सोंदर्यवती तरुण मुलोंचा लवाजमा, व गोरी कातडी एवढ्या सर्वे अमोघ मूर्तामूर्त शक्ति सोफियाच्या ठायीं एकवटल्या गेलेः्या असल्यानें ती जेथ जेथें म्हणून भिक्षेसाठी जाई तेथून तेथून राजशाही थाटाचा पाहुणचार घेऊन माघारी येई. ती कोठेंहा भिक्षा मागे ती मिक्षा म्हणून न मागतां जणु काय खंडणी म्हणून मागे, प्रस्तुतच्या धर्मसंग्रामांत पोर्तुगीजांना यशप्रा्ते होण्यासाठी देवा धमीच्या नांवावर दान म्हणन मागे, किंवा तसाच कोणा रंगेल गडी भेटला तर तो तिच्यावरच फिदा होऊन तिला अलोट पेसा देत असे. खडणी मागावयाची ती
7>ळपट्टण256' ह्या प्रथांत पोर्तुगीज सरकाराकडून या बाबतींत मुंबईच्या गव्हनरला ता. ४॥१॥9७३२ रोजी लिहिलेलें पत्र दिलें आहे, त्यावरून मारला
गेलेला सेनापाते पेट्रो ३ मेलो हाच हाता याविषयीं संशय उरत नाहीं ५६ २. ८ _
३४ पेशवाइतीळ धमेसंप्राम
गध्हकाट ७ टक नात नका काट “५८५८१ “> /--५५/९-५५०६७७४५-५../५०५५८. ०३४९७१०५५०... ०५०७ “00/२.»९९.. 4१०९०८० १४०९४१ १६७४९ “0. /.७ कळक. य ककेलीी)
मरहूम गोऱ्या किळेदाराची पत्नी म्हणून, देणगी मागावयाची ती बाटग्या लोकांच्या सुखसोयींसाठीं, व दान मागावयाचें ते॑धर्मसंप्रामांत ठार झालेल्या सैनिकांच्या अनाथ-अपंग बायकापोरांना पोसण्यासाठी. गोऱ्या कातडीचे लोक जात्यमिमानाला न धर्माभिमानाला बळी पडून तिला द्रव्यसाहाय्य करीत; काया कातडीचे लोक साहेबी गोऱ्या कातडीला भिऊन तिची तुंबडी भरीत; व रंगेल लोक तिच्या आणि ठिच्या बरोबरच्या मिक्षेकरी सुंदर मुलींच्या रसाळ थोवन-सोंदर्यांला भाळून तिची धत करीत.
त्या सुंदर व तरुण मुली सोफियानें कोठून व कशा पेदा केल्या होत्या, हं पाहुण्याची आतांच घाई करण्याचें कारण नाहो. तूर्त सोफियाच्या जीवनवृत्ता- न्ताची स्थूल रूपरेखा आपणांसमोर आहे तेवढी पुरे आहे.
व _ प्रकरण दुसरें अनोळा 'किडयावर कहर पेक्षवे व चिमाजीअप्पा यांनीं आपल्या सर्व सरंदाराना अर्ना्या- वर% एकत्र जमवुन सर्वांच्या विचाराने वसईच्या मोहिमेची पुढील नेव्ित रूपरेखा आंखण्याचें ठरावेले होतें द्वे पूर्वा निवेदन करण्यात आलेच आहे. त्या- प्रमाणे आज म्हणजे चुळणें गांवांत अनर्थ च,ळला होता, त्याच दिवशीं मल्ह्वार-
* अर्नाळा ह्या गांव वसईपासून उत्तरला सुमार॑ पंधरा सोळा नेलांच्या अंतरा. वर आहे. येथे वैतरणी नदी समद्राळा मिळते व त्यामुळें ते पवित्र क्षेत्र गणे आहे. सोमवती वगेरे पर्वणींच्या वेळीं पुषकळ भाविक ळोक ह्या क्षेत्रावर ससुद्र- स्नानासाठी येतात. ह ब्रेदरही आहे. गांवापासून पाऊण मावर समुद्रांत अर्नाळा हा जंजिरा कळ्या आहे. तो फार मजजूत आहे. मराठ्यांनी वसईच्या मोहिमेंव इ० सन १७३७ मध्ये हा किळा पोठुनीजापासून जिकून धेतला. त्या वेळीं तो किल्ला म्हणजे एक सामान्य गढी होती. पण लनच बाजीरावांनी वसइशजारी वसईशीं टक्कर देणारे तितकेच मजबूत ठाणें मराठ्यांच्या ह.ती असलें पाहिजे असें पाहून सभ्याचवा मजबूत किछा पुढील मोहिमचं धोरण राखन बांध,वेला. याविषयीं किळयाच्या दरवाज्यावर पढीलप्रमाणे शलाळेख आहे--'बाजाराव अमात्य मख्य सुमती आज्ञापिळें शंकरा । पा्यात्यात बघून (तिघु उदरा बाधा त्वर जोजरा । अर्नाळा जल.र्ग सितुनि मनीं बाजी तुळाजी सुता । शिल्पे ट्ढ शोर्ये जाणुबि तया दुर्गाख्रि संस्थापिता ॥ अंक"बाण"रस" चंद्र ' शकात । ज्येष्ठ (वगळ शिन्तेदु दिनात । रोद्दिणी प्रव सुपुष्याहे जेव्हां । यशवंत बुरुजा करि पेव्हा ॥ ह्वा झला बांधणारा बाजी तुळाजी याचें देऊळ किळ्यावर आहे. शिवाय पेशव्यांच्या १ेळची आणखी कांही देवळेंही आहेत. किल़॒यांत व बेद्रावर कोळी लोकांची बरीच वत्ती आहे. हवे लोक माधळी मारण्याचा धंदा करितात. ह्या लोकांत झिस्ती कोळी ब हिंदु कोळी अशा दोन जाती आहेत; तरी त्यांच्यामधील र[तिरिवाज, आचः:र- विचार व पोषाऊ यांत फारसा फरक्त नाही. खिर्स्त कोळी (ददूम्रमाणें शेंडी राखतात, हिंदु पद्धतीची नांवें ठेवतात व हिंदूंचे सणदी करितात. अर्थात् हे लोक योठुंगीज अंमलांत बाटून नांवाला खिस्ती झाले आहेत.
३१६ परावाइतालट धमसम्राम
२“:
राव होळकर, राणाजा शिंदे, मानाजो आंग्रे, गंगाजी नाईक, अंताजी रघुनाथ खंडूजी माणकर द्वा प्रमुख मंडळी तेथे जमा झाली होती. विठ्ठल शिवदेव, जोशो पटवर्धन वगरे मंडळी ठिकाठेकाणच्या बैदोबस्तासाठा गुंतून पडल्यामुळे आलो नव्हती, तरी पुढील योजना तेथें जमणाऱ्या मंडळीला निश्चितपणे ठरावेतां यावी म्हणून त्या मंडळोने त्या दिवसापर्यंतचा आपणाकडील इत्थंभत वृत्तान्त हरां- ग्राफत पेशव्यांना कळविला हाता. त्यावरून सर्वे परिस्थितीचा विचार करून पुढील धोरण ठरविण्यासाठी पूतॉक्त मंडळीचा खासगी बेठक किल्ल्यावरील एका भञ्य सुञंगारित वाड्यांत पेशवे बॅ: वास्तव्य होते त्या वाड्यांतील प्रशस्त दिवाणखान्यांत सायंकाळां भरली होती.
त्या बेठकींत बराच वेळ सर्व साधकबाधक गोष्टींचा खळ झाला; वसई काबीज करून फिरग्यांचें तेथून कायमचे उच्चाटण करीपर्यंत मोहिमेचे कार्य पूर्ववत अर्धवट सोडून जावयाचे नाहो. असाच बाजिरावांशिवाय इतर सर्वोचा स्पष्ट निर्धार दिसून आला; पण बाजिरावांना कांही ते पटेना. परंतु आपणांला हें पटत चाहीं असे स्पष्टपणें सांगण्याचीहोी त्यांची छाती होइना. कोणीं कोणतीही गोष्ट सुचविली तरी 'ठौक आहे', 'बरे आई' अश्या उडवाउडवोच्या उत्तरांनी ते त्यांची योळवण करूं लागले. त्यामुळें इतरांचा बराच कोंडमारा झाला. श्रीमत मोकल्या भनानें बोलत नाहाोत, मग आपण तरी कसें बोलावे, क्षा विचाराने जोतो द्वातचे राखून बालू लागला, त्या मंडळात विशेष निस्पृह व पोतुगीज अत्याचारात पूणेपण हारपळून निघालेले असे गंगाजी नाईक, अंताजीपंत कावळे व खंडूजी माणकर हे होते. त्यांना बाजिरावांची मुग्धता पाहून चीड आली. त्यांतल्या त्यांत गंगाजी नाईक हे सर्वोत वयोवरद्ध, ज्ञानवद्ध, तपोवृद्ध व भौष्माप्रमाणे शूर असून आज सतत पन्नास वर्षे पोर्तुगीजांशीं झगडत आलेले, त्या झगड्यांतच ते स॒र्बस्वावर पाणी सोडून देशासाठी सर्वसेगपरित्यागी बेरागी बनलेले,-- तेव्हां
-- वसईच्या धमंसम्रामाचे मूळ उत्पादक गंगाजी नाईक हे होत. गंगाजी नाइकांचा वश फार पुरातन असून त्या प्रांती च दा परगण्यांत नाइकांची सत्ता शेती. गंगाजी नाइकांना आणखी बुबाजी, शिवाजी, मुरारजी व नारायणजी असे थाकटे धु होते. नाइकांचा वंशविस्तारहा तेव्हां फार मोठा असून वांदे, वेसारवे, झाणं, अणजर, कळंबे वगरे त्यांच्या मालकीच्या अनेक गांवांत वभवसंपतन्न नाइकांचे वंश नांदत द्दोत. गंगाजी नाईक हे त्यांतील प्रमुख. पोवुंगरीजांच्या
अनोळा किछ्ठयावर ३७
॥-०-७-2७ ह यक नल
खंडूजी माणकर, अंताजी रघुनाथ वगेरे मंडळी त्यांनाच एकोकडे म्हणाली, * बाबा, वाऱ्यावर वरात व दर्यावर हवाला या न्यायाची टोलवाटोलवी आतां - पुष्कळ झाली. श्रीमत जे आपल्या बेताला मनमोकळेपणानें उत्तर देत नाहींत, तें त्यांच्या मनांत आहे तरी काय हं त्यांना एकदां विचारा तर खरं! ”
गंगाजी नाइकाच्या मनांतद्दी तेंच होते. तशांत त्यांना इतर सर्व मंडळींचे साह्य मिळतांच अधिकच धीर आला. त्यांनी 'विचारतोंच त्यांना, एकदां काय तो सोक्षमोक्ष झालेला बरा' असे म्हणन बाजिरावांना विचारलें, '“ श्रीसंत । आपण स्पष्टपणे का बोलत नाहीं! आपला बेत काय आहे तें तरी आम्हांला कळुंद्या!”
“ आम्ही तुम्हां मंडळींच्या बाहेर थोडेच आहों ! ” बाजीराव म्हणाले. * तुम्ही सवार्ना मिळन पर्ण विवार करून काय तें ठरवा, त्यांत आम्ह्दी आद्दॉ.” गेगाजी नाइकांना बाजिरावांच्या ह्या कायम ठशाच्या उत्तराचा राग आला. ते
संतानी सततचा त्या प्राता फेलाव होऊ लागताच प्रथम त्या संतानांना जोराचा विरोध गंगाजी नाइकांनींच केला. पण दुदवाने तयांचा इलाज चालळेनासा होऊन त्यांना पराजय व छळ सद्दन कराव लागला. त्या छळांत त्यांच्या कुटुंब्रांतील कैक पुरुष-स्त्रिया-मुळें ठार झालीं व सव नाईक वेश देशोधडीला लागला. त्या प्रळयांतून जी थोडी भंडळी बचावली, त्यांत गंगाजी वगरे चोघे बंधु बचावले; ते चोघे चार दिशांना पांगळे. हा प्रळय निवारण्यासाठी गेगाजी नाइकांनीं थोर तपश्चया कळी व त्यांना सिद्दिविनायकाचा साक्षात्कार होऊन आक्षांवाद मिळाला. गरगाजी नाईक सर्वस्षगपरित्याग करून तपस्वी बनले होते; पण गुरूंच्या आज्ञेश्रमाणे त्यांना पुन्ह्या आपल्या देशाचा संसार शिरावर ध्यावा लागला; त्यांनीं आपल्या मायभूमीच्या दास्यविमोचनार्थ पुन्हा शसत्रप्रदूण कलें त्यांना त्यांच्या बंधूंचा व अंताजीपंत कावळे, खंडूजी माणकर वगेर् इतर स्वानि- मानी दोरांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. पेशव्यांना ह्या मंडळीनेंच वसईच्या मोहिमेचा उद्योग हातीं घ्यावयास लावलें व त्यांना सवतोपरी साह्य केळे. असा वत्तान्त गंगाजी नाइकांच्या विद्यमान वंशजांकडून मिळतो. थोरल्या संभाजीमद्वाराजांच्या कारकीर्दीत गंगाजी नाइकांनी फिरग्यांविरुद्ध तक्रारी मद्वाराजांपाशी नेल्या होत्या ब वसईच्या मोहिमेनेतरद्दी कांडी काळ नाईक जिवंत होते, यावरून वसईच्या मोहिमेच्या सुमाराला नाईक पाऊणशे वर्षांच्या धरांत तरी खास असावेत
३८ परावाइतोल धर्मसंप्राम
“लशी टट- एटा -द "८2० “ १- “ ा५->->-“->-- नावाचा स प
रागाळा येऊन म्हणा”. “ श्रामत, असल कोरड आशोवाद आम्हांछा नका आहेत |! मी माझ्या देशाच्या, धर्माच्या व समाजाच्या विर कल्याणासाठाॉ फिरग्यांच्या अत्याचारांना विरोध करतां करतां रावणाच्या चोदा चाकड्यांच्या राज्याप्रमाणे माझी चादा परगण्यांची अपार दालळत गमावून बसलो ! माझ्या वैशांतोलळ शकडो कतंबगार पुरुषांना व बायकामुलांनाही फिरेग्यांना गांजून गाँज़ुन ठार कळे तरीहा मी नमलो नाहो. व आजवर जो अज्ञातवासांत जगला झाहे, ता आपल कोरड आक्यावांद एकण्यासाठो काय ! मी अमळ मासो पायरो सोदन वडालपणाच्या नात्यान अधिक उणा शब्द बोललो तर त्याबद्दल माझ्या वयाकडे व पिकल्या केसांकड पाहून आपण मला क्षमा केलो पाहज; आपले आधाोंच सांगन ठेवतो. असले आशावाद दण्याचा मान माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसांचा आह ज्यांचे कतत्व संपळे व हातो स्मरणी घेऊन 'हारि हारे' करण्याची वेळ आली, त्यांनी असल कारंडे आशावाद द्यावे; हें आपणांसारस्या तरण्याबांड व कर्तबगार राज्यकत्यांचें काम नव्ह. हेच पहा, छत्रपाते शाहूमहाराज क्षा अलम मराठी दनियचे ६नी असता त्यांच्यावर न विसबतां त्यांच नुसते आशी- वाद धऊन आम्हा आज इतकां वष पार्यांपटी करून आपल्या पायांपाशा धांवन येत हाता ते कशासाठी ! नुसत कारडे आशीवांद घेण्यासाठी काय १”
“ मग आम्ह काय कराव अस तमच म्हणण ! ”
“ ही माहीम तिचा साक्षमाक्ष हाइता अशीच जोमाने चाल ठवावयाचो, का आजवर इतको वष धरसाड चाललो आहे तशींच पुढही चाळू ठेवून वांदराच्या जखमसारख हृ काम असच चिघळत ठवावयाचे ते आम्हांला आपण सांगा."
अताजोपंत म्हणाल, “ हो ! आज वोस वर्ष हो वांदराचो जखम एकसारखी चिघळतेचच आहे. ज्यानं यावे त्यान जरा डिवचन पहाव, पुन्हा येरे माझ्या मागल्या ! सध्यां आपणांला भोगावा लागतो आह तो ह्या दिरंगाइचाच पारणाम ! ”
अंताजोपतांचा हा टोमणा पशव्यांना झोबण्याजोगाचच हाता. त्याला नाइकां- नीं आणखी "जोरा दिला. नाइकांनीच प्रथम संभाजीमहाराजांच्या कारकौदांत म्हणजे समारे पन्नास वषापूर्वी मराठ्यांच्या राजदरबारो फिरग्यांच्या अत्याचारां विषयीं गाऱ्हाणी नेलीं हातो व तेव्हांपासून त्यांचा तो कम एकसारखा सुरू होता; पण मराठी दरबारांत आजवर त्या गाऱ्हाण्यांचो लागावी तशी दाद लागली नव्हती त्या गोष्टीला उद्देशून हा टोमणा आहे. हे बाजीराव व चिमाजीअप्पा
अनाळा किछयावर ३१९
ब्टाधल > *८ शल २४- शा शध “र ७ ७.
ह्या दोघांनाही कळले. चिमाजीअप्पांनीं कांहॉ न बोलतां फक्त एकवार बाजि रावांकडे पाहिलें बाजीराव किंचित् रागाला येऊन म्हणाले, “ मंग काय नाईक! तुमचें म्हणणें, को तुमची फिर्याद कानीं येतांच सर्व महत्त्वाच्या राजकारणाच्या भानगडींवर पाणी सोडन आम्ही तमची दाद घेण्यासाठीं फिरंग्यांवर स्वारी करा- वयाची होती!”
नाईक म्हणाले, “ श्रीमंत ! माझें म्हणणें इतकेच की, आपल्या मागें ज्या अनेक महत्त्वाच्या भानगडी झोत्या, त्यांतलाच ही एक होती व ती तशी आपण मानली पाहिजे होती.
“ जो तो आपल्या पुरते पद्धातो. अंताजीबांवा ! नाईक ! तुम्टी जर आमच्या जागीं पेशवे असतां, तर आमच्या अडचणी तुमच्या ध्यानीं आल्या असत्या. घर बां:न पहावें व लग्न करून पहावें असें व्य़वहारांत मुरलेले लोक सांगतात, त्याप्रमाणेंच आम्हीही म्हणतों कॉ, राज्य करून पहावे, म्हणजे राज्यकत्यांच्या अडीअडचणी कळतील. इतरांना त्यांची कल्पना येणे शकय नाहीं. आज सातारा तर उद्यां कनाटक तर परवां दिी, असा एकसारखा धांबपळीचा संचार करतांना भरारीचे पक्षीदेखी” भिरभिरी येऊन दमतील, तिथं हा मराठशाहीचा जगड' व्याळ पसारा आवरतांना आमची क्राय त्रेधा उडत असेल ती आमची आम्हांला माहीत ।
अंताजोपेत म्हृणाले, “ गोष्ट खरी आहे; पण आम्होदेखील -मी काय किंवा नाईक काय --आपल्या पायांपर्यंत गाऱ्हाणी आणलीं, ती केवळ आमची एकेका व्यक्तीची गाऱ्हाणी होती. असें नाहो; साऱ्या अष्टागराची देना फिरंग्यांनीं मांडली, देश बुडाला, धर्म बुडाला, गो ब्राह्मणांचा व दोन दुब -यांचा त्राता कोणी उरला नाहीं, म्हणूनच आम्ही आपल्या पार्यांपर्यंत आलो; “ही पेशवाई आहे कीं झोटिंगपादशाही आहे. असे आपल्या कारभाराला कमीपणा आणणारे उद्गार काढण्याइतका लोक गांजला, यापेक्षां मोगलाई बरी अर्से म्हणं लागला, मराठ शाहींचा व पेशवाई अमलाचा बज कोंकणपद्रीतून कायमचा उडतो कां काय असें भय आम्हांला उत्पन्न माळे, म्हणून आम्हांला तरी इतकी यातायात करावी लागली. जी गत माझी, तीच नाइचांजीही ! उलट मी तर म्हणतो, नाइकांसारखे चौदा परगण्यांचे धनकुबेर जेथें फिरंग्यांच्या अमानुष अत्याचारांत घुळीला मिळून रस्त्यावरचे भ्णंगभिकारी बनले, तिथें आमच्यासारख्यांचा काय पाड ! हृतकेंही
2० वेशबाईतील धर्मसंभ्राम
->-->“*
ऱा लड नय न्या र: 7४८२००५ ४८” “ जीत
करून श्रीमंत ! आम्हांला केवळ आमच्यापुरतेच पहावयाचे असते तर इतको यातायात करून बर आणखी आस्तजनांचा छळ, स्वतःचा छळव दालतापचे वाटाळ करून घेण्याचें कांहीं कारण नव्हते. 'गप्प बसावयाला काय ध्याल" या न्यायाने गोगलगाइंसारख्या गरीबपणाने आमच्याशीं गोडीगलाबीने वागावयाला फिरंगी एका पायावर तयार होता---”
नाईक मध्येच म्हणाले, “ तें सारें मागचे मार्ग जाऊं द्या. आतां पुढचे पहा.
*““ तेंच तर आपण पहातो आहों. नाईक ! अंताजीबाबा ! तुमच्या बोलण्याचा रॉख एकंदरीत असा ।देसतो को, आम्ही वसईच्या मोहिमेकडे मुद्दाम ढलेक्ष करीत आहोॉ--”
“ तस नाहीं. श्रीसंत ! तसे आमचें म्हणणें नाही.” अंताजीपंत म्हणाले.
“ नाहीं कर्स ! हें पहा, तुम्ही इथें भोडमर्वतीचा आड पडदा ठेवन बोलण्याचे कारण नाही. तुमचा आमच्यावर असा आरोप आहे हें आम्ही जाणतो. सव तक्रारी आमच्या कानीं आल्या आहेत. अप्पा मध्येतरीं मोहीम अर्धवट सोडून गेळे त्यामुळे तुम्हां सर्व मेडळींचचा हि मोड झाला खरा.”
“ होय, हिरमोड ज्ञाला खरा.” नाईक म्हणाले. “ धाकट्या श्रीमंतांनी त्या वेळी जावयाला नको हवोते अस अजनही माझें मत आहे.”
चिमाजीअप्पा इतक्रा वेळ स्तव्ध होते ते म्हणाले, “ नाईक ! आम्ही बेफिकिरीनें मोद्दीम अर्धवट सोडून गेळा अस तुम्हाला वाटत असेल, तर तसें नाहीं बरं! उत्तरेकडे बादशाद्दी पक्षाने आम्हांला कसें पॅचांत आणलें होते, निजाम सर्व मराठशाह,हा ग्टकरप्यासाठांकसा 'आ” वासून बसला होता, हं तुम्हांला आम्ही सांगितलें पाहिजे असे नाहीं. श्रीगजाननाच्या कृपेनें व तुम्हां सर्वोच्या पण्याईनें तो प्रसंग यथायोग्य निभावला म्हणन निभावला.% भोपाळच्या युद्धांत जर दुर्देवाने आमचा पराजय झाला असता, तर ति्थेंच मराठी साम्राज्याचा मृत्युलेख लिहिला गेला असता व औरंगजेब बादशहाच्या अमदानींतद्दी हिंदवीची देना झाली नाहीं एवढी देना आज झाली असती. त्या प्रसंगापुढें मूठभर फिरग्यांनी ह्या टीचभर प्रांतांत चालविलेल्या द्नेंची काय मातब्बरी ! ”
- “४ पणिपापा-ााप---“- _ ----_.. -*न-“>> ->- न्या ण पणापाणापपापा --नन्--
'पेशवाईतील उत्तरदिग्विजय' ह्या पुढील कादंबरीत ह्या सविस्तर वत्तान्त यावया'चा भाहे.
अनोळा किलठयावर ४१
“ मूठभर फिरंगी आणि टीचभर प्रांत ! ” गेगाजी नाईक किंचित हंखून म्हणाले. “ पग धाकटे श्रीमंत ! मूठभर वटबीजांतील एकेका कणांत किती जग- डव्याळ वटवृक्ष दडले असतात ! आणि तीन पाउले--फक्त तीन पाउले धरणी बळोराजापा्शीं दान मागणारा वामन तिसऱ्याच पावलाला बळीराजाला कसा सप्तपाताळांत लोटतो ! देव-दानवांची तुलना करणें बरोबर नाही; वामन तो वामन व फिरगडे ते फिरंगडे. पण मनांतळा दावा साधण्यासाठी फळांतल्या आळीचें रूप विषारी तक्षकानें कसें घेतले होते हे आपगाला पुराणांतरी ऐकून माहीत असेलच. हे टोपडे मूठभरसे तुम्हांला वाटतात व तें खरेहो आहे; पण आपण ह्या टीचभर प्रांतांतील रहिवासी असतां, म्हणजे तुम्ह्वांला त्या मूठभर लोकांचा प्रभाव कळून आला असता.”
बाजीराव मुद्दाम त्या गोष्टीला बगल देण्याच्या इराद्याने म्हणाले, «“ बरोबर आहे; पण अप्पा मोहीम अर्धवट सोडन गेळे ते तरी तुमच्यासारख्या पराक्रमी पाठीराख्यांच्या जिवावरच ना! आणि तुम्दींही त्याचा तो विश्वास यथार्थ करून दाखाविला. आजवर ह्या मोहिभेंत जे यश संपादन झालें, तें सारें तुमच्या प्रतापा- चें फळ होय, आणि पुढें तुम्हीच ह्या मोहिमेचा समर्थपणे शेवट लावाल असा आम्हांला पूर्ण भरवसा आहे.”
“ एकूण आपण आतांदेखील ह्या मोहिमेतून अंग काढून घेणार असें दिसते.' नाईक म्हणाले.
“ असा अथं नाही. पण हें पहा, आमच्या उत्तरदिग्वबिजयाची सांगता होण्यापूर्वीच तिकडे नादीरखानाच्या स्वारीचे महाअरिष्ट ओढवले आहे.% दि्ीचे बादशाही तख्त त्या इराणी रावणाने बळजबरीने आपल्या मांडीखाली घातळे आहे. या वेळां सारी दक्षिण एक होऊन त्या अरेरावाला हि,स्थानांतून हुसकून लावूं म्हणेल तरच कांहीं तरणोपाय आहे. बादशाही सत्ता कालपर्यंत आमच्याशी टकरा देऊन इतकी दुबळी झाली आहे कों, नादीरशह्माच काय, दसरा एखादा सामान्य धाडसी दरोडेखोर दिळीवर चालून गेला असता तर त्याला देखील ती सत्ता विरोध
*|लणाण) 0 एहिणणण000 तीण णी पीली णी फट टटन-नप----... पा ---- ल ना: --->.. “> डय
क नादीरशहाची हिंदुस्थानावर फेब्रुवारी १७३९ मध्यें स्वारी झाली. बाजोराव व चिमाजीअप्पा हे त्यापूर्वीच भोपाळच्या वेब्यांत निजामाचा पाडाव करून उत्तरदिग्विजय संपादून जानेवारी १७२९मध्यें माघारे आले होते.
४२ पेशवाईतील धर्मसंप्राम
करण्याला असमर्थ ठरलो असती. दिल्ीचे बादशाही तरुण आज आम्हां मराठ्या - च्या काबृंत असून आमचा हिंऱपदपादशह्ा उद्यां त्या तख्तावर आरूढ व्हावयाचा आहे. बादशद्दा हे एक तख्तनशीन बोलते चालते बाहुले आहे. पण अजुत कांही काळ आम्हांला तो पादशाही सत्तेचा डोलारा तसाच राखला पाहिजे बरें आणखी भय असें कीं, नादीरशहा मुसलमान व बादशह्ााही मुसलमान ! दोघांनीं मिळून संगनमत क्ररून हिं पदपादशाहीचा उद्योग समूळ हाणून पाडण्याचे मनांत आणल्यास त्यांचे काय ध्या ' यास्तव आम्हांला नादोरशहाच्या पारिपत्यासाठी तांतडीने उतर केळे पाहिजे. हो वसईची मोहीम आतां पूर्णपर्णे आपल्या आटोळ्यांत आलो आहे. आतां फिरेग्यांनों वसहचा बळकट किड़्याचा आश्रय केल्यामुळे त्यांना तेथन हुसकून लावणे बरच अवघड आहे खरे; पण त्यासाठीं इथे आपल्या साऱ्या सन्याने किती दिगस अडकून पडावयाचे ! पावसाळा तर डोक्यावर आला आहे. असक दिवसांत क्रिंठा सर होईल अशा कांह च खात्री नाहो. बरं; अपा, मल्हारराव, राणोजबाबा, हो मुरूबी मेडळो इकडे फार दिवस अडकून पडण्यावर आमचा दिठीकडील उद्योगही अपुरा पडणार. धड हेही नाहीं व तेहो नाहो. त्यापक्षां आम्ही म्हणभो, येथला उद्योग तूर्त आहे ह्याच स्थितींत सुरू ठेवून आपण प्रथम सवे लक्ष दिळीकडीळ उद्योगांत घालाव.”
५. आणि इकडे आजवर रगारूपाला आणलेल्या उद्योगावर पाणी पट्टे द्यावे ! आजवर धोपटून अधमेला केलेल्या सप/ला बिळांत आरामशोरपण ताजातवाना होऊं द्यावे आणि तो मनांत दावा धरून दृश करोळ तेव्हां मुकाटपणे मरून जावे ! आपलें बरोबर आहे. आपल्या डो.यांसमोर हिं]पदपादशा्द्दाचें विशाल ध्येय आहे, त्या ध्येयाच्या वाढत्या यशाने आपलो दष्टि दिपून गेळी आहि. इकडे फिरंग्यान आम्हां अष्टागरच्या लोकांचा फडशा केला ब सार॑ अष्टागर स्रिस्वमय बनवून सोडले तर त्याचें आपणांला काय होय ! हृतीच्या पायाखाली मुंगी चिरडलो तर त्यामुळें हत्तोला इजा थोडीच होणार आहे ! श्रीमंत ! हेच आपलें गोत्राह्मणप्रतिपालन-होच आपलो स्वदेशनिष्टा-ह'ःच आपला हिंर- झर्माभिमान-द्दीच आपली कोटमाप हिं] रयतेविषयींचो कळकळ क्वीय ! छत्रपती म्वी मराठशाही व पेशव्यांची पेशवाई यांत ओचित्य़ाच्या ब्टीनें कांहींच अंतर नाहीं असें समजन अलम हिर दुनिया आजवर आपल्या पेशवाईच्या झेंड्याखाली जमा होऊन मरणमोलानें शत्रूशी झगडत आलो त्याचें हेंच फळ काय! तसें
अनाळा किल़धावर ४३
असलें तर आम्ही म्हणतों, 'हो पेशवाई आम्हांला काय होय ! फिरंगी अष्टागरांत अनर्थ मांडतात ना! मांडीनात; अष्टागरांतील लोकांचे जीवित-वित्त-कलत्र 'समूळ नाश पावले तर पावेना; कुठचे काण फिरंगी टोपोवाले कोंकणपटद्टीत बंळॉ मातून बसले आहेत ना! बसेनात, आम्हांला काय त्याचे ! असें आपण्व म्हणू लागलां, तर मग आम्हांलाह्वी म्हणणे प्राप्त आहे को, पेशवाईसत्ता कमजोर झाली, पेशव्यांचा हिंपदपादशाहीचा उद्योग बुडाला, तर आम्हांला काय. त्याचें ! सोय जाणे तो सोयरा ! "नाईक संतापून म्हणाल.
गंगाजी नाहकांचा तो रुद्रावतार पाहून त्या बठकोतील सारे लोक चपापून एकमेकांच्या तोडाकडे पाहूं लागले. नाइकांना तेव्हां रिकस्तीचा आवेश चढला होता. संतापातिशयाने त्यांचें सर्वोग थर थर कांपत हार्वे. डोळे तप्त खादेरां- गाराप्रमाणे लाल झाले होते. त्यांचे सडेतोड बोलणे सर्वांनाच पटण्याजाग होते; पण त्यांतल्या त्यांत अंताजोपंत व खंडूजी माणकर यांना ते विशेष पटल्या सारखें त्यांच्या उत्तेजित चयेंवरून स्पष्ट दिसून आले.
अंताजोपंत म्हणाले, “ श्रीमत ! माझ्या मनांत एक धाका डांचते आहे, ती बोलून दाखवू का?”
“ बाला, खुशाळ बाला. आम्हांला त्याचा राग नाही. आम्ही माणसांचो भतःकरणें ओळखन वाग्रतो. भन्वतरांसारख्या वैद्यान दिळळे ओषध कडू जहर असले तरो आपल्या अगच्या गुणांना ते अमृताप्रमाणें मधुर ठरते. सत्तेपुढें शहाणपण चालत नादी हा जगाचा न्याय असला तरी सत्ता म्हणजे शहाणपण नव्हे हे आम्हा जाणतो. ज्ञानाच्या, अनुभवाच्या व शहाणपणाच्या चार हितकर गोष्टी सांगून आम्हांला कर्तव्यतत्पर करणे हे तुमच्यासारख्या-नाइकांसारख्या वडील माणसांचे कामच आहे.” बाजोराव शांतपणानें उद्गारले.
“ आपल्या ह्या कळकळीच्या उद्गारांनी माझी शका बहुतेक फिटली.” अंताजापत म्हणाले. धडाडलेल्या वडवानलावर पर्जेन्यवाद्रि होऊन तो वडवानल विझून जावा तशी अंताजीबाबांच्या संतापाची अवस्था आलो. ते क्षणभर थांबून पुष्कळच शांतपणान म्हणाल, “ श्रीमत ! होच आपली थोरवी व हेंच आपले वौदीष्ट्य. सत्ता म्हणजे शहाणपण नव्ह हे जितके खर, तितकेच हहो खरे काँ, हाहाणपण वयावर नसते. हाच अलाकिक गुण धाकट्या श्रोमेतांच्याही अंगी आहे, म्हणूनच ही मोहीम आजवर यशस्वी झाली. आमचें शहाणपण झालें तरी
->_ -*-१- ८-५ ७५ एकण
४४ पेशवाईतील धर्मसंप्राम
स्पा “| 2 याट १- “१८ १- ४2 गा ०0०९ ८-: -“ -“-*--८- -- “रा: ममा न्स्ट
आपणांसारख्या खाशांच्या हुकुमाची ताबेदारी कसोशीने करण्याइतकेंच. रावणा- ची ळॅका वानरसेनेने जाळली खरी; पण दाहवारथी रामाची ती वानरसेना होती म्ह्णून 17 '
“ ह्या न्याय खासा ! आधा लेकराचे कान उपटा व मग त्याच्या तोंडावरून प्रेमानें हात फिरवा ! ” बाजीराव स्मितहास्यपूवक उद्गारले. “ बरे, पण अंताजी- बाबा ! तुमची शंका तुम्हीं बोळन दाखविला नाही.”
“ श्रीमंत ! माझी शका फिटली म्हणाला ना? ”
“ नाहीं. तसे नाहो. ती तुम्हीं बोलून स्पष्ट केली पाहिजे. दीकेचे बोज अमर- वेलीपेक्षांही अमर असतें. तिचें साकसुरत निरसन झालेले बरे.” चिमाजीअप्पा म्हणाले. कांहीं क्षणांपू्वी नाइकांच्या कठोर उद्गारांवरून वेठक मोडून मोहिमेचा सर्व मामला "घडतो कों काय अस भय त्यांना वाटत होते. त्यांना भय वाटण्याचे कारण त्यांनींच प्रथमपासून त्या मोहिमत पुढाकार घेतला होता. अंताजीपंत वगेरे मडळोच्या आम्रहाची सत्यता त्यांच्या मनाला पूर्णपणें पटली होती. अंताजीपंत व गंगाजी नाईक हे त्यांचे डावे उजवे ह्वातसे त्या मोहिमेत आरंभापासून वावरत असल्यानें त्या दोघांच्या मर्जाची त्यांना विशेष पर्वा वाटत हाती. त्या दोघांच्या मनांत कोणताही कितु राहिल्यास तो आपणांला मोहिमेच्या अखेरीपावेतों जाचेल, हें ओळखूनच त्यांनीं अंताजीपंतांना आपली शंका बोलून दाखविप्याचा आग्रह केला.
अंताजीपंत म्हणाले, “ नाईक ! तुम्दींच बोला.”
अखेर नाइकांना बोलणे भागच पडलें. ते म्हणाले, “ उभयतां श्रीमंतांचा आप्रहूच आहे म्हणन बोलतो, कांही कांहीं लोकांनीं जातिमत्सराची भुतावळ उठवून ह्या मोहिमेच्या कार्यीलळा अडथळे उत्पन्न करण्याचा लांडा कारभार आरंभिला आहे.”
“ सोडून द्या तो विषय नाईक ! हत्ती आपल्या वाटेने चालला की गल्ली बोळां- तील कुत्री त्याच्यावर भुंकू लागतात, हा त्यांचा स्वभावगुणच आहे. तिकडे आपण लक्ष्य कशाला द्या! ” खंडूजी माणकर म्हणाला.
“ छे छे! हा सोडून देण्यासारखा विषय नाहीं. भुकणें ह्या कुत्र्यांचा स्वभाव- धर्म असला तरी तीं पिसाळून ज्याचे त्याचे चावे घेऊं लागलीं तर त्यांचा योग्य
अनाळा किछ॒यावर ४५
व पऱ्या ५-५ - २-४ ५. री ५ न. 0-८ ५०० 22८ एटी
बॅदोबस्त झालाच पाहिजे. नाईक ! असे कोण कोण विघ्नसंतोषी लोक काय काय लांडेक]रभार करतात तें स्पष्टपणें सांगा.” बाजीराव म्हणाले.
“ श्रीमत ! मी नांवे कोणाची कशीं घेऊं! आम्हांला ह्या मायभमींत रहावयाचे आहे, तोंवर जळांत राहून माशांशीं वेर मांडून आमचा पला यावयाचा नाहीं मी एवढेंच सांगू शकतो कॉ, आम्ही आरंभिलेल्या देशोद्धाराच्या व धर्मोद्वाराच्या कार्योला कांपरख.या मारण्याचा उद्योग सध्यां आपल्यांतीलच मंडळीकडून सुरू आहे. जुनीं भांडणें व मानापमान उकरून काहून आज भांडत बसणें बरोबर नाही हे तर खरे ना!”
*: अगदीं खरे.” बाजीराव म्हणाल.
“ पण अशा अनिष्ट गोटी आज सरास सुरू आहेत व त्यांविषयी तक्रारी केल्या तरी कोणी दाद घ्यावयाला तयार नाहीं. फार काय, रामानंद स्वामींनीं निरपेक्षपणे अलीकडे शुद्धिसघटणाचा व लोकजाग्रतीचा उद्योग आस्थावूर्वक व झपाटयाने चालविला आहे, त्यांनाही ह्या विध्नसंतोषी लोकांनीं पाण्यांत पहावें! ” नाईक म्हणाले.
“ आजवर ह्या गोष्टी आमच्या कानांवर मुळांच आल्या नाहॉत. आल्या असत्या तर आम्हीं ताबडतोब जरूर तो बंदोबस्त केला असता. हच पहाना, रामानंद स्वामींना आम्ही अजून पाहेलेले नाहीं किंवा ते कोणाच्या प्रत्यक्ष माहितीचेही नाहींत. पण त्यांची कार्ते ऐकून त्यांचे कार्य सुकर होईल अशी खबरदारी घ्यावयाला आम्ही कमी करीत आहों का?! रामानंदांच्या साह्याने आपल्या गांवांत शुद्धितघटणाची चळवळ करण्याला प्रोत्लाहन आम्हींच दिलें.” चिमाजी अप्पा म्हणाले.
“ गोष्ट अगदीं खरी; व आम्हीं आजवर ह्या तक्रारी आपणांसमोर आणल्या नाहींत देंद्ी खरे. याचें कारण असें को, असल्या सामान्य गोष्टींत देखील श्रीमंतांना त्रास देणें भामच्या जिवावर येतें. श्रीमेतांच्या मागें थोडे का उद्योग आहेत ! ” अंताजीबाबा म्हणाले.
“ पण ह्या गोष्टी सामान्य नाहीत. विस्तवाची ठिणनी कितीह्दी बारीक असली तरी ती कोरड्या गवतावर पडली कीं वणवा पेटविते.? चिमाजीअप्पा म्हणाले.
9६ पेशवाईतील धमसंप्राम
नट २-४ भाक टी 74 2५2००५५४१८ “>
“ नाइकांनीं सांगितल्या ह्या गोष्टी विस्तवाच्या ठिणगीसारख्याच आहेत. अत्यंत बेजबाबदार व मत्सरग्रसत माणसाखेरीज इतरांच्या हातून असला आगलावेपणा हवेणें शक्य नाहीं.” बाजीराव म्हणाले.
चिमाजीअप्पा म्हणाले, “ असेंच केवळ नाहीं. फाजील धर्मभोळेपणादेखील अश्या गोटी माणसाच्या ह्यातून घडवू शकतो. त्यांतून मत्सरी स्वभावाला धर्म- मोळेपणा'ची जोड मिळाली की मंग ठिणयीचा वणवा पेटावयाला उशीर लागत नाहीं. नाईक! बाबा ! तुमच्या बोलण्याचा रोंख साधारणपणें आमच्या ध्यानीं आला. रामाजीपतांवर तुमचा बोल असावा.”
“ होय, आतां ह्या थराला गोष्टी आल्या तेव्हां स्पष्टच बोलावयाला काय हरकत आहे ! रामाजीपंतांवर तर आमचा बोल आहेच; पण आम्हांला प्रत्यक्ष असे रामाजीपंतांपेक्षां त्यांचे इस्तकच जास्त नडतात. विशेषत: ह्या प्रांतांत सनातन धममातेड म्हणून प्रलिद्ध असलेले विद्दन्सुकटमणि धोंडशास्त्री व निर्मळचे इनामदार भय्याशास्त्री ह्या सासरे-जांवयांचा आडमुठा धर्माभिमान आम्हांढा फार नडतो. हे दोन्ही लोक आम्हीं चालविलेल्या शुद्धिसेघटणाच्या चळवळीला शक्य त्या भल्याबुऱ्या उपायांनी विरोध करावयाला नेहमीं तत्पर असतात. एक पडले जाडे विद्वान् व दुसरे पडले जाडे धनवान; त्यांना विद्वत्ता व धन ह्या जोडगोळीने आमचे प्रयत्न हाणून पाडण्याला चांगलें फावते. बरे, दोघेद्दी रामाजीपंतांचे जिवलग स्नेही असल्यानें रामाजीपंतांचें कृपाछत्र त्यांच्या मस्तक सदा रुळत असतें. आम्ही रामाजीपंताकडे तक्तारी कराव्या व त्यांनीं त्या एका कानानें ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्याव्या, असा प्रकार चालला आहे.” अंताजीपंत म्हणाले.
“ अर्से असेल तर याचा बेदोबस्त ताबडतोब झाला पाहिजे.” बाजीराव चिमाजी अप्पांकडे वळून म्हणाले, “ अप्पा ! ताबडतोब रामाजीपंतांना ताकीद पोॉचती करा, कॉ. तुम्ही धर्मतंबंधीं कामांत मुळींच लुडबुड करतां कामा नये. रामानंदांच्या चळवळीला अडथळा आणतां कामा नये. जे कोणी शुद्दिसंघटणा. च्या चळवळीविरुद्ध दस्त किंवा परदस्ते खटपट करतीळ, ते मन ब्राह्मम असोत, किंवा कोणीही असोत; त्यांना कडक शासन करा असंही त्यांना लिद्दा.” लगेच ते मंडळीकडे वळून म्हणाले, “ भागि तुम्हांलाही आमची अशी परवानगी
अर्नाळा किछठयावर ४७
आहे की, अशा धर्मकार्याला विरोध करणारा कोणीही आढळला तरी त्याला तेथल्या तेथें याद राही असें शासन करीत जा.”
खंडूजी माणकर हात जोडुन म्हणाला, “ सरकार ! त्राह्मणांना आम्ही शासन कसे करावें! ”
“ याच! अर्थ काय |] न्यायाच्या दरबारांत ब्राह्मण-अब्राह्मण ह्या भद नाहीं. अपराथी मग तो त्राह्मण असो किंवा कोणीह्दी असो-अपराधीच ! तुम्हांला त्याचें काय ! सरकारची सेवा करतांना जात, वय, नाते असल्या गोष्टींचा मुळींच विचार करावयाचा नसतो. बरे, तुम्ही जे आतां निर्मळच्या भस्र्याशास्री इनामदाराचें नांव घेतलें, ह्या कोठला कोण ! याला इनामदार कोणीं केले ! ' बाजीरावांनी विचारलें, “ निमंळचे मातडशास्त्री ! ”
“ होय. त्यांचेच हे दतक चिरजीव. नुक्ते पांच वषांपूर्वी मातंडशास्त्री वारले. वारण्यापूर्वी चार दिवस त्यांनीं आपल्या घरचा पुजारी दत्तक घेतला, तेच हे भेय्याशास्त्री.” अंताजीबाबा उत्तरले.
खंडुजी माणकर म्हणाला, “ सरकांर | लोक असेद्दी बोलतात कीं, हे भय्या- शास्त्री व धाडशास्त्री हे दोघेही फिरग्यांचे हस्तक आहेत. त्या दोघांचंद्दी परोळ, मंडपेश्वर, वतई वगेरे ठिकाणच्या पाद्माकडे व वसईच्या मोठमोठ्या फिरंगी अधिक्राऱ्यांकडे वारंवार जाणें येण असते. निमळचा पाद्री तर भस्यासाहेबांचा जिवलग दोस्त आहे. फिरेग्यांचे जासूद वारंवार त्यांना येऊन भटतात, कोठें शुद्धि व्हावयाची असल्यास त्यांना खबर देतात-ऱव ते दोघे अथवा त्यांपेकॉ कोणी तरी एकजण त्या शुद्धिस्थानीं जाऊन बखेड उत्पन्न कस्तात.
“ ते शत्रचे देर आहेत अशी तुमची खात्री आहे! ” बाजिरावांनीं लगेच अंताजीबाबा व नाईक यांच्याकडे वळून विचारले. “ आणि तुमचे देखील असेच मत आहे!”
“ होय. पण ते पडले रामाजीपतांसारख्या थोर अधिकाऱ्यांचे जीवशक्रण्ठश्च स्नेही. त्यांना नांवे कोणीं ठेवावी ! ” अंताजीपंत म्हणाले.
“ ठीक आहे. त्या दोघांनी पुन्हा असा गुन्हा करेला क्री त्यांना पकडून आमच्यातमोर (किंबा अप्पांसमोर हजर करा.-बर; आपडा मोदिभेचा विषय अपुराच राहिला ! ”
“ आतां धाकटया श्रीमेतांनी काय ते सांगावें. ' अंताजीपंत म्हणाले.
४८ पेशवाडतीळ धर्मसंग्राम
शिक “-- > ७ ४८. 70: टप्य*--४८०५०५--५८-५८८ ८५-00 “कळकळ. 1 -----५.-.-५---५----- प्यास भ्टप्ट धक हता ५८... "णी
“ हो, आतां आई वऊेश्वरी* धाकटया श्रीमेतांना काय माते देईल ती खरी. कारण धाकट्या श्रीमंतांनी प्रथम त्या देवाला नमन करूनच मोहिमेच्या क्षेत्रांत पाऊळ टाकले आहे; तिच्या अंगी आम्हां सववोर्चे प्रिय करण्याचें सामर्थ्ये आहे. धाकटे श्रीमतच ह्या मोहिमेंत आमचे प्रारंभापासूनचे पुढारी आहेत. आज दोन तीन वषे ते इकडील सर्वे स्थाति प्रत्यक्ष अवलोकन करीत आहेतच." नाईक म्हणाले,
“ ठौक आहे. अप्पा ! तुम्ही सांगाल ती गोष्ट सर्वोना कवूल तशी आम्हांलाहो कवृल. सांगा, पुढें मोहिमेचे काय करावयाचें !' वसईचा क्रिछा कबजांत येईतो इथेच कुचयून बसावयाचे कों उत्तर दिग्विजयाची सांगता अगोदर करावयाची! ” बाजिरावांनीं चिमाजीअप्पांना प्रश्न केला.
चिमाजीअप्पा उत्तरले, “ तुम्ही तर अगोदर तांतडी करून उत्तर हिंदुस्थानांत जावयाला निघाच.”
“ आम्हांला तर गेळेच पाहिजे. त्यावांचून सुटका नाहं. पण तुम्ही, मल्हारराव, राणोजीबाब्रा, ही विश्वासांतील मंडळी पाठीशीं नसल्यावर आम्ही एकटे तिकडे
--::>:-५-----::-८-:--८८---८५८-0 77:
* ठाणें जिल्ल्लांत भिवडोपासन उत्तरेला सुमारे बारा मलांवर तानसा नदीच्या कांठी वडवली या नांवाचें खेडं आहे. तेथच थोड्या अंतरावर टेकडी च्या उतारावर वड़खखरी या नांवाचें रम्य देवस्थान आहे. त्या देवीच्या हाती वज्र आहे म्हणन वऊखरी हे नांव तिला प्रास झालें असावे. जवळच अनेक उन्हाळी आहेत व लहानमोठी आणखी बरींचशीं देवळेही आहेत. त्यांना वऊराबाईचीं उन्हाळीं असेच म्हणतात. तेथन थोड्या अंतरावर एक भस्माचा डोंगर आहे. यावरून तेथे पूर्वी ज्वालामुखी डोंगर असावा. चिमाजीअप्पा उत्तरंकडून वसईच्या मोहिमेवर यावयाला निघाले तेव्हां मार्गीत त्यांची वज़े शरोला छावणी पडली. माहिभेंत यश मिळण्याविषयीं त्यांनीं व>श्वरीला नवस केला. पुढें मोहीम यरास्वी झाल्यावर त्यांनीं व>शवरीचे सध्यांचें भग्य मोदेर बांरलें. ते देवस्थान एका गोसावी पंथाच्या इनामदाराच्या ताब्यांत आहे. सालीना सध्यां सुमारे बाराशे रुपयांची नेमणक देवस्थानाला आहे. नाईक वगेरे त्या प्रांतींच्या पुरातत वतनदारांकडून देवीला लहान-मोठया नेमणफ सुरू आहेत वेचत मद्दिन्यांत अमावास्येला येथें मोठी यात्रा भरते.
रभ अनाळा किठ्ठयावर ७९ जाऊन काय करणार ! प्रतिनिधी, फत्तेसिंगबाबा भोसले वगेरे मंडळी आमच्याशी मनमोकळेपणाने वागणार नाहींत; दाभाडे, गायकवाड तर सेनापाते चिंबकराव -दाभाड्यांच्या मृत्यूपासून आम्हांला उघड उघड पाण्यांत पाहूं लागले आहेत;
अशी एकंदरींत देना आहे.” बाजीराव म्हणाले.
“ ते सारें खरे; पण इतकी रंगाला आलेली मोहोम आतां एकाएकीं मध्येंच अर्धवट सोडणे कसें शोभेल ! आज जीं कामें नखाने होतील, त्याच कामांना उद्या कुऱहाडी लागतील. रोज कानीं येणाऱ्या शत्रूकडील बातम्यांवरून शत्र आतां फार दिवस टिकाव धरील असें आम्हांला वाटत नाही. आम्हांला तर अशी जबरदस्त आश्या आहे कीं, आमच्या शब्दाला मान देऊन शत्रूला आमच्याशी तेह करणे भागच पडेल. तहू झाला व रक्तपात न होतां वसईचा क्रिद्ठा शत्रूने खालीं करून दिला तर सोन्याहून पिवळे झालें. मग किल्याची व्यवस्था लावून आम्ही सारेजण आपल्या मागोमाग उत्तरेकडे येऊं.” विमाजीअ'पा उद्गारले.
“ पण तह झाला नाहीं तर ! ” बाजिरावांनीं सव मडळीकडे वळून तोच प्रश्न पुन्ह्या केला, “ सांगा; तह झाला नाहीं तर! ”
“ तह होईल; नग्याण्णव हिरशांनीं तह होईल. फिरंग्यांनीं आज सूर्यास्ता- पर्येतची मुदत मागून घेतलेली आहे. तोपर्यंत नारायणराव ब बुवाजी ही मंडळी फिरंगी तहाला राजी असल्याची शुभवाता घेऊन येतील असें आमची मनोदेवता आम्हांला स्पष्ट सांगत आहे ” चिमाजीअप्पा म्हणाले.
बाजीराव यावर उद्गारले, “ आतांपर्यंतची वेळ गेली तशीच सूर्यास्तापर्यंतची वेळ जाईल व अखेर ह्या चालढकलींतून आम्ही म्हणतो तोच निष्कर्ष बाहेर पडेल. मनुष्याने आशावादी असावे; पण अशक्यप्राय गोष्टींविषयी आशा बाळगणे पारेणामीं फारसें दूरदर्शीपणाचें ठरणार नाहीं.” ते लगेच गंगाजी नाईक वगेरे इतर मंडळीकडे वळून म्हणाले, “ खरें कीं खोटे ! ”
हणण टी?) 0) 00 0)? पीटीपपयपीपी नट >र्मपपमा-ा -पपमपापापपॅपपिशीफ९? णा प)२१0ण २0२)?” नन
> छत्रपतांच्या दरवारांतील फाटाफुटींचा व आपतांतील चुरशीचा वृत्तान्त या पूर्वी 'कादंबरोमय पेशवाई'मधून अनेक वेळां आला आहे. सेनापाते दाभाड्यां- च्या पारिपत्याचा वृत्तान्त "पेशवाईतील दुर्जन' ह्या आठव्या कादंबरीत साकल्यें-
करून देण्यांत आला आहे. पे....ड
"१० पेशवाईतील धर्मसंप्राम
४०४७-१५ ४-४ फन ०-ह “होण
बाजिरावांनीं आपल्या मताच्या समर्थनार्थ नाईक वगेरे मेडळीकडे पाठून खरे कॉ खोटे' असें विचारतांच मल्हारराव होळकर, अंताजी रघुनाथ वगेरे मडळीनें एकमेकांकडे सुचक दृष्टीनें पाहिलें व लगेच नाईक बाजिरावांना म्हणाले, “ श्रीमंत म्हणतात तें एका अर्थी खरे; पण धाकटे श्रीमंत म्हणतात तें देखी खोटे नाहीं. अविचाराने एखाद्या गोष्टींचा निर्णय ठरवून टाकण्यापेक्षां अशा प्रसंगी आक्यावादी बनणेंही वाईट नाही.
अंताजी रघुनाथ म्हणाले, “ मलादेखील तसेच वाटते. घाईघाईने एखादी अशुभ गोष्ट आपल्या हातून घडण्याचा संभव असतो, तेव्हां कालह्रण करणेच शहाणपणाचे ठरते.”
विमार्जाअप्पा पुन्हा म्हणाल, “ त्यांत अशुभ तें काय आहे! आमचें मन आम्हांला स्पष्ट ग्वाही देत आहे की, फिरंगी कोलाला येणार व तह होणार.”
चिमाजीअप्पांच्या तोंडून हे शब्द निघतात न निघतात तोंच दरव!जाबाहेरून कोणीतरी खड्या सुरांत उद्गारळे, “ नाहीं, नाहीं, तद्द होत नाहीं.”
प्रकरण तिसरे
मराठमंडळाचा निधार चि्िमाजीअसयांच्या तोडून हे आक्यावादीपणाचे उद्गार निघावयाला व बुबाजी नाईक दिवाणाखान्यांत यावयाला एकच गांठ पडली. बुवाजीनें अप्पांचे उद्गार आंत येतां येतां ऐकले व कोणीं प्रश्न विचारण्याची वाट न पहातां सर्वांना एक अझुभ वाता निवेदन केली. “ तह होत नाहीं. तहाची आशा बाळगण्याचे मुळींच कारण नाही. सेनापति सिल्व्हेरा तह करण्याला सुळीच तयार नही. तो पक्का दगेखोर माणूस आहे.”
:< पण नारायणराव कुठे आहे! ” मल्हारराव होळकरांनी विस्मयपूर्वक विचारले. सेनापतीच्या दगेखोरपणाची वार्ता ऐकतांच त्यांना प्रथमच संदाय आला को, सेनापतीने नारायणरावाला कांहीं द॒गाफटका तर केला नसेल !
मल्हाररावांची ती दका बरोबर होती. वुबाजी त्यांच्या प्रश्नावर उत्तरला, “ नारायणराव किल्ल्यावर केदेंत आहेत व उदईक त्यांना बाटवून मग ठार करण्याचा सेनापतीचा दुष्टपणाचा बेत ठरलेला आहे.”
एकूण इतके दिवस तुम्हांला फिरंग्यांनी किल्ल्यावर ठेवून घेतलें, तें केवळ हुलकावण्या दाखविण्यासाठींच म्हणावयाचे ! ' बाजीराव म्हणाल.
“- असेच केवळ नाहीं.” बुवाजी म्हणाला. “ आम्हांला केवळ हुळक।वण्या दाखविण्याचा त्यांचा बेत आहे असें आमच्या निदर्शनाला आले असतें तर आम्ही केव्हांच श्कडे आलो. असतो; पण प्रथम आम्हांला तसे वाटले नाही. उलट किल्ल्यावरील जबाबदार अधिकारी आमच्याशी तह करण्याला उत्सुक आहेत असेच आम्हांला प्रथम वाटले. पण सेनापाते सिल्व्हेरा किन्न्यावर आला व आमच्यांतल्याच कांही घरभेद्यांशीं त्याचें कांहीं खलबत झालें, ठेव्हांपासून परिस्थितीचा रंग एकदम पालटला.”
“ हें कसें काय झालें ! ” बाजिरावांनीं विचारलें.
बाजिरावांनी विनचारल्यावरून बुबाजी वसईच्या किल्ल्यावरील वृत्तान्त निवेदन करूं लागला. मी व नारायणराव बरोबरच्या मडळीसद्द वसईच्या किल्ल्यावर जाऊन पे.चळो, तेऱ्हां देडदार पेरीरा व सेनापाते सिन्न्हेरा हे दोघेही तेथे नव्हते,
श्र पुंडावाइतांलळ धमंसम्राम
र ऱ- ऱ्ह बहटीधश£--- ऱटा > ऱ्या *२- -/*ाप्शी -- ऱ्ट ->“ ५ “7” -« "८ 2९४ १८- ४ ॥४शप्याप या महाय > र
कोठे बाहर गेले होते. त्यांच्या एवजी किललेदाराचा मुलगा डोसिंगो ह्याने आमचा योग्य आदरसत्कार करून आम्हांला ठेवून घेतलें. त्यानें आमच्या आगमनाथें कारण विचारून घेतले, व तहार्चे बोलणें करण्यासाठी आम्ही आलों आहों असे कळतांच त्यानें संतोष व्यक्त केला. त्याने आपल्या आईशींद्दी आमची ओळख करून दिली. तीही फार भली बाई दिसली तिलाही, तहाची योजना मानवली. त्या दोघांच्या बोलण्यांत अर्से आलें कीं, किठ्ेदारही मुकाटपणे मराठ्यां- शी तह करून रक्तपात थांबवावा अशाच मताचा आहे. मात्र सेनापाति तहाला कितपत तयार होइल याविषयी त्यांनाही शका होतीच. तरीही त्यांनी त्याची शक्यतो समजूत घालण्याचे कबूल केलें होतें. डोमिंगोनेच तेथला दुसरा
ऱ्यान्याच दर्जाचा अधिकारी आल्काकोव्हा याख्या सेगतमताने तहू'च्या काटाघार्टासाठी मुदत मागन घेतली. आम्हांलाही परवांपावेती आशा होत का, आम- स्था वाट'पाटोला यश येइल. पण परवां सेंनापाते किळवयावनर अल. त्याच्याशीं जास पहिली भेट काल दोनम्रहरा झाली; तेव्हांच्या त्वाच्खा एकंदर वर्तेना- वरून आमची अर्धी आक्या लयाला गेली. डोमिंगो तेव्हां हजर होताच. त्यानें सेनापाते निघून गेल्यावर आम्हांला पुन्ह्या सेनापतीशीं वाटाघाट करून त्याचे मन वळविण्याचे अभिवचन दिलें. किल्लेदार अजून बाहेर्न आला नसल्याने' डोमिंगोचाही कांहींसा नाइलाज होता. त्याच दिवशीं बाटगा सरदार एखोनेओ, थोंडशास्त्री व भस्याशास्त्री हे किल्यावर येऊन सेनापतीला भेटले. त्यांचें सेनापतीशीं काय खलबत झाले हं जरी आम्हांला नक्की कळलें नाहीं, तरी त्यांची मुख्य फिर्याद रामानंदस्वामी व शुद्धिखंघटणाच्या चळवळोला अनुकूल असलेली त्यांच्याच मताची आणखी कांहीं मेडळी यांच्या विरुद्ध होती; पेशव्यांच्या प्रोत्साहनाने हे चळवळे फार शेफारून गेले आहेत, असा आगलावेपणा करण्यालाही त्या तिघांनी कमी केळें नाहीं असे कळलें.”
“ पहा श्रीमंत ! मीं जे आतांच आपणांला सांगितलें, त्याचा हा पडताळा पहा.”
“ अस् द्या.” बाजीराव बुबाजीला म्हणाले, “ पुढें काय झालें! ”
“ पुढें काय ! त्या मडळीचीं काय खलबते झाली हें कांही अ'म्हांला कळलें नाहीं; पण त्याच रात्रीं आमच्या वसातेस्थानासभोंवार पहारा बलला. दुसऱ्या दिवशीं सूर्यास्तापर्यंत सेनापाते आमच्याकडे मुळींच आला नाहीं. पण पहारे- कऱ्यांकडून आम्हांला बातमी कळली कॉ, सेनापति पेशव्यांवर व साऱ्या मराठ-
मराठमंडळाचा निधार प्रे
मंडळावर कारच रुष्ट झाला असून तह करण्याचा त्याचा मानस नाह. चुळणे गांवांत भगवानजी व भरव नाईक ह्या बापलेकांनीं शुद्धीची चळयळ करून तेथन्या लोकांना आपल्या बाजला ओढण्याची खटपट चालविली आहे हो वातमीा त्या 'तघाकडन सेनापतीला मिळाल्यामुळे तो फार चिटलळा होता. ती व[तमाच अखूर खरा झाली. सूयास्ताच्या सुमाराला सेनापतान आम्हांला आपल्या वाड्यांत बोलावून घेतले व आमची खूप निर्भर्त्सना केली. तो केवळ आमचीच 'नि्थत्सना करून थांबला नाहीं, त्यानें उभयतां श्रीमंतांना व साऱ्या मराठमंडळाला कानांनी ऐकवणार नाहीत असे अपराब्द उच्चारले, व नारायग- रावाना म्हटले, “दोन्हो पेशवे व त्यांचे सारे बडे बडे हस्तक मला शरण येऊन खिस्ती व्हावयाला तयार असतील तर मी त्यांना क्षमा करून त्यांच्याशीं तह करावयाला तयार आहें'. हा खाशांचा अपमान नारायणरावांना सहन झाला नाहीं. ते एकदम रागानें बेभान झाले व अरेतुरेवर येऊन सेनापतीला अद्वातद्वा बोलले ! त्याबरोबर सेनापतीने चिडन नारायणरावांना तथल्या तेथे शिक्षा ठोठावली, याला उद्यां बाटवून याचे मुंडण करा व किल्ल्यावर सभोंवार याची गाढवावरून धिंड काढून मंग याचा शिरच्छेद करा'. त्याप्रमाणेच आम्हां मंडळीलाही बाटवन श्रीमंतांना नजराण्यादाखळ नारायणरावांचे मुंडके आमच्या ह्ाती. देऊन आम्हाला
किल्ल्याबाहेर हांकलटून लावण्यार्चा हुकूम त्यानें सोडला. डोभमिंगो, आल्काकोव्हा, ऐंन्टोनिओ, फादर पोर्टो, भय्याशास्त्री, धोंडशास्त्री व किल्ल्यावरील आणखी बरीच मंडळी तिथे हजर होती. डोमिंगोने “किलेदार येईपावेतो तरी थांबा' अशी सेनापतीची समजूत घालून पाहिली; पण कांहीं उपयोग झाला नाहीं. आमच्या देखतच ऐंटोनिओ व फादर पोर्टो यांना चुळण येथील बंदोबस्ताला पाठविण्याचे ठरलें व भय्याशासत्री आणि धोंडशास्त्री यांनीं निर्मळ येथील पुढें होणारा शाद्रे. समारंभ मोडण्याचे तेथच कबूल केलें. लगेच आम्हांला तुरुंगांत नेण्यांत आळे व स्वतंत्र अशा घाणेरड्या खोल्यांतून कोंडून ठेवण्यांत आळे आम्हांला कोणाला कोटे ठेवलें याचा एकमेकांना पत्ता नव्हता. रात्रभर मी तर उपाशीच होतों. मध्यरात्रीच्या सुमाराला कोणीतरी येऊन माझ्या खोलीचे कुलूप काढलें. त्या आवाजानें मी झोपेतून जागा झालो. मला प्रथम वाटले कीं, हा नुसता भास झाला. पुन्हा वाटलें काँ, हवी भुताटकी तर नसेल; म्हणून भीत भीत दरवाजापाशी जाऊन दरवाजा लोटून पाहिला तों तो उघडा होता व एक पहारेकरी दरवाजा-
७ पडावाहतीळ धर्मसंप्राम
बाहेर 7. “वा. ता हळूच माझ्या कानांत म्हणाला, “भिऊ नक/ःस उुकाट्याते ह्या तुहसात्या मागील बाजूने दोन उंच भितींच्या मधून विचाळी वाट जाते. तपा वाटेने ज! म्हणजे बाहेरील मोठ्या दरवाजांत जाऊन पॉचशील. तंथे पहार खाह. तेयला पहारेकरी “परवळ' असा प्रश्न तुला करील, त्याला 'जुता करार असें उत्तर दे व ह्वा बिछा त्याला दाखव म्हणजे तो तुला बाहेर सोडील'. असें *रंपन त्यने ह्या बिछा माझ्या हातीं दिला.” क्रुसावर येशू खिल्ठाळा सवांगांत ळे ठोकन जस्यडून ठार करण्यांत आले आहे असा ठसा वर उमटविलेला एक पिना वेत वाजिरावांपुढे ठेवन तवाजी पुढे म्हणाला, ' अशो मोज्या "सत्कारन पामी सुटका झाली, व मी आतां हा आपणाल!| दिसला आढे,
सटका नजी एकटयाचीच झाली, को तुः्यावरोबरच्या इतर झाणमाकोड शीक देमाजाअऱपांनां प्रश्न केला.
' क फला कांही माहीत नाहा. तो पहारेकरी त्याविषयो. माक्यापाणा काडास चदाऊळा गोटा बुबाजी उत्तरला.
त) 'ग्डार्फरी कोण बर॑ असावा !' ” त्ता उ्क्र्ढ नोहा.
' ह 37 मोठेच आर्य आहे! ” चिसाजीअप्पा बाजिरांवाकडे तुन म्हणाले “ यावरून ऊपणाला असे अनुमान करावयाला हरकत नाहा. का अमच्या म्हणज प7।याने हिंदवीच्या हितासाठी कायावाचामनानें झटणारे कांही लोक किठयावर अ हेत. मग ते आमच्या हेरांपेकीं असोत, किवा नोकरी फिरग्यांची करावयाच; पण मन मराठ्यांकडे अश हार्दिक सहानुभूतीने वागणार फिरंग्यांच्या नोकरांपेकी काणी असोत. श्रीगजाननानें त्यांना अशींच सदबुद्धि व असेच सामर्थ्य द्यावे व नारायणराव आणणि त्यांच्या बरोबरची इतर नोकर॒मंडळी यानाही उबःजीप्रमाणेच सुखरूपपणे सुटका व्हावी.”
“ सुटक, , आतां कसली सुटका ! आतां नारायणरावाच्य़ा सुटकेची आशाच नको. दूवाफे माझा उजवा हातच तोडण्याचे ठरावेळे, तेथे कोणाचा काय
अणे 77. मन्हाररावांच्या मुखावाटे निघावयाला च त्यांचग्र मागे वसळेले
गंगाजी ना/ऊ धाडकन शिकावयाला एकच गांठ पडलो. लगेच मव्हाररावानी (२ जू ट०:, _*» > कळ रि >
रोणांजा ('उ"कड वळून पाहले. तोंच राणोजीराव हास्यमुद्रने म्हणाले, “ सभेदार !
मराठमंडळाचा निर्धार
भ - “ "वह (ल्म्रे तुम्ही नारायणरावांविषयी मुळींच चिंता कुं नका. दिंकिचा शुभरकूनॅ”सांगतो
का नारायणराव सुखरूप परत येईल.
गगाजी नाईक निम्रहपूर्वक उद्गारले, “ शकून आणि अपशकून कसले पद्यात बसलां ! असली संकटे शकून पाहून निवारण होत नसतात, तीं निवारण करण्याला सूडावद्दल प्रतिसूड घेण्याची शपथ वाहून मारूं किंवा मरू अशा निश्चयानें प्रयत्न- वादी बनावें लागते. देवावर हवाला ठेवणारे रज्ये, त्यांच्या हातून पराक्रम होणे शक्य नाहीं. मी माझ्या आजवरच्या पन्नास वर्षीच्या अनुभवाने सांगतों कां, मनुष्याने देववादी बनण्यासारखा <वळेपणा दसरा कोणताही नाही."
गगाजी नाइकांच्या ह्या निमल वत्ताच्या वोलांचा मल्हाररावांच्या हळुवार बनेठेल्या मनावर किचित विपरीत पाग्णास आला. आधीोंच त्यांचे अंतःकरण नारायणरावावरील संकटाची वाता ऐकून भाजलेले होते, त्यामुळे त्यांना गंगाजी नाइकांच्या बोलांनी जास्त हज्ञा झाली. ते विमनस्कतेने नाइकांना म्हणाले. “ नाईक ! परदुःख शीतळ असे म्हणतात त खोटें नाही ! जो प्रसंग आज नारायण- रावावर आला आहे, तोच जर तुमच्या बुब्राजीवर आला असता, तर तुम्हांला काथ बरं वाटले असते! '
“ काय वाटले असते अशी तुमची कल्पना आहे! मी रडत किंवा हळ- दळत बसलो असतो असे तुम्हांला वाटतें काय ! सुभेदार ! बुबाजी तर माझा भाऊ आहे. पाठौराख्या भावंडांच्या प्रेमापेक्षा पाटजाळाचे प्रम थोर असते, हा जगाचा न्याय तर तुम्हांला माहीत आहे ना! पण मी भावांविषयी तसाच त्यांच्या मुलांविषयीं व तसाच माझ्या स्वतःच्या एकुलत्या एका मुलाविषयींही मोहाळा बळी पडण्याला तयार नाहीं. तुम्हांला काय वाटतें ! बुबाजीदेखील जर किल्ल्यांत अडकून पडला असता व जो प्रसंग आज नारायणरावावर आला आहे तोंच प्रसंग त्याजवर आला असता, तर माझ्या मनानें कच खाली असती का !--
गंगाजी नांइकांचे पुरतेपणी बोलून होण्यापूवीांच घरुवाजी नाईक मध्यंतरी उद्गारले, “ आणखी असे पहा सभदार ! दादा जे बोलले, त तुम्हांला अथवा कोणालाही दृषण देण्यासाठा बोलल नाहीत, सवांना धयरांचा नवा नेटावा देण्यासाठीं बोलले.
षे पेशवाईतील धर्मसंप्राम
बाहेर उन, होता. तो हळूच माझ्या कानांत म्हणाला, “भिऊ नकोस. सुकाठ्यानें ह्या तुल्गानपर' मागील बाजूने दोन उंच भितींच्या मधून चिंचोळी वाट जाते. त्या वाटेने जा म्हणजे बाहेरील मोठ्या दरवाजांत जाऊन पॉचशील. तेथे पहारा आहे. तेथला! पहारेकरी “परवळ' असा प्रश्न तुला करील, त्याला 'जुना करार' असें उत्तर दे व हा बिल्ला त्याला दाखव म्हणजे तो तुला बाहेर सोडील'. असें *हूणून त्यानें ह्या बिछा माझ्या हाती दिला.” कुसावर येशू ख्रिस्ताला सवोगांत खिळे ठोकून जखडून ठार करण्यांत आले आहे असा ठसा वर उमडविळेला एक पिरळेला विळा बाजिरावांपुढें ठेवन बबाजी पुढे म्हणाला, “ अशी मोठ्या मकमत्कारान माझी सुटका आली, व मी आतां हा आपणाला दिसता आहे. *
: सुटका तुझी एकट्याचीच झाली, कां तुःऱ्यावरोबरच्या उतर माणसाचीही झोळी । ' चिमाजाअप्पांनीं प्रश्न केला.
'८ त झला कांही माहीत नाही. तो पद्दारेकरी त्याविषयी माझ्यापा्ा काहींच योठला नाहो.'' त्रुबाजी उत्तरला.
“ लो. पहारकरी कोण बरे असावा !
“- तहा कळले नाहीं.
“ हे “ग माठटेंच आश्चर्य आहे! ” चविमाजीअप्पा बाजिरावांकड वळून म्हणाले, “ यावरून अपणाला असे अनुमान करावयाला हरकत नाहा, को आमच्या म्हणजे पर्यायाने हिंद्वीच्या हितासाठी कायावाचामनानें झटणारे कांही लोक किछ़्यावर आहेत. मग ते आमच्या हेरांपेकी असोत, किंवा नोकरी फिरंग्यांची करावयाच पण मन मराठ्यांकडे अशा हार्दिक सद्दानुभूतीनें वागणारे फिरंग्यांच्या नोकरांपॅकी कणी असोत, श्रीगजाननानें त्यांना अशीच सदबुद्धि व असेंच सामर्थ्य द्यावे व नारायणराव आणणि त्यांच्या बरोबरची इतर नोकरमेडळी यांचीही डब[जीप्रमाणेंच सुखरूपपणे सुटका व्हावी.”
“ सुटका ! आतां कसली सुटका ! आतां नारायणरावाच्या सुटकेची भाशाच नको. देवाने माझा उजवा हातच तोडण्याचे ठराविळे, तेथें कोणाचा काय €लाज !--
असे उ मल्हाररावांच्या मुखावाटे निघावयाला ब॒ त्यांच्या मार्गे बसलेल गैगाजी नाईक धाडकन शिंकावयाला एकच गांठ पडली. लगेच मल्हाररावांनी राणोजीरवःकड वळून पाहिलें. तोंच राणोजीराव हाल्यमुद्रेनें म्हणाले, “ सुभेदार !
*्$
मराठमंडळाचा निर्धार 1110000000... आ. क व्य 00 चाही डा ् म्ही नारायणरावांविषयीं मुळींच चिता करुं नका. शिंकेचा शुभशकूरने”सांमतो>' को नारायणराव सुखरूप परत येईल.” गंगाजी नाईक निम्नहपूर्वक उद्गारले, “ शकून आणि अपशकून कसले पद्यात बसलां ! असलीं संकटे शकून पाहून निवारण होत नसतात, तीं निवारण करण्याला सूडाबद्दल प्रतिसूड घेण्याची शपथ वाहून मारूं किंवा महं अशा निश्चयानें प्रयत्न- वादी बनावे लागते. देवावर हवाला ठेवणारे र्ये, त्यांच्या हातून पराक्रम होणें शक्य नाहीं. मी माझ्या आजवरच्या पन्नास वर्षीच्या अनुभवानें सांगतो कीं, मनुष्यानें दैववादी बनण्यासारखा टबळेपणा दुसरा कोणताही नाहीं."
गंगाजी नाइकांच्या ह्या निर्मल वृत्ताच्या बोलांचा मल्हाररावांच्या हळुवार बनलेल्या मनावर किचित विपरीत परिणाम झाला. आधोंच त्यांचें अंतःकरण नारायणरावावरीळ संकटाची वाता ऐकून भाजलेले होतें, त्यामुळें त्यांना गंगाजी नाइकांच्या बोलांनीं जास्त इजा झाली. ते विमनस्कतेनें नाइकांना म्हणाले, “ नाईक ! परदुःख शोतळ असे म्हणतात तें खोटें नाहीं ! जो प्रसंग आज नारायण- रावावर आला आहे, तोच जर तुमच्या बुब्राजीवर आला असता, तर तुम्हांला काय बरं वाटलें असतें? ”
“ काय वाटले असतें अशी तुमची कल्पना आहे! मी रडत किंवा हळ- हळत बसलो असतों असे तुम्हांला वाटतें काय ! सुभेदार ! ब॒बाजी तर माझा भाऊ आहे. पाठीराख्या भावंडांच्या प्रेमापेक्षा पोटजाळाचें प्रेम थोर असते, हा जगाचा न्याय तर तुम्हांला माहीत आहे ना! पण मी भावांविषयीं तसाच त्यांच्या मुलांविषयीं व तसाच माझ्या स्वतःच्या एकुलत्या एका मुलाविषयींही मोहाला बळी पडण्याला तयार नाहीं. तुम्हांला काय वाटतें! बुबाजीदेखील जर किल्ल्यांत अडकून पडला असता व जो प्रसंग आज नारायणरावावर आला आह तो" प्रसंग त्याजवर आला असता, तर माझ्या मनानें कच खाली असती का !---”
गंगाजी नाइकांचें पुरतेपणी बोलून होण्यापूर्वीच बुबाजी नाईक मध्यंतरी उद्गारले, “ आणखी असें पहा सुभेदार ! दादा जे बोलले, तें तुम्हांला अथवा कोणालाही दूषण देण्यासाठीं बोलले नाहींत, सर्वांना धेर्यांचा नवा नेटावा देण्यासाठी बोलले,"
२५६ पेशवाईतील धर्मसंप्राम
शश टाध्टा टेट ट्ट »*>५ शश
“ कोणाला दूषण ! हरेराम ! सुभेदार ! तुम्हांला ही शंका आली का!” गंगाजी नाईक स्मितहास्यपूर्वक म्हणाले, “ वा; ! सुभेदार ! प्रत्यक्ष द्वाताखाळच्या नोकरावरदेखीळ इतकी ममता करणाऱ्या तुमच्यासारख्या रणसारंगाला दूषण आणि तें मो देईन ! अशी शेकादेखील कोणाच्या मनांत ग्रेतां कामा नये होती. आणि नारायणरावाची योग्यता मळा कळत नाहीं अशी तुमची कल्पना असेल तर तीही चुकीची आहे. खरोखर नारायणराव तुम्हांठा साजेसा सेवक आहे.”
-२.-०८. ८४८८-२० /८४ ४-५. २५५५४५ प्टप्टप्टध्ाध्ट 0: “४५४५५५८५५५ ४५८५-५५ ११८५ ८४९१ 0०४ ८९ ह्टष्टीे. ४४५४१४५ १/॥४- “ ८५५४ 0 7४५० १ ८५/८१/४८८१ ९ ८४८४१ ४४" ८
“ नारायणराव मला साझ्या पोटच्या पोराहूनह्दी जास्त प्रिय आहे.” मल्हारराव विमाजीअप्पा व बाजीराव यांच्याकडे पाहून म्हणाले. “ श्रीमंतांनी जेव्हां खलिता घेऊन किल्ल्यावर जाण्याची गोष्ट काढली तेव्हां किल्ल्यावर जाणें म्हणजे काळाच्या जबड्यांत चालून जाणें होय हें माहीत असूनही नारायणराव निधड्या
कडा दा प चा सा आण्याला णह वता ळत तडक रडत डा ततर जळा करतत यारा > >:
* पृष्ठ ४५ मराठशाहींत बराच क्र्ग्वेदी देशस्थ ब्राह्मणांची घराणीं उदयाला आलीं; त्यांतच दाणी या उपनांवाचें खेड-सासवड भागांतील एक ब्राह्मण घराणे उद्याला आलें. दाणी कुटुंबाच्या पुढें दोन शाखा झाल्या. त्यांपैकीं वडील शाखा मालेगांव येथ राजेबहाददर या नांवानें उदयाला आली; तिचे सूळ पुरुष नारो शकर हे होत. धाकटी शाखा विंचूरकर या नांवानें उदयाला आली; तिचे मूळ- पुरुष विठ्ठल शिवदेव विंच्रकर हे होत. विठ्ठल शिवदेवांनीं पेशव्यांच्या उजव्या हाताप्रमाणें पराक्रम गाजावेले व अभूप मान धन वभव संपादन केलें. विठल शिवदेवांचा जन्म इ०सन १६५७५मध्यें व मृत्यु इ*्सन १५७६७ मध्ये झाला. थोरल्या दाणी शाखेचे मूळ पुरुष नारो शंकर हेही अत्यंत स्वाभिमानी, पराक्रमी व॒ स्वामेनिष्ट होते. नारो शंकर प्रथम उदाजी पवारांच्या दिमतीला होते ( मंडलोई दसर ). नंतर त्यांना मल्हारराव होळकरांच्या दिमतीला देण्यांत आलें. नारो शंकर हव महावीर गोविंदपंत बुंदेल्यांभ्रमाणें बहुधा प्रारंभापासूनच उत्तरेकडे उद्योग करण्यांत गढून गेलेले असत. नारो शंकरांवर नानासाहेब पेशव्यांनीं उत्तरेकडील मोठमोठी जबाबदारीची कामें टाकली व त्यांनीं तीं योग्य रीतीनें पार पाडली. माधवराव पेशव्यांच्या कारकीदीत नारो शंकर एकदां प्रतिनिधि- देखील झाले होते ( इ. सन १७६२ ). नारो शंकर व विठ्ठल शिवदेव हे दोन्ही पुरुष जसे पट्टीचे मुत्सही तसेच पट्टीचे योद्धेही होते. त्यांच्या मुत्सहदेंगेरीचा व पराक्रमांचा परिवय वाचकांना 'कादंबरीमय पेशवाई'मधून पुढें वेळोवेळीं होईलच.
नन
मराठमंडळाचा निर्धार "५५७
“लक. ८०...» .
छातीनें ती पंचप्राणांच्या मोलाची कामगिरी पार पाढण्यासाठीं प्रसन्नतापूर्वक पुढे आला आणि तो किती निर्भय, बाणेदार व धन्यांचा निःसीम अभिमानी आहे हें सर्व मंडळीने आतांच बुबाजी नाइकांच्या तोंडून ऐकलें आहे. अशा एकनिष्ट व धौर-वीर-गंभीर सेवकाचा अभिमान मला वाटला व त्याच्यावर परम संकट कोसळलेले ऐकून विषाद वाटला तर त्यांत माणुसक्रीला सोडून कांहीं झाले असें मुळींच नाहीं.
“ मुळींच नाहीं.” चिमाजीअप्पा उद्गारले. “ सुभेदार, सुभेदार ! तुमच्या दु:खांत आम्ही सर्वजण सारखेच वांटेकरी आहो.”
राणोजी शिंदे उद्गारले, “ सेंनापाति सिल्व्हेरानें मराठ्यांच्या एखाद्या यःकाश्वित् शिपाइईप्याद्याचा अपमान केला, तरी देखील तो साऱ्या मराठमंडळाचा अपमान झाला असें समजून आम्ही त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एकजुटीने झटलें पाहिजे. आणि या ठिकाणीं तर प्रत्यक्ष श्रीमंतांचा अपमान त्यानें केला आहे. हा अपमान आपणाला सव्याज फेडतां आला नाही, तर आपण खरे मराठेच नाहीं अर्से ठरेल, मराठा तोच कीं, कोणत्याही जुलुमाचा, अन्यायाचा किंवा अपमानाचा प्रतिकार करण्यासाठीं नेटानें पुढें चाळून जाऊन प्रसंगीं मरेल पण मागें हटणार नाही.”
“ बरोबर. अगदीं बरोबर ! राणोजी बाबा ! तुम्ही अगदीं लाखांतली गोष्ट बोललां तुमचे बोळ मला तंतोतंत पटले,” गंगाजी नाईक बाजीराव व चिमाजी: अप्पा ह्या उभयतांकडे पाहुन म्हणाले, “ मी तर म्हणतों कौ वेळी आमचा अपमान क्षम्य आहे; पण उभयतां श्रीमंतांचा अपमान तो एकद्या श्रीसंतांचाच अपमान नसून तो साऱ्या मराठमंडळाचा अपमान व तोच छत्रपतींचाही अपमान.” ते सर्व मेडळीकडे पाहून उद्गारले, “ असला अपमान निमूटपणे सहन करणारा मद्दाराषट्राचा-मराठा-असो, परभू असो, ब्राह्मण असो किवा आणखी कोणी असो. हिंदूच्या अस्सल अवलादीचा नाहीं असेंच समजलें पाहिजे.” एवढे शब्द त्यांच्या तोंडून निघाले मात्र; पण लगेच त्यांनीं जीभ चावली व बाजिरावांचे पाय धरून उद्गार काढले, “ श्रीमत ! आवेशाच्या भरांत येऊं नये तो शब्द
तोंडावाठे येऊन गेला, याबद्दल मला क्षमा असावी.”
बाजीराव गंगाजी नाहकांना आपल्या हातांनी धरून वर उठवीत म्हणाले, “ कांद्दी दहृरकत नाहीं. तुम्ही यथायोग्य बोलला; त्यांत कांहींच वावगे नाही.
पट पेशवाईतील धमंसंप्राम
अशा प्रसंगींदेखील माणसाला इतकी चीड आली नाही तर तो मनुष्य कसला अप्पा म्हणाले तेंच खरे. आतां वसई जिंकून तेथून पोर्तुगीजांचे निर्मूळ केल्य शिवाय मार्गे पाय घ्यावयाचा नाहीं. मात्र तुम्हीं सर्व मंडळीनें कंबरा कसून शक्य तितक्या निकरानें तेथला कार्यमाग आटोपला पाहिजे. पावसाळ्यानंतर मोहीम लांबली तर शेतवाडीच्या काळजीने राउतांचें लक्ष्य द्विधा होते. %
“ पण आपली उत्तरेकडील कामगिरी ! ” मल्हाररावांनी विचारले.
“ तूर्त उद्ईक आम्ही त्या कामागेरीवर जातो. जरूरच भासली तर तुम्ही सव ही मोद्दीम आटोपून याच.” बाजीराव बाहेर जावयाला उठतां उठतां म्हणाले. “ आतां मोहिमेची घडी कशी काय बसवावयाची ती तुमची तुम्ही एक. विचाराने बसवा. मदांध फिरग्यांचा निःपात करीता मार्गे पाऊल घेऊं नका.”
“ शाक प
बाजीराव बाहेर निघून गेळे. मल्हारराव हळूच राणोजी शिंद्यांना म्हणाले, : राणोजीबाबा ! नारायण सुट्न आला तर ठोकच; नाहोपेक्षां त्याचा जन्म पार्थकॉ लागला. थोरल्या श्रीमंतांना थोड्या वेळापूर्वी ह्या मोहिमेच्या बाबतीत दरक अडचणी सुचत होत्या, त्या आतां हरएक सोई सुच लागल्या, नारायणा व्या बलिदानाने हो इष्ट क्रान्ति घट्टन आली.”
“ बर; आपण सवानी ही अवाढव्य जबाबदारी नव्या जोमाने शिरावर घेतली व बाजीराषसाहेबांनींही कबूली दिली. पण आतां ह्या अवघड कायाचा उरक कसा करावयाचा ! वसईच्या किल्ल्यांत दडी मारून बसलेला फिरंगी म्हणजे यमुनेच्या डोढांत बुडी मारून बसलेला कालिया होय. त्याचें मर्दन कसे करावयाचें याचा कांद्दी निश्चित विचार करावयाला नको काय! ”
मानाजी आंग्रे म्हणाले, “ धाकटे श्रीमंत ! फिरंगी कालिया असेल, तर आपण त्याचें मर्दन करण्याला समर्थ असे श्रीकृष्ण आहां, व आम्ही सारे आपले गोप संवगडी आहों. आपणांला त्याचा एवढा बाऊ वाटण्याचें कारण नाही. आरमारी सामर्थ्यावर फिरंग्याची भिस्त असेल तर समुद्राच्या बाजूने त्याची ती रग मी एकट्याने जिरवितो. फिरग्यांची एक तरी नाव आंत जाऊं
* मराठे सैनिक वर्षातून आठ महिने-दसऱ्यापासन मगापर्यंत-मुळुखगिरी वर असत. साधारणतः पावसाळ्यांत मुलुखगिरी बंद असे; तेव्हां मराठ्यांना शेती करतां येई. शेतकी हेंच त्यांचें उपजीविकेचे मुख्य साधन झेतें.
मराठमंडळाचा निर्धार ५९ दिली किवा बाहेर येऊं दिली तर मला विचारा. मी समुद्रांत त्याला बुडवून मारीन तरी, किंवा --
“ ळे, छे ! मानाजीबाबा ! 'किंवा', 'अथवा', 'जर', 'तर' असले शब्दच तोंडावाटे कोणीं उभ्चारावयाचे नाहींत. प्रयत्न करणें आपल्या हातीं व यश देणे परमेश्वराच्या ह्वाती. तुम्ही समुद्राकडून किल्ल्याला वेढा द्या व जमिनीकडून वेढा शकराजी नारायणांनीं घातलाच आहे, तो आम्ही जास्त बळकट करता.” मल्ह्वारराव होळकर चिमाजीअप्पांकडे वळून म्हणाले, “ धाकट्या श्रीमेतांनी आतां चपळाई करून हा धर्मसंग्राम निकराने अुजविण्यासाठीं सर्व सेनानींना आज्ञा केली पाहिजे."
चिमाजीअऱ्पा म्हूणाले, * ते होईल. बाहेरील प्रांतांतीळ कामगिरी बहुतेक आटोपलीच आहे, आतां आपणां सर्वाना वेळ्याच्या एकाच बाबतींत मन घालावयाला मुळींच जड जाणार नाहीं. पण मल्हारीबाबा ! नुसत्या वेढ्याने काम भागेल असें लक्षण आम्हांला दिसत नाही. बाहेरून व आंतून असा दोनदह्दी बाजूंनीं फिरंगी जेरीला आणतां आला तर कांहीं तरणोपाय आहे व हें सारें पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी झालें पाहिजे. आपणाला किल्ल्यांतील फिरग्यांच्या सामर्थ्यांचा कांहीच अदाज नाहीं. तो अंदाज मिळपावेतो आपला वेढा फुकट आहे.”
“ तो अंदाज आम्हांला आणतां येईल.”' गंगाजी नाईक म्हणाले. “ किल्ल्यां- ताल सव बित्तंबातमी वारंवार बाहेर कळविण्याचें काम आमचें. खंडूजी, मी, दु्लभजी मोहे, ष्वा तीनचार मंडळींवर आपण किल्ल्याचा भेद आणण्याची जबाबदारी टाका. आंत जाऊन काय कारस्थाने करावयाचीं तीं आम्ही करतो; फक्त बाहेरचा बंदोबस्त इतरांनी पहावा.”
“ पण किल्ल्यांत तुमचा प्रवेश कसा होणार ! किल्ल्यांत कीड-मुंगीला देखील जाण्यायेण्याला वाव नाहीं इतका ५दोवस्त फिरंग्यांनीं केला आहे.” चिमाजी- अप्पा म्हणाले.
“ आपणांला काय त्याचें ! आपण मोज पहा तर खरी ! किल्ल्यावर डागडुजी करण्यासाठीं सुतार, लोहार वगर कामकरी लोक अजून पुष्कळच पाहिजे आहेत. त्याप्रमाणेच किल्ल्यांत सारे फिरेंगी कोंडून घेऊन बसले भाहेत, त्यांना भाजी: पाला, फळफळावळ, कपडालत्ता, कोंबडींबकरीं रोज लागणारच. मराठ्यांसारखे
६० पेशवाईतील धर्मसंप्राम त्यांचें नाहीं. मराठे मोहिमेवर निघाले कों वाटेत हुरडा तर हुरडा, शेंगा तर शेंगा, जे काय दोडीच्या सपाठ्यांत हातीं सांपडेल तें हिरवे कच्चें अन्न खाऊन देखील दिवसांचे दिवस-आठवड्यांचे आठवडे कंडितात. पण असला काटकपणा फिरगड्यांच्या अंगीं मुळींच नाहीं. त्यांचीं बायकापोरें तर चेनबाजीच्या पदाथाी- साठीं प्राण सोडतील. तसें पाहुं गेलें तर ह्या भागांतल्या बाजारपेठा फिरंग्यांच्या रोजच्या चेनबाज बाजारहाटीमुळे भरभराटीला आल्या आहेत. सभोवारच्या
मोठमोठ्या भागांतील भाजीपाला, फळफळावळ, कॉबडीं, यांचा सारा खप फिरंग्यांत, फिरंगी सारे आपलीं घरेंदारें व बागबगीचे सोडून किल्ल्याच्या आश्रयाल! गेल्यामुळें इकडे सर्व बाजारपेठा ओस पडत चालल्या आहेत व भाजी: पाल्याचे, फळफळावळीचे ढीगच्या ढीग रोज कुजून सडून वायां चालले आहेत. बाहेरून ह्ाा माळ किल्ल्यावर जाईल तितका थोडा आहे. लोकांनीं असा हरजिनसी माल क्रिल्ल्यांत विकावयाला आणावा, बाहेरचे कारागीर मिळावे, म्हणून किल्ल्यावरील अधिकाऱ्यांचे कोण प्रयत्न चालले आहेत ! पण ह्या धुम
खक्तींत तिकडे मरावयाला जातो कोण? ह्या संथोचा आम्हांला पुरेपूर फायदा घेतां येइल.!'* गंगाजी नाईक म्हणाले.
“ शिवाय हा खुणेचा बिल्ला आपणापाशीं आहेच.” बुबाजी चिमाजीअप्पां- समोरचा बिछा उचलून घेऊन सर्वांना दाखवीत म्हणाला, “ ह्या बिल्ल्याचा अस्सल बरहुकूम ठसा करून पाहिजे तेवढे विल्ले मी पाडून देतो. असा एकेक बिल्ला घेऊन व “जुन्या करारा”चा परवल वदून आपणांपेकीं कितीएकांना किल्ल्या - वर जातां येईल. मीं किल्ल्यावरचीं एकंदर लक्षणें पाहिलीं, त्यांवरून असा गोंधळ माजविण्याला तिथें भरपूर अवसर आहे अशी माझी खात्री झाली आहे.”
चिमाजीअप्पांना मंडळीच्या ह्या कल्पकतेचे फार कौतुक वाटलें. ते प्रफुळ- वदनानें म्हणाले, “ ही युक्ति मात्र फार नामी आहे. अशा गनिमी काव्याने आपण शात्रूळा खचित जेरीला आणू.”
याप्रमाणें पुढील कार्याची निश्चिति झाल्यावर तिची संगतवार घडी बसाविण्याला वेळ कसला! आजूबाजूच्या परिस्थितीचा अचूक अंदाज सर्व मराठे वीरांना गरुडाप्रमाणे भराऱ्या मारणाऱ्या त्यांच्या हेरांमाफंत पूर्वीच कळला होता. किल्ल्या- सभोवार वेढा घालून किल्ल्यावर जोराचा मारा करावयाचा, किल्ल्यांतील भेद आणून त्याप्रमाणें बाहेरील मारगिरीचें धोरण ठरवावयाचें व बाहेरून गोव्याकडून
४ 7४-५ १६/०१८४४-५५/१४४€४-९४-४४-/-४-/१%-४-५--/-/./ ४”
मराठमंडळाचा निर्धार ६१
किंवा मुंबईकर इंग्रजांकडून शत्रूचे साह्य होऊं लागल्यास तें किल्ल्यापर्यंत पोहोचू न देतां. मधल्यामध्ये लट्टन जाळून पोळून फस्त करावयाच, शत्रूपक्षाचे लोक जे किल़्याबाहेरच्या प्रांतांत धुडघयूस घालीत असतील त्यांना बाहेरच्या- बाहेर गांठून त्यांचा निकाल लावावयाचा, व याप्रमाणें सर्व बाजूंनीं किळृयांतील शत्रूंचा कोंडमारा करून त्याला दांतीं तृण धरून शरण आणावयाचे, असा सर्व मराठमेंडळाचा कार्यक्रम त्या बेठकॉत ठरला. बाजीराव पेशवे तेवढ्यांत तथे' आले. त्यांना हा बेत ऐकून समाधान वाटले. ह्या नव्या योजनेंतील कामाची वांटणी अशी करावयाची बाकी नव्हतीच. शंकराजी नारायण फडके व मानाजी आंग्रे यांनीं किळयाला वेढा देण्याचें काम पूर्वीच आरंनिले होते; त्यांना चिमाजीअप्पा, मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे यांनीं साह्य करून, वेढा सुंगीलाही आंत-बाहेर रोग मिळूं नये इतका पक्का करावा असें ठरलें. गंगाजी नाईक, बुवाजी नाईक, खंडूजी माणकर, अंताजी रघुनाथ वगरे जी मंडळी त्या प्रांतांतील रहिवासी व माहितगार होती, त्यांनीं वसई भोवतालच्या टापूत फिरंग्यांचा उद्योग बंद पाडावा, अन्टोनिओ, धोंडशात्ली, भय्याशास्त्री वगेरे जे घरभेदे कार्यनाह करणारे असतील त्यांचें पारिपत्य करावें व किल्र्यांतील भेद आणून मारगिरीच्या वर्मी जागांची खाशांना माहिती पुरविण्याचे पत्करले, इतर मंडळी ठिकठिकाणीं शत्रूच्या नसा धरून बसली होती त्यांनीं आपल्या जागा सोडूं नयेत अशी आज्ञापत्रे रवाना करण्याला चिमाजीअप्पांनीं आपल्या चिटणिसांना फर्माविले. मुंबईकर इंग्रज मुंबईला नवा गव्हर्नर आल्यापासून फिरंग्यांच्या वतीने चुळबूळ करीत असल्याचा बोभाटा कानीं आला होता; त्याचा योग्य बंदोबस्त करून त्याच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्याचे काम अंताजी रघुनाथ हे त्या बाबतींत माहितगार म्हणून त्यांच्यावर सोंप- विण्यांत आलें.
चिमाजीअप्पा म्हणाल, “ आपणाला आणखी द्रव्यबळ व मनुष्यबळ पाहिजे असल्यास आपण बाजीरावसाहबांना सांग, म्हणजे ते पुर्णे-साताऱ्याहून तशी तजवीज होण्याची खटपट करतील.” |
गंगाजी नाईक उतरले, “ छे; ! तशी कांद्दींच आवश्यकता नाही. मनुष्य- बळा'ची आम्हांला मुळींच वाण नाहीं.”
“ पण द्रव्यबळ पाहिजेना ! ” चिमाजीअप्पा म्हणाले. “त्याप्रमाणेंच युद्ध-
६२ वेशवादई्वतील धर्मसंप्राम
८.७ कक ळक णल
सामुग्री व अन्नसासुभ्रीही पाहिजेच. कारण हा संग्राम किती दिवस चालेल याचा कांहीं नेम सांगतां येणार नाही.”
अंताजीपेत उत्तरले, “ संग्राम कितीद्दी दिवस चाळेला तरी आपणाला गिण्याचें कारण नाही. किल्ल्यांत फिरंगडे किती दिवस कोंडी करून बसतात तें पाटूं तर खरें ! आज इतके दिवस आपण त्यांची हैराणगत केली, त्यानंतर त्यांच्यापाशी सामुप्री असून असून कितीशी असणार ! किल्ल्यांत कांहीं शेते पिकली नाहींत, कीं तीं ओरबाडून खाऊन व नवीन पिकवून त्यांना गुजराण करतां येईल ! बोलून चालून ते सांठवणी पाणी, तें पुरून किती दिवस पुरणार ! बाहेरच्या प्रांतांतून मूठभर तरी दाणागोटा किल्ल्यावर कसा जातो तें आम्ही पाहू. सर्व शेतकरी आमचे आहेत, सर्वे पेठा आमच्या आहेत, सर्वे नाकीं आमच्या स्वाधीन आहेत. गोंव्याकडून पुरवठा होण्याची फारशी आशा नाहींच. कारण तिकडे व्यंकटराव गोंवेकरांच्या छाताडावर पाय देऊन उभे आहेत. येऊन जाऊन मुंबईकर इंग्रज त्यांना दाणागोटा पुरवितात. तो पाळत राखुन मधल्यामध्यें लुटून फस्त केला कीं काम झालें ! फिरंग्यांच्या गांठींचा पेसाही बहुतेक खलास होत आला आहे. एरव्हीं त्यांचे दागदागिने व प्रार्थनामंदिरांतील सोन्यारुप्याच्या घांटा जागोजागी गहाण पडण्याला सुरवात झालीच नसती. आतां आपणाकडे द्रव्यबळ बेताचें आहे हें खरे. पण आमच्याच रक्तशोषणानें गबर झालेल्या फिरग्यांच्या भव्य वाड्यांत व मंडपेश्वरसारख्या प्रार्थनामंदिरांतील सोन्यारुप्याचे अलंकार, त्याप्रमाणेंच अन्टोनेओसारखे जे देशकंटक दगलबाजीनें गबर झाले अहित त्यांच्या धनंतर दोलती, ही सारी आम्ही समजतो कॉ, आमच्याच बापाची मत्ता आहे. आपणाला काय कमी आहे! ”
चिमाजीअप्पांना हा विचार रुचला नाहीं, असा त्यांच्या चर्येवरून संशय आल्यामुळें अताजीपंत पुन्हा म्हणाले, “ हें पदा धाकटे श्रीमंत |! क्रियेची प्रतिक्रिया जगांत नेहृमींच ठेवलेली असते. आज दोन शतकें पिढ्य़ानापेढ्या आम्ही जे अनर्थ सोसले, जो जुलूम सहन केला, त्याची आपणाला कल्पनाच असणें शक्य नाहीं. आम्हांला सर्वस्वी नागवून'च हे गोरे कृष्णकर्मे एवढ्या वेभवाला चढलेना आमच्या बायका-लेकी-सुनांना बलात्काराने ओढून नेऊनच यांनीं आपले संसार थाटले ना; आणि त्यांच्या पोटीं जन्म पावलेली अर्धबाटगी प्रजा आज आमच्या विरुद्ध ते लढवीत आहेत ना ! आम्ही ही इतकी मंडळी इथें जमलो आहों,-यांतला
मराठमंडळाचा निर्धार ह:
कोणी एक देखील असा नाहीं-कीं ज्याच्या घरांत त्या महानष्टांनी जीवित-वित्त- कलत्राची लुट केली नाहीं ! इतर कोणाला कांहींही वाटो, निदान मी तरी माझ्या बाबतींत झालेल्या अनथाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ राहाणार नाहीं. दाशरथी रामासारखे सच्छील, बृहस्पतीसारखे विद्वान् व कणोसारखे शूर माझे वडील बंधु रामचंद्रपंत त्यांना ह्या चांडाळांनीं काय समुद्रांत बुडवून ठार करावें ! आणि अन्याय काय तर माँ पुण्याला जाऊन पेशव्यांपार्शी गाऱ्हाणे गाइले ! आठवण झाली कौं सवोगाचा कसा तिळपापड होतो! ”
खंडूजी माणकर संतापाने दांतओोंठ खात मुठी आंवळन उद्गारला, “ आस- च्या घराण्यांत एकुलतीएक नक्षत्रासारखी मुलगी मिरा, मला एकुलतीएक बहीण ती व तिला एकुलता एक भाऊ मी ! मी भवानजी देशपांडे, गंगाजीबाबा वगेरे मंडळींबरोबर जनतेच्या वतीनें धन्यांच्या कानीं गाऱ्हाणी घालण्यासाठी गेलो म्हणून त्या हृळकट पाद्यानें-त्या फादर पोर्टोनें माझ्या बाळांना ते ठाण्याला कांद्दी कामानिमित्त गेळे असतांना पकडून काय ठाण्याच्या किल्ल्याच्या बुरुजांत चिणून मारावे! ”
“ आणि ती तुझी बद्दीण आतां कुठें आहे बरें ! ” नाइकांनीं विचारलें.
“: भगवान जाणे ! त्या दिवसापासून तिचा पत्ता नाहीं. कदाचित् तिला बाटवून तिचें एखाद्या फिरंग्याशीं लम लावून देण्यांत आलें असेल; काय झालें असेल तें असो. मी तर समजतो की, ती ज्या दिवशीं नापत्ता झाली त्याच दिवशीं मेळी ! मात्र मीं तेव्हांच अशी प्रतिज्ञा केळी आहे काँ, . माझ्या एका बहिणीऐवजीं हातीं सांपडतील तेवढ्या फिरग्यांच्या बायकामुलींना मी आमच्या लोकांच्या बटकी -कुळंबिणी करून सोडीन.”
“ हां | तेवढें मात्र करू नका.” चिमाजीअप्पा खंडूजीला हातानें गप्प करीत म्हणाले, “ मराठ्यांच्या नांवाला तेवढा कलंक मात्र लावूं नका. शत्रूची घरें लुटा, त्यांना कैद करा, ठार करा; तो कांहीं जुलूम नव्हे. तुमच्या देवदेवाल्यांचा त्यांनीं विध्वंस केला, त्यांचें पुनरुज्जीवन करा, धर्माचें पुनरुज्जीवन करा; तो कांहीं धार्मिक जुलूम होणार नाहीं. पण शत्रंंशीं झगडतांना देखील माणुसकीचे तोंड काळें करणारे अत्याचार कराल तर खबरदार ! स्त्रियांवर सुड उगविणें ह्वा कांहीं मर्दपणा नव्हे.” ते सर्वोना उद्देशून म्हणाळे, “ सर्वोनीं आपापल्या सेन्यांतील लोकांना
६४ पेशवाईतील धर्मसंप्राम
रि शिशिर ोबबुब॒ब
सख्त ताकीद द्या कॉ, शत्रूच्या बायकासुलांशीं जो निठठ्रपणाचे किंवा असभ्य वर्तन करील त्याला कडक शासन करण्यांत येईल. तो मग कोणीही असो.” चिमाजीअप्पांचा हा करडा हुकूम ऐकून सवानी स्तिमित होऊन तोंडांत बोटें घातलीं, व प्रत्येकजण दुसऱ्याच्या तोंडाकडे टकमक पाहूं लागला. त्यावर कोणी कांद्दीं बोललें नाहीं व चिमाजीअप्पांनींही तो विषय तेवढ्यावरच थांबविला. इतक्यांत बाजीराव बेठकखान्यांत आले व म्हणाले, “ आपल्या मंडळीने फिरंग्यांचें एक जहाज पकडून आणले वाटतें ! ”
प्रकरण चवथें 'दुस्मान खरा; पण दाणा' !
ही आनंदाचो वार्ता कानीं पडतांच सर्वे मंडळी बेठकखान्यांतून उठून समुद्राच्या बाजूकडील किल्ल्याच्या बुरुजाकडे निघालो. त्यांतल्या त्यांत सानाजी आंम्रे विशेष उत्सुकतेने सवांच्यापुढें होऊन पाहूं लागले. त्यांना विशेष उत्सुकता वाटण्याचे कारण आरमारी विजय म्हटला, कौ तो आपल्याच लोक्रांनीं मिळविलेला असला पाहिजे अशी त्यांचौ खात्री होती, ब ती वावगी नव्हती. चिमाजीअप्पांच्या संमतीने मानाजीरावांनीं वसईसभोंवार ससुद्रांतेत आरमारी वेढा देण्याचा उद्योग तीन चार दिवसांपूर्वीच आरंभिला होता व धातूच्या हालचालींवर टेहळणी ठेवण्यासाठी त्यांचौ कांहीं जहाजे वसई आणि मुंबई या दरम्यानच्या टापूत मुद्दाम फेऱ्या करीत हाती. सर्वे मंडळी बुरुजा- वरून पाहूं लागली, त्या वेळो समुद्रांत नजरेच्या होऱ्यांत अश फक्त तीनच जहाजे थोड्या अंतरावरून किल्ल्याकडे येत असलेलों दिसत द्दोतीं. त्यांपका दान जहाजांवर मराठ्यांचा भगवा झंडा फडकत होता ब त्या दोन जहाजांच्या मधून चालणाऱ्या तिसऱ्या जहाजावर पोतुंगींजांचे निशाण फडकत होतें. अर्थात मराठ्यांच्या त्या दान जहाजांनीं पोतुगीज जहाजाला पकडून आणल असल्या: बहल मुळींच संशय नव्हता. त्या वेळीं समुद्राचा देखावा फारच नयनमनोहर दिसत होता व त्या मनोहारित्वांत त्या तीन जहाजांची भर पडली होतो. वसइंच्या वेढ्यांत पाहिला विजय मिळविण्याचा मान सर्व मराठमंडळांत प्रथम आपल्या वांट्यालळा आला असे पाहून मानाजीरावांना जितका अभिमानपृण संतोष वाटला, तितकाच सवे मराठमंडळालाही वाटला. चिमाजोअप्पा मानाजीरावांना म्हणाले, “ वजारतमाब ! वसईच्या वढ्यांतील भावी विजयांत अग्रपूजेचा मान तुम्हीं मिळविला. आपल्या कार्याला शकून तर फारच नामी झाला.”
“ हो आपणां उभयतांच्या पायांची कृपा.” मानाजीराव प्रसन्न चित्ताने उद्गारले. त्यांच्या ह्या उद्गारांत बराच खोल पण तितकाच स्पष्ट अर्थ भरलेला होता. तो तेथल्या सर्व मंडळापेक्षां बाजीराव व चिमाजीअप्पा यांच्या विशेषे-
करून ध्यानीं आला, मानाजीराव ब संभाजीराव ह्या दोघां भावांच्या भाऊबॅदकॉत पे.... ५
६६ पेशवाईतील धर्मसंग्राम
"क ४ - -*"* €%* €* १४ */0% ४४४ ४.” ४४ ४.”१५” १९.९ 0५.४४ .५९..»४४९.४४१.५४९%-४ ४०४४ ४०४९७४४ ४.०४ ७.४ १. %..७४../४.. ५४% ४, ७_// ५_”0९_४0 अब ४%.-५४-.-५/७ -“000:.”
पेशव्यांनीं मानाजीरावाचा पक्ष धरून संभाजीरावांना जवळजवळ नामोहरम केलें होतें व आंग्य्यांच्या दांलतीचे मुख्य धनी म्हणून मानाजीराव गाजू लागले होते. त्याला अनुलक्षन मानाजीरावांनीं पूर्वोक्त उद्गार काढले होते
हां ह्वा म्हणतां तों तीनद्दी जहाजें वंद्रांत आलीं. त्याबरोबर पोर्तुगीज जहाजावरील निशाण खालीं उतरले गेलें. बुरुजावरील सर्व मंडळी तो प्रकार कौतुकाने पहात होती. अनाळा किल्ल्यावर अभिमानाने फडकणाऱ्या मराठ्यांच्या भगव्या झेंड्याला मान देण्यासाठीं पोतुगीज जहाजावरील निशाण खालीं उतरविलें गेलें हे उघड द्वोते. पोतुंगीजांनीं मराठयांच्या भगव्या क्षेंड्याला इतका मान दिला असा वसईची मोहीम सुरू झाल्यापासूनचा पहिलाच प्रसंग होता. एवढा अभूत- पूर्वे मान मराठमंडळाला मिळवून देण्याचें श्रेय आंग्ऱ्यांच्या आरमाराला संपादन करतां आले असं पाहून बाजिरावांनीं मानाजीरावांपा्शी जाऊन त्यांची पाठ थोपटली.
“ ह्या जह्माजांत कोणीतरी खाशी पोतुगीज मंडळी असावी असें वाटतें.” मानाजीराव म्हणाले. ती मंडळी कोण असावी याविषयीं बुरुजावरील मराठ- मंडळांत तर्कवितक सुरू असतांनाच तीं तीनह्दी जहाजें बंदरांत शिरल्यामुळें बुरुजाआड होऊन दिसेनाशी झालीं.
“ चळ; आपण वेटकखान्यांत जाऊं. आतां ती मंडळी कोण असेल ती आपणांसमोर आणली जाईलच.” असे म्हणून मानाजीराव आंत जावयाला निघाले. त्यांच्या बरोबर सर्वे मंडळी बेठकखान्यांत गेली. तेथेंद्वी त्यांच्या गप्पा ऱवालल्याच होत्या.
थोड्याच वेळांत आंग्ऱ्यांच्या दोन जहाजांवरील मख्य दर्यावर्दी बहिर्जी तांडेल व हिरोजी तांडेल हवे दोन पोतुगीज स्त्रियांना घेऊन बेठकसान्यांत आले. त्या दोन्ही स्त्रिया रूपानें सुंदर व तरुण होत्या; पण त्यांतल्यात्यांत एक तर विशेष सुंदर, तेजल्वी व वयाने केवळ सोळासत्रा वषांची होती. दुसरी सुमारें बावीस वषीच्या वयाची व पहिलीपेक्षां सोदयांत दोन कस कमी होती; पण हे दोन कस कमी पहिल्या मुलीच्या सोदर्याशीं तुलना करतां; एरव्हॉ तिची गणना रूपवती स्त्रियांत निःसंशय होण्यासारखी होती. दोघींच्याही अंगावर बहुमोल अलंकार
आनन --- -->->>>_____ 2 ळा.
*% आंग्ऱ्यांची भाऊबंदकी व पेशब्यांनों त्या भाऊबंदकींत केलेली मध्यत्थ "पेशवाईतील पश्चिमादिग्विजय' ह्या पूर्दीच्या कादंबरीत पद्दावयास मिळेल
“दुस्मान खरा; पण दाणा! ! २७
२-५ १-0 ४० *०”” “€ वी ॥४* ४ "५ “१-१.” ४-९४-””२ क.
क्षेते व त्यांचा पोशाकद्दी भारी किंमतीचा होता, भीतीनें त्या दोघींचीही वादरलेल्या इरिणींसारखी अवस्था झाली होती.
“ ह्या स्त्रिया तुम्हांला कोठें सांपडल्या ! ” मानाजीरावांनीं बहिजाला प्रश्न केला.
बहिर्जी, उत्तरला, '“* सरकार ! आम्ही जें जहाज पकडून आणले आहे तें फिरंग्यांचें आहे. सुंबईहन इंप्रजांकडून शस्त्रसामुम्री व बरेंच धन घेऊन तें वसईकडे येत असतांना मनोरीपाशी आम्हां तें पकडले. त्या जदह्दाजावर ह्या दोन स्त्रिया आम्हांला सांपडल्या. '
“ एवढ्या दोन स्त्रियाच फक्त जहाजावर होत्या का! ” चिमाजीअप्पांनी विश्चारले.
“ नाह्दीं सरकार ! आणखीद्दी कांद्दी मंडळी त्या जहाजावर आहे. त्या सवांना आम्ही बंदोबस्ताने केद केलें आहे. आपली आज्ञा असेल तर त्यांनाही आपणा- समोर आणून इजर करतो.” हिरोजी उत्तरला.
“ मग ह्या दोन स्त्रियांना तेवढ्या आमच्यासमोर कशाला आणल्या! ? चिमाजीअप्पांनी प्रश्न केला.
“ सरकार! ह्या दोन्ही स्त्रिया सेनार्पाते सिल्व्हेराच्या परिवारांतील आहत. ही मोठी स्त्री सेनापतीच्या वडील बंधूंची मुलगी असून धाकटी खुद्द सेनापतींची मुलगी आहे.” हिरोजी उद्गारला.
*“ असतील ! मग! इतर सर्वे कैद्यांना मागे ठेवून प्रथम ह्या दोन स्त्रियांनाच पुढें आणण्याची तुम्हांला एवढी काय गरज भासली! ”
चिमाजीअप्पांच्या ध्या कड्या प्रश्नावर काय उत्तर द्यावें हॅ त्या दाघांही तांडेलांना सुचेना. ते अगदी गोंधळून गेले. ते इतके गोंधळून जाण्याचें कारण त्या दोन स्त्रियांना पुढें आणण्यांत त्यांचा उद्देश अगदीं निराळा होता. प्रत्यक्ष त्यांचे थनी मानाजीराव आंग्रे व बाजीराव पेशवे ही दोन रंगेल खाशी मंडळी
किल्ल्यावर असल्याचें त्यांना माहीत असल्यानें त्या दोघांना प्रसन्न करून आपलें नशीब उदयाला आणण्यासाठी त्यांनीं एवढी दक्षता बाळागेली होती. ल्या लोभा. च्या जोडीला फिरंग्यांवर आजवरच्या अत्याचारांबद्दल सूड घेण्याची भावनाही होती आणि चिमाजीअप्पा जर त्या बठकॉंत नसते, तर त्या शिपायांची अपेक्षा कदाचित पूर्ण झालीहो असती; निरुपायास्तव त्या दोन्ही तरुणी पेशवे किंवा आंग्रे यांच्या विलासमंदिरांतील विलासललना वनून राहाग्याचें पत्करून आपला
६८ पेशवाईतील धर्मसंप्राम
€ ४ ४* *४ “ण 9 “0१-/%-”१४.५१-”€१ “"-/१% ४१.२-€२>/१९-५४%-५% ४१%.” ८ *-९१-/४-५४-/१४-/१४./१४-/५ 0१.”९.५४११./४१-” “९५/४ “४ ४५०/॥0% 00 “५८८”२.>”.
बचाव करण्याला राजी झाल्या असत्या. पेशवे आणि आंग्रे यांनोंहो त्यांचा स्वीकार कदाचित् केला असता व त्या शिपायांना त्या कामागेरीबद्दल योग्य पारिताषकही मिळालें असते; पण चिमाजीअप्पा तेथे असल्यामुळें सारा बेत फिसकटला.
विंमाज्ीअप्पांनीं इतर कद्यांना घेऊन येण्याला त्या दोन्ही तांडेलांना हुकूम केला. त्याप्रमाणे ते दोघेही निघून गेल्यावर अप्पांनी त्या दोन्ही स्त्रियांना एका कोचावर बसावयाला सांगून म्हटले, “ बाई! हा पेशव्यांम्वा दरबार आहे; येथे तुम्हांला भिण्याचें कांहीं कारण नाहो. यर्थ तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही आम्हांला आमच्या वाहेणींप्रमाणे आहां. त्या दोन्ही तरुणी कोंचावर बसल्यावर चिमाजीअप्पांनीं त्यांना विचारल, “ तुम्ही कोठुन आलां! ”
त्या पोर्तुगीज तरुणींना मराठी बोली चांगली कळे; पण चांगल मराठी बोलतां मात्र येत नसे. त्या धेडगुजरो मराठोांतून बोलत. ( त्यांचें बोलणे ह्या कादंबरीत शुद्ध मराठींतच देण्यांत आलें आहे. ती धाकटो तरुगी म्हणाली, *“ आम्ही मनोरीहून आलो. माझे वडील मनोरीला मठ बांधून राहिले आहेत. त्यांच्या भेटोला आम्ही गेला होतो. आम्हांला तिकडे जाऊन अठ दिवस झाले. आंग्य्यां. च्या आरमाराने हा समुद्र व्यापण्याला सुरुवात केलो आहे असे आम्हांला कळलें व त्यामुळे आमचो कुचंबणा झाली होती. अखेर आम्हा ज्या जहाजांतून गेलों तें जहाज मुंबईहून माघारे येइईपावेतो आम्ही थांबलो. जातांना माझे वडील सेनापाते सिल्व्हेरा आमच्यावरोवर होते. ते तांतडीनें पुढे निघून गेले व आम्हो आमच्या जह्याजांतून वसईला यावयाला निघालो, तो आपल्या चांचे लोकांनी आमच्या जहाजावर दृष्टा करून तें पकडले.
“ पहा धाकटे श्रीमंत ! हो सेनापतीची पोरही कितो उद्दामपणानें बोलते पहा ! ' अंताजी रघुनाथ उद्गारले.
“ बाई ! खरें, तुमचीं दोघाची नांवे काय ! ” चिमाजोअ'पांनी प्रश्न केला.
धाकटी तरुणी उत्तरली, “ माझें नांव पोर्शिया व ईरचें नांव बार्बारा.”
“ पोशिया ! ” बुबाजी गंगाजी नाइकांच्या कानाशीं लागून एकाकडे म्हणाला. « दादा ! हिच्याशींच किठ्लेदाराचा मुलगा डोमिंगो याचें लग्न ठरलेलें आहे असे सं काल ऐकले.”
“दुस्मान खरा; पण दाणा! ! ६९
चिमाजीअप्पा पो्शियाला म्हणाले, “ पोशियाबाई ! आमच्या लोकांना अशी
उपमर्दकारक भाषा वापरणें बरे नाही. ज्यांनीं तुमचें जहाज पकडले, ते चांचे
नसून आमचे नेकजात दर्यावर्दी आहेत. त्यांनीं तुमचें जहाज पकडले ते यथा- योग्यच केलें. ही लढाई आहे हे तुम्ही जाणतांच.”
“ पण आपल्या लोकांनी आमची बरीच विटंबना केली.” बार्बारा म्हणाली.
“ आणि तुमच्या लोकांनी आजवर आमच्या बायका लेंकी-सुना-बहिणींची काय थोडी विटंबना केली ! ”' नाइकांनीं रागारागाने विचारलें.
चिमाजीअप्पा नाइकांना गप्प राहण्यासाठी हातानें खण करून त्या दोन तरुणींकडे वळून म्हणाले, “ त्या लोकांनीं तुमची विटंबना केली असेल तर मात्र तो त्यांचा अक्षम्य गुन्हा झाला; त्याबद्दल त्यांना योग्य शासन करण्यांत आम्ही कसूर करणार नाहीं. सांगा, त्यांनीं काय केल ! ”
पोशेया उत्तरली, “ त्यांनी आमची चेट केली. तुम्ही आमच्या धन्याच्या रंगमहालांतील विलासदासी होऊन राहिलें पाहिजे, नाहीपेक्षां तम्हांला समुद्रांत बुडवून ठार करू अशी धमको त्यांनीं आम्हांला वातली.”
“ एवढेंच ना ! असो. ती त्यांची चूक झाली. त्या लोकांनीं 'जशास तसे' ह्या न्याय अंमलांत आणण्याचें योजिले. तुमच्या लोकांनी आजवर आमच्या हिंदु-स्त्रियांची जी विटंबना चालविली आहे, त्यामुळें चिटठून ते लोक तसें बोलले असतील; पण आतां तम्हांला भिण्याचें कांहीं कारण नाहीं.” बाजीराव म्हणाले.
“ तुम्हांला आतां कोठें जावयाचे आहे! ' चिमाजीअप्पांनीं विचारलें.
"८ वसईला.” पोशया उत्तरली.
“ ठोक आहे. तुमची वसईकडे सुखरूपपणे रवानगी करून देण्यांत येईल.” चिमाजी अप्पा म्हणाले.
इतक्यांत आंग्म्यांचे लोक वाकीच्या पोतुगीज केद्यांना घेऊन तेथें आले. त्यांच्याबरोबर एक इंग्रज तरुणही होता. बाजीरावांनी त्या इंग्रज तरुणाकडे बोट करून प्रथम विचारलं, “ हा इसम ह्या पोतुगीज लोकांहून निराळा दिसतो. हा कोण!”
“ पेशवे सरकार ! मी त्यांच्यापासून निराळाच आहें. मी इंग्रज आहें. रोबर्ट- सन् माझे नांव, इकडील कांडी महत्त्वाच्या कामागेरीवर माझी नेमणूक झाली आहे. माझ्या नांवावरून आपल्या कांहीं मंडळीला तरी माझी ओळख पटलीच असेल.
२० पेशवाईतीळ धर्मसंग्राम
आजी पोर्तुगीज सेनापाति पेड़टो डिमे लो ठार झाला तो माझ्याच हातून. मराठ्यांना साह्य करण्यासाठी इंग्रज गोलंदाजांची एक तुकडी ठाण्याच्या वेद्याच्या वेळो इकडे आलो, त्यांत मी होतो. त्याच्याही पूर्वी मी आमच्या सरकारच्या हुकुमावरून पोतुंगीजांच्या वतीनें ठाणे, तारापूर, वसई वगेरे ठिकाणीं तोफखान्यावर काम केले असल्यानें पोर्तुगीजांची बरींच गुह्यें मला माहीत आहेत.'' राबर्टसन् म्हणाला. “ असें काय ! मग रोंबर्टसन् ! तूं हकनाहक ल्या संकटांत सांपडलास. तुझी नोकरी आमच्याकडे रुजू आहे व तुझी आम्हांला अजून गरजही आहे; पण-"” रोबर्टसन् चिमार्जाअप्पांचें पुरतेपणी बोलून होण्यापूर्वीच म्हणाला, “ आणि माझ्याही मनांतन आपल्या आश्रयाला रहावयाचे आहे. सुंबईकर इंग्रजांचा मी नोकर पडल्यामुळें मळा हो कामागेरी पत्करावी लागली हे जरी खरें, तरी ज्या जहाजावरून मी आलो, ते जहाज आपल्या लोकांच्या स्वाथोन होण्याच्या कामीं साझी बरीष्ष मदत झाली आहे. पाहिजे तर आपल्या लोकांना विचारून पहा.) :. शोष्ट खरी आहे सरकार ! ” मानाजोरावांनीं आपल्या वहि्जो तांडेलाकडे वळन पहातांच बाहिजी म्हणाला. रोवर्टसन् हा सोफियाचा प्रियकर होता हे वाचकांना माहीत आहेच. त्या दोघांच्या प्रेमसंबधांत पोतुंगीजांनीं विष कालविल्यामुळें तो चिडून पोर्तुगीजांवर उलटला होता. पेड़ो डि मेलोला ठार करून त्याने अर्धवट सूड घेतला होता; पण तेवढ्याने त्याचें समाधान झालें नव्हतें. आणखी सूड घेण्याचा त्याचा विचार होता व शिवाय त्याला सोफियाची प्रात करून घ्यावयाची होती. ठाण्याचा किल्टा मराठ्यांच्या हातीं आल्यावर सोफियाला भेटून पुढील बेत पार पाडण्याचा त्याचा विचार होता; पण तेवढ्यांत सुंबईचें सरकार बदलन मराठ्यांच्या मदतीला आलेल्या गोलंदाजांच्या तुकडीला माघारें मुंबईला येण्याचा हुकूम सुटल्या कारणानं सर्वोवरोबर रांबर्टसनलाही माघारे जाणें भाग पडलें होते. तेव्हांपासून पुन्हा वसईकडे येण्याचा राबर्टसनचा प्रयत्न सुरू होता. तोंच सेनापाते सिल्व्हेरा इंग्रजांची मदत मागण्यासाठी व कर्ज मागण्यासाठी मुंबईला जाऊन पोचला, तेव्हां रॉबर्टसनला संधि सांपडली. पण वसईला गेल्यावर तेथले लोक आपणांला
ओळखतील व आपलें जीवित धोक्यांत पडेल हें त्याळा माहीत होतें. म्हणनच तो मध्येंच निसटण्याची वाट पद्दात दह्दोता. त्याच्या सुदवानें त्याला तश्षी संधि ळोकरच मिळाली. आंमग्य्यांच्या जहाजांनीं मार्गोत त्या पोर्तुगीज जहाजाल!
“दुस्मान खरा; पण दाणा? ! ७१ गांठले तेव्हां रॉवटसनने तें जहाज पाडाव होईल अशी खबरदारी घेतली. त्यानें कसून गोलंदाजी चालविली असती तरी बहिर्जी तांडेल व हिरोजी तांडेल यांनीं तें जहाज हातचें सोडलें असते असें मुळींच नाही; पण पोर्तुगीज जहाजावर फितूर झाल्यामुळें त्यांना उभयपक्षी रक्तपात टाळतां येऊन जहाज पाडाव करतां आले इतकेंच.
ठाण्याच्या वेद्यांत मल्हारराव होळकरांनी रोबर्टसनची अप्रतिम गोलंदाजी पदरीं असणें श्रेयस्कर आहे असें त्यांना वाटून त्यांनीं बाजीराव, चिमाजीअप्पा यांना बाजूला घेऊन त्यांच्याशीं त्या बाबतींत वाटाधाट केली. सर्वानुमतें रोबर्ट- सनला आपल्या पद्रां आश्रय द्यावा असे ठरले. त्याप्रमाणे चिमाजीअप्पांनीं रोवर्टसनला सांगितळें, “ ठौक आहे, तुला आम्हीं आमच्या पदरीं आश्रय दिला आहे. तुझा तनखा वगेरे ठरवावया'चा तो मागाहून ठरव."
“ कबूल आहे.” रोवर्टसन् उद्गारला. तो मराठ्यांना सामील झालेला पाहून साऱ्या मराठमंडळाला जितका संतोष वाटला, तितकाच तेथें केद करून आणण्यांत आलिल्या पोतुंगीज लोकांना व विशेषतः बार्बारा आणि पोरढिया यांना विषाद वाटला; पण त्यांना विषाद वाटून उपयोग काय !
हिरोजी तांडेलाने चिमाजीअप्पांना विचारले, “ सरकार ! आतां ह्या इतर केद्यांची काय व्यवस्था करावयाची ! ”
चिमाजोअ'पा त्यावर कांही बोलण्यापूर्वीच त्या पोतुगीज केद्यांपेक्री प्रमुख -त्या पोर्तुगीज जहाजाचा कप्तान फ्रॅन्तिस आतां आपणगांपेक्रो कोणाचोच धडगत नाहीं असा रंग पाहून निदान सवांचा जोव तरी बचावावा ह्या उद्देशानें बाजीराव व चिमाजीअप्पा यांना हात जोंडून गयांवयां करून उद्गारला, “ सेहेरवान सरकारांनीं आम्हांला जोवदान देऊन आपल्या पदरी आश्रय दिल्यास आम्ही इमानेंइतबारें सरकारांची सेवा करण्याला तयार आहो. पण आमची बायकामुले वसईच्या किल्ल्यावर अडकून पडल्यामुळें त्यांच्या जिवाळा धोका पोचणार नाहीं अशी हमी सरकारांनी आम्हांला द्यावी.”
मल्हारराव होळकर म्हणाले, “ धाकटे श्रांमंत ! आपला नारायण वसईच्या किल्ल्यावर कोंडला गेला आहे; यास्तव ह्या मेंडळीपक्री एकजणाला क्रिल्ल्यावर पाठवून सेनापतीपाशीं नारायणाची मागणी करावी; नारायण सुखरूपपणे आमच्यांत येऊन पोचेपर्यंत ह्या सर्व मंडळीला ओलीस धरलें आहे व नारायण
७२ वेशवाईतील धमेसंप्राम
४ “%५-५/%././४० /% 0.५”. ४.१... ७. ४ /” ७४ ४८.४.
टा" ४५०५८० ८४४४
उद्यांच्या दिबसांत सुखरूपपणे आमच्याकडे येऊन पोचला नाहीं तर ह्या सर्व मंडळीचा शिरच्छेद करण्यांत येईल असें सेनापतीला कळवावे.”
बुबाजी म्हणाला, “ नारायणराव ताबडतोब सुखरूपपणे आले नाहींत तरह्या सर्व मंडळींचा शिरच्छेद करून त्यांचीं मुंडकां नजराण्यादाखल पाठविण्यांत येतील अर्से सेनापतीला लिहावे. जशास तसे!”
ह्या भयंकर बेतांनीं सर्व पोर्तुगीज कंदी घाबरून भीतीनें लटलटा कापू लागले. वांबाोरा व पोर्शया ह्या दोघींनाही भीतीने कांपरे भरलें. पोशिया चिमाजीअप्पांना हात जोडून काकुळतीला येऊन विनवृं लागली, “ मेहेरबान सरकारांनी आम्हां दोघींना सुखरूपपणे किल्ल्यावर जाऊं द्यावे, म्हृणजे आम्ही सरकारच्या माणसाची ताबडतोब मोकळीक होईल अशी व्यवस्था करण्याची हमी घेतो.”
“ आणि इतरांच्या बायकापोरांची काय वाट ! ” प्रॅन्सीसने पोशियाला विचारले. त्याला व त्याच्याबरोबरच्या इतर पोतुगीज केंद्यांना पोशियाचा स्वाधेसाधूपणा सुळींच रुचला नाहीं.
पार्शया आपण सेनापतीची कन्या ही जाणीव मनांत ठेवन तोऱ्यांत उत्तरली. “ तुम्ही सवजण आपण होऊन सरकारबहारांना शरण आलां आहां व आपल्या कामांत कुचराई करून आमच्या सरकारचं अपरिमित नुकसान केळे आहे. तुमच्या बायकांमसुलांची हमी आम्हांला कशी घेतां येईल! '
“ तर मग तुम्हां दोघींनाही तोंवर आमच्या केदेंत रह्वावे लागेल.” वाजीराव कठोर स्वरांत उद्गारले.
आतां हा प्रसंग कसा टाळावा याविषयीं पोर्शया व बावारा यांचें आपस्रांत पो्टुंगीज भाषेंत कांहीं संभाषण झालें, तेवढ्यांत फ्रॅन्तिसने बाबाराला मध्येंच विचारल, “ बाबारा ! प्रिय बार्बारा! माझ्यावर तुझें जे प्रेम आहे ते खरे असेल तर तूं सवांची काळजी घेतली पाहजे.”
बार्बारा ही विधवा असून तिचे फ्रॅन्सिसवर व फ्रॅन्सिसचें तिच्यावर प्रेम होतें. फ्रन्सिसने आपल्या पहिल्या बायकोशी काडीमोड करून बार्बाराशीं लग्न करावयाचें फार दिवसांपासून ठरावलें होतें; व ती गोष्ट लोकरच अभलांत यावयाची होती. फ्रॅन्सिसला स्वतःला कांहींच मूलबाळ नव्हतें व त्याच्या पहिल्या बायकोची तिकडे कांदींद्दी गत झाली असती तरी त्याला तिची पर्वा नव्हती. पण असे असतांही तो आपल्या हाताखालच्या लोकांच्या बायकासुलांसाठीं कर्तव्य म्हणन अशा प्रसंगी
'दुस्मान खरा; पण दाणा?! ! ७३
“६... “*-/४*-४ ४.१ -/१0.”% ”% ४ १...” “४. ४१४४७ ७८४ ७४४७४४ “चक
काळजी वाहत होता. पण पोशियाला तें काय होय. तिला बार्बारा व फ्रॅन्सिस यांचा प्रेमसंबंध माहीत होता. पण ती केवळ स्वतःपुरतें पहाणारी मुलगी, ती फ्रॅंन्सिसला म्हणाली, “ फ्रॅन्सिस ! सर्वाच्या उठाठेवी तुम्हांला कशाला पाहिजेत ! तुम्ही तुमच्यापुरतें पहा व मीही वसईला गेल्यावर तुमच्या सुटकेची तेवढी खटपट जरूर करीन.”
फ्रेरिसिस पोर्शियावर रागावून म्हणाला, “ पोशिया ! इतका स्वार्थी मी अजून चॅनला नाही. माझ्या हाताखालच्या नोकरांची काळजी मी वाहिली नाहीं तर दुसरा कोण वाहील ! ”
बार्बारालाही पोर्शियाचा स्वार्थसाधूपणा आवडला नाहीं. ती तिला म्हणाली? “ पोशिया ! आज माह्या प्रियकरावर प्रसंग आला आहे, तसाच जर डोमिंगोबर आला असता, तर तुला कसें वाटलें असतें ! तूं सेनापतींची एकुलती एक लाडकी मुलगी आहेस, त मनावर घेश्ीळ तर आपल्या पित्याकडून कोणतीही गोष्ट घडवून आणशील.”
बाबारानें केलेल्या मनधघरणी'चा पोशियाच्या मनावर वराच इष्ट परिणाम झाला. निदान तिनें बाह्यात्कारी तरी पेशव्यांच्या दोन्ही अटी सेनापतीकडून तंतोतंत पाळल्या जाण्याविषयीं शक्य तेवढी खटपट करण्याचें कवूल केले, लगेच चिमाजीअप्पांनी त्या दोघींनाही साडी-चोळी देऊन नंतर हिरोजीळा आज्ञा केली, “ हिरोजी ! ह्या दोन्ही बायांना आपल्या जद्दाजावरून सुखरूपपणे वसईच्या किल्ल्यावर नेऊन पावत्या कर. यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होतां कामा नये, याद राख ! ” ते तसेच त्या दोघींकडे वळून म्हणाले, “ तुम्ही सेनापतीला समजावून सांगा की, मराठ्यांचे सिंहासन धर्माच्या भक्कम पायावर उभारलेले आहे, त्यामुळे त्या धर्म: शिंह्मसनासमोर तुमच्यासारख्या अधभेकम्याचचा पाड मुळींच लागावयाचा नाही. मराठ्यांच्या अंगीं सामर्थ्य पुरेसें नव्हतें म्हणून ते तद्वाळा तयार झाले होते असा जर सेनापतीच्या डोळ्यावर धूर आला असेल, तर त्याच्य़ा बायकासुलांना देखील वंदिवान करून आणण्याइतके चातुर्य व सामर्थ्य मराठयांच्या अंगी असलेले पाहून तो धूर कमी होईल व त्याचे डोळे उघडतील.”
याप्रमाणें त्या दोन पोतुगीज तरुणांची चिमाजीअप्पांनीं गोरवपूर्वक पाठवणी केली, तें पाहून सर्वोना त्यांच्या औदार्याचें व दानतीचें अपरंपार कोतुक वाटणें
७७४ पेशवाईतील धर्मसंप्राम
४७४७ ७.४.” ७४१. -४*५ ४८ ५/१४४-४%-/%* %/५-४१.-.” “४-४.” “५.४९.
“४-५” १-/% ४.४ ४.” ४.४४.” ४५.८" ४४-४७ ४१ » ७.४४ २.४.” * “४ /४९-” ४.५४ ७ /४-/00५./१५,” ४५0४५ 00.४0 कळ
साहूजिक होते. इतका सज्नन धनी आपणाला लाभला असें पाहून त्या पोर्तुर्गाज केद्यांनाही संतोष वाटला,
त्या दोघी तरुणी जावयाला निघाल्या तेव्हां बार्बारानें फ्रॅन्सिसचा अश्रुपूण नयनांनी निरोप घेतला, व “परमेश्वर तुला सुखी ठेवो' अशो त्याच्यावषयीं तिनें परमेश्वराची करुणा भाकली. तो नेतर पोशियाबरोबर बंदरावर गेलो व वसईकडे जाण्यासाठी योजिलल्या लहानशा जहाजावर चढतां चढतां पोशियाला म्हणालो, “ हा चिमाजीअप्पा पेशवा दुस्मान खरा; पण दाणा आहे. अशा पुण्यपुरुषाशां झगडून आम्हां पोतुगीजांना कधींच जय मिळायचा नाही."
पोशिया आंतल्या गांठोचो होतो; तो यावर कांहींच बोलली नाही.
त्या दोघीजणी वसईकडे रवाना झाल्यावर चिमाजोअप्पांनीं बार्कीच्या सर्वे पोर्तुगीज कद्यांना वंधमुक्त करून त्यांच्या त्यांच्या दजाला साजेल अशी त्यांची व्यवस्था लावून दिलो व ते पळून जाऊं नयेत म्हणून त्यांच्यावर फक्त नजरकेद ठेविली. नंतर पकडलेल्या पोर्तुगोज जहाजावरील सामानाची मोजदाद करण्यांत आलो, तेव्हां कांहो लांब पल्ल्याच्या तोफा, बऱ्याच सुधारलेल्या इंग्रजी बरका, बराच दारूगोळा, पुष्कळसे धान्य व कांही रोकड एवढा माल हातीं लागला. त्यामुळे मराठयांच्या पूर्वनियोजित बेतांना विशेष बळकटी आली. त्या पोतुगीज मुलोंच्या मध्यस्थीने नारायणरावाची सटका हाईल किंवा अन्य कांहीं कार्यभाग साधेल अशो फारशो आश्या कोणालाही नव्हतीच. त्यामुळें प्रत्येक जण त्याच दिवशीं आपापल्या उद्योगाला लागला. त्या खटपटॉत सर्वोना विशेषतः खंडूजी माणकर, नाईक वगरे स्थानिक मंडळीला भवानजी, त्याचा मुलगा भेरव व दुष्टभजी यांचो वाण भासत हाती. पण ते तिघेह्दी त्या वेळीं कोणत्या प्राणघातक संकटांत सांपडले होते याची कोणाला काय कल्पना असणार !
प्रकरण पांचर्वे
फादर पोर्टाच्या न्यायासनासमोर
उकु|ुतां आपणांला पोर्तुगीज अंमलांतील धर्मशासनाचे भेसूर गाद पाया साठीं पुन्ह्या पूर्वस्थळी-चुळणें येथील देवीच्या देवालयासमोर गेलें पाहिजे. सोफियाबरोबर आलेल्या त्या दोन तरुण व सुंदर मुलोंपॅकी जिच्यावर त्या अधिकाऱ्याची पापी दाटे खिळून बसली होती, ती सुमारें अठरा वर्षोची होती. तिचा वर्ण गोरा होता व त्या गोरेपणांत गुलाबी रंगाची लाली मधून मधून मिसळली हाती. नाजूक तर ती इतकी होती कीं, सू्योदर्याच्या बालकिरणांच्या- तिरपींतून चालऱ्यामुळे देखील विच्या मूळच्या गुलाबी गालांवर लालिमा पसरली होती. तिचे डोळे विशाल व पाणीदार होते, तरी पापवासना मनांत धरून तिच्या- कडे पहाणाऱ्या कोणाही पापात्म्याला भय दाखविणारे निदान 'मी त्या गांवची नाहीं' असें दाखावेणारे होते. तिचे नाक अणकुचीदार होतें. व तें तिच्या नाकावर राग असल्याची साक्ष देत होते. तिचा बांधा मध्यम उंचीचा व फार स्थूलद्दी नाहीं व फार कृशह्दी नाही असा सडपातळ होता. तिचा कटिभाग इतर शरीरा- च्या मानानें किंचित निमूळता होता, त्यामुळें तिच्या लावण्यांत विशेष भर पडली होती. तिनें आपल्या लांबलचक सडक काळ्याभोर केसांची वेणी वळून आपल्या पृष्ठभागावर मोकळी सोडली होती, व त्या वेणीच्या अम्राला फुलें गुंफलेली होतीं. तिचा पेहराव अगदीं साधा होता. तिने एक साधी साडी परेधान केली होती. व अंगांत साधी चोळी घातली होती. तिचे पाय मोकळेच होते. मात्र तिच्या अंगावर एकही अलंकार नव्हता व तिच्या भालप्रदेशावर कुंकुमातिळलक नव्हता. त्यामुळे दोन भुवयांच्यामध्यें ोंदलेली चंद्रकोर स्पष्टपणें उमटून दिसत होती. ती सुलगी कोणी उच्चवर्णीय हिंदू असावी अशी साक्ष तिला पहातांच सकृदृ्शनींच कोणाच्याही मनाला पटण्याजोगी होती. विशुद्ध वृत्तीच्या माणसाला तिच्याकडे पाहून तिच्या ललाटी कुंकुमातिलक नाद्दी दे अवलोकन करून ती कोणी हिंदु बालविधवा तरी असावी किंवा बाटून खिस्ती झाली असावी असें वाटून तिची कींव आली असती; पण त्या अधिकाऱ्याचे मन पापी असल्यानें त्याला त्याच एका कारणा मुळें किंचित् धिटाईनें तिच्याकडे पहातां येत होते. त्या सुलीबरोबरची दुसरी
७६ वेशबाइईंतीळ धर्मसंग्राम
२०६ ४.४४. ४०/७५/९४७५” “५१-५४ ४-४ “४४४
_/२.-९--५८५---५८-५८/-८-५८८८-८-५८-८-८५८-६-८८८५८८५८५८५ “४2४४-४४-४४ यापट-०- -“:-/-८/---५/५--५-८५८८८८०८-/०८>-/०/
मुलगीद्दी बरीच रूपवान होती; पण तिनें रूपापेक्षां नखरा बराच केला होता. ती वयानें पहिलीपेक्षां थोडी मोठी होती. ती जरी चर्येवरून जन्मतः हिंद असावीसें दिसत होतें, तरी तिचा एकंदर पेहराव बाटग्या मुलीला साजेसा होता. तिच्या पायांत बऱ्याच उंच टांचेचा मखमालीचा विदेशी थाटाचा जोडा होता व तिनें धारण केलेले अलंकार-पेहराव यांतही विदेशीपणाची स्प झांक मारत होती. तिच्याही ललाटी कुंकुमातिलक नव्हता; पण तिचें उघडें कपाळ तिच्या पेहरावाला तसेच साजेसें होते. ती एकटीच कोठें गेली असती, तर तिनें कोणाचेंह्ी विशेषतः रंगेल व चिछोर वृत्तीच्या समाजकंटकांचें चित्त आपणांकडे खास वेधून घेतलें असतें; पण त्या दुसऱ्या स्वरूपसुंदर मलीशेजारीं ती उभी असल्याने गुलाबाच्या फुलाशेजारी कण्हेरीचें फूल ठेवल्याप्रमाणें तिच्या नखरेबाज सोदयींचा नूर अगदी उतरून गेला होता.
त्या दोन मुलींच्या रूपांत व वेशभूषणांत जसं अंतर होते, तसेच त्यांच्या वत्तींतही अंतर हेते. पहिली मुलगी नेहमीं अंतमुख दृष्टीनें आत्मनिरीक्षण करण्यांत अथवा आणखी कसल्या तरी गूढ परिस्थितीचा विचार करण्यांत गढून गेली आहे व तिचे सभावारच्या जगाकडे फारसें ७&य नाहा. अस दिसे; तर दुसरी मुलगी लोलुपतेनें डवरठेल्या चैचल दृष्टीने सभोवारच्या जगाकडे पहात असलेली दिसे; पण याचा परिणाम मात्र कांदह्दींसा उलट होई. एखादी वस्तु जितकी दुष्ाप्य तितका त्या वस्तूचा हव्यास मलुप्यमात्राला जास्त, ही जगाची रीत असल्यानें त्या दोन मुलींना एकत्र पदह्ातांच डुसऱ्या उत्सुक मुलीकडे पहाण्यापेक्षां पहिल्या अनुत्सुक मुलीकडे पहाण्यालाच जो तो उत्सुकलेला असे.
आजदेखील त्या दोन मुली देवालयाच्या आवारांत प्रविष्ट होतांच तसेच झालें. आतां देवाल्यासमोरचा एकंदर देखावा भयाण व भविष्यकाळाविषयाीं अनर्थसूचक असा असल्यानें इतर चित्तवेधक गोष्टींकडे चित्त वेधलें जाण्याइतकी तेथल्या जनसमाजाची चिततवृ्ति प्रसन्न नव्ह्ती हृ खर, तरी पण त्या अधिकाऱ्या- नची दृष्टि त्याच एका मुलीकडे प्रथम वळतांच सर्वांना कल्पना करतां आली कॉ, ही,त्या स्वारीची दृ्टि पापी आहे. त्या अधिकाऱ्याने समोर आलेल्या दोन मुलीं" पैकीं जिच्याकडे पाहिलें, तिने त्याच्याकडे मुळींच पाहिलें नाहीं; पण जिच्याकडे त्यानें पाहिलें नाहीं, ती मात्र लुब्रेपणानें त्याच्याकडे पद्यात होती.
तो अधिकारी पाळखी पह्ातांच त्या पहिल्या मुलीकडे नेत्रकटाक्ष फॅकीत
फादर पोर्टोच्या न्यायासनासमोर ७७
पालखीकडे गेला. तोंच पालखीचा पडदा अंमळ बाजूला सरकला जाऊन त्यांतून एक गोंडस गोरापान हात अर्धवट बाहेर आला. त्या अधिकाऱ्याने अधीरपणें पुढे जाऊन तो हात आपल्या हाती धरून त्याचे चुंबन घेण्याकरितां तो आपल्या ओंठापाशीं नेतां नेतां हांक मारली, “ सोफियाबाई !
त्या अधिकाऱ्यानें चुंबन घेण्यापूर्वीच तो हात एकदम एका नाजुकशा हिसड्यासरसा आंत ओढला गेला. तो सोफियाचाच हात होता. सोफियानें दोन्ही हातांनी पालखीचे पडदे बाजूला सारून बाहेर डोकावून पाहेळे, तों त्या अधिक्राऱ्याची चर्या ओशाळलेली तिला दिसून आली.
सोफियाने प्रथम भोयांना पालखी खालीं उतरण्याला सांगितठें. पालखी खाली उतरलेली पह्ातांच पहिल्याप्रथम पुढें आलेल्या त्या दोन मुलो पालखीपाशीं धांवत गेल्या व त्यांनीं सोफियाला आधार देऊन पालखींतून उतरवून घेतले. त्या दोघींच्या मानेभोवती एकेक हात ठेवून पालखीबाहेर पदार्पण करतां करतां सोफिया अधिक्राऱ्याकडे आपले विषारी नेत्रकटाक्ष फेकीत स्मित हास्यपूर्वक उद्ठारली, “ कोण ! अँन्टोनेओ ! तुम्ही का ते ! मला वाटलें हा कोणी तरो भलताच चहाटळ काळा अदमी आहे !”
“ एकूण तुझी अशी फसवणूक झाली म्हणावयाची तर ! ” असें म्हणून त्या अधिकाऱ्यानें-सोफियाच्या तोंडून आपणांला माहीत झालेल्या अँटोनिओनें-पुन्हा एकवार सोफियाचा हात आपल्या हातीं. घेऊन त्याचें चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वेळीं सोफियाने नजरचुकीने आपणांला न ओळखल्यामुळे हात मार्गे घेतला, तसे आतां तरी ती खास करणार नाही. अशी अंटोनिओला आशा होती.
पण याद्दी वेळीं त्याची ती आशा नि्फळ झाली. सोफियाने पुन्हा किचित हंसून हळकेच आपला हात आंखडता घेऊन म्हटलें, “ छे, छे ! अँटोनिओ ! हे काय!”
“ काँ! काय झालें ! ” अंटोनिओनें विषण्ण चित्ताने विचारलें.
“ काय झालें म्हृणून काय विचारतां ! हे इथें इतके लोक जमले आहेत; इतक्यांच्या देखत तुमच्यासारख्या नेटिव्हयाला मीं माझ्याशी इतकी सलगी कळू दिली तर हे लोक मला काय म्हणतील ! ”
सोफियाने 'नेटिव्ह' ह्या शब्द 'काळा हिंदी माणूस' ह्या अर्थानें तुच्छतापूर्वक
७८ पेशवाईतील धर्मसंप्राम
उच्चारला ह्वोता. तो अर्थ अँन्टोनिओच्या तेव्हांच ध्यानीं आला. तो तेव्हां सोफियाविषयीं 'काय ही गोरी भिकारीण माजोरी आहे ! एवढा मोठा मान्यतेचा सरदार व लष्करांतील एक बडा अधिकारी मी आहें दहे हिला माहीत असूनही ही मला नेटिव्ह म्हणून माझा उपमर्द करते' असें मनांत म्हणाला. पण तें मनांत म्हणाला, जनांत उघडपणे तसें बोलण्याची त्याची छाती झाली नाहीं. उलट त्यानें तो प्रश्नच अजिबात सोडून देऊन तिला विचारलें, “ आज तुम्हीं आमच्या- कडेच पाहुणचार ध्यावा.”
“ वाः ! अँटोनिओ ! तुम्ही बडे माणूस माझ्यासारख्या भिक्षेकरिणीला तुम्ही शब्दाने एवढा भान दिला हाच पुष्कळ झाला. पण मी आज इथें पाहुणचार घेण्यासाठीं आलेली नाहीं; भिक्षा म्हणा-देणगी म्हणा-खंडणी म्हणा-जे काय म्हणाल तें गोळा करण्यासाठी आलें आहें, क्ला गांवांत मी आज पहिल्याने'च आले आईई व तीही केवळ तुमचे थोर नांव ऐकून. तुमच्यासारखा कोणी एखादा माहितीचा व मान्यतेच[ सज्जन माणूस ज्या गांवी नाहीं त्या गांवी मी कधींच जात नाही. द्दो! नेम काय ! हे काळे लोक म्हणजे अगदीं रानटी-निव्वळ पक्ष असतात. मदतीसाठी यांच्या दारीं येण्यांत मला कमीपणा वाटतो. तेव्हां मला तुम्ही तुमच्या गांवांतून घरटीप देणगी वसूल करून दिली पाहिजे,”
“ ठोक आहे. पण त्यासाठी तुम्हांला आज दोनम्रद्दरपर्येत तरी इथें रहावे छागेल, कारण सध्यां मी कांहीं गुन्हेगारांची चोकशी करण्यांत गुंतलेला आहें. आतां इतक्यांतच पोटोसाहेब येतील, ते गुन्हेगारांना शिक्षा ठोठावतील, त्या शिक्षेची अमलबजावणी एकवार माझ्या डोळ्यांदेखत झाली कीं माझें काम झालें. मग माझा मार्ग निष्कंटक झाला.” अन्टोनिओ म्हणाला.
“ एकूण आजचे आरोपी तुमच्या वाटेंतील कांटे आहेत म्हणायचे ! ” सोफिया म्हणाली.
*“ होय.” अन्टोनिओ उद्गारला, “ ते माझ्या मागोतील कां2े आहेत; इतकेच काय पण ते आपल्या पोतुगीज सत्तेचे जबरदस्त शत्र आहेत. ते मराठयांचे कडे पक्षपाती आहेत.”
“ काय ! ते आपले शत्र आहेत! ”
“ हेय."
“ आणि ते मराठ्यांना सामील आहेत ! ”
फादर पोर्टोच्या न्यायासनासमोर ७९
शट *-“५- १४१ १४.ई*/ .४४४५ ४४४५ 0४८ ५ १५” २७ ४.५४” ७...” ४” "९.९० /०१५,/००५ /””"
€ होय. १9 . “ तर मग त्यांना जरूर शासन झालें पाहिजे. चांगलें देहान्त शासन झालें
पाहिजे.”
“ त्यांना देहान्त शासन व्हावयाचें हें तर ठरलेलेच आहे.”
“ तो देखावा मला आतां पाह्लला मिळेल का! ”
“ अलबत ! ”
£ तुर मग मी थांबर्ते. मी आजवर आमचे धर्मशासनमंडळ अपराध्यांना कसे शासन करतें याविषयींच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत; पण प्रत्यक्ष शासन होतांना पाहेलेले नाह्दॉ. तो देखावा आज अनायासे पाहूला मिळणार म्हणायचा तर! ”
“ तर् मग चला ना ! ” थोडा वेळ तेथेंच बसा; म्हणजे तुमच्या डोळ्यांचे पारणें फिटेल,'
“ चला.
लगेच अन्टोनिओ पुढें चाळू लागला व त्याच्या मार्गामांग साफया आपल्या दोन दासांच्या आधाराने मंद मंद पावलें टाकीत चालूं लागली. तिला देवालया- समोर मांडलेल्या उच्चासनापर्यंत पोंचावयाला किती तरी वेळ लागला. तिच्या एकंदर डामडोळावरून तिला मिकारीण म्हणण्याचें घेये कोणालाही झालें नसते. तिचा वेष, तिचे अलंकार, तो पालखीचा थाट, असलें राजवंभवाशीं टकर देणारे वेभव जिच्या चरणीं लोटांगण घेत होते, तिळा भिकारीण कोण म्हणेल ! मात्र तिचा प्रत्येक अलंकार खोटा होता, फार काय, तिच्या हातांतील आंगठ्या- देखील खोठ्या खड्यांच्या होत्या, हे मार्मिक द््टीनें पदवाणाराळा तेव्हांच कळून आले असतें.
ही वेषभूषणांची गोष्ट झाली; पण स्वतः सोफिया तरी कुठें खरी होती ! मऊ मखमालीच्या भरगची म्यानाच्या पार्टी तिखट पात्याची तरवार असते, त्याप्रमाणें
तिच्या मऊ गोऱ्या कातंडोखालीं झांकलें गेलेले तिचें अंत:करण कठोर व काळें कृट्ट होते. ती मद्दाम अपराऱ्यांना देहान्त शासन कसें देतात ह पाहून आपल्या जिवाची करमणक करून घेण्यासाठी सभास्थानी आली व कोणते अपराधी लोक आतां धर्मशासनाच्या खेळखंडोबाला बळी पडावयाचे हें पाहून पोट धर
८० पेशवाईतील धमंसंग्राम
धरून हंसू लागलो, तेव्हां सर्व लोकांना वाटलें को, हवी माणूस आहे काँ राक्षसीण आहे ! ती एक मानवी राक्षसीण आहे, हें तेथल्या लोकांना काय माहीत !
धर्मशासन-मंडळाच्या न्यायदानाचे नाटक कसें असतें हें तेथें जमलेल्या लोकांना माहीत नव्हते असें नाहीं; पण तरीही न्यायकचेरी म्हटली की, अप- राध्याला आपला बचाव करण्याची संधो मिळेळ अशी भ्रामक आज्या तरी असते. कथीं ती आश्या फलद्रूप होते; कधा होत नाहो. निदान तेव्हांच्या धर्मशासन- मंडळाच्या न्यायदानांत अपरा"याला शीलभ्रष्रतेचा व धमंभ्रष्टतेचा डाग आपल्या चारित्र्याला लावून घेऊन जीव बचावण्याची तरी आश्या असे. पण अंन्टोनिओचे सोफेियाशी आतांच झालेलें संभाषण ऐकून तेथल्या सवे मंडळीला कळून चुकले कॉ, आजच्या धमेशासनांत चोकशीपू्वींच अपराध्याला प्राणदेडाची शिक्षा ठोठावण्यांत आली आहे!
सोफिया जी सनात्थानीं आलो, ती एकदम भन्टोनिओं शेजारच्या उच्चा- सनावर बसली. तें उच्चासन धमेगुरु फादर पोर्टो यांच्यासाठी मांडून ठेवण्यांत आले होतें व सोफियासाठी अन्टोनेओनें तेथे आणखी एक उच्चासन मांडविलें होतें; पण सोफिया त्या आसनावर बसावयाचे सोडून धमंगुरूच्या परमोच आसनावरच बसलेली पहातांच अन्टोनिओ' तिला म्हणाला, “ सोफियाबाई ! तें उच्चासन फादर पो्टोसाठीं मांडण्यांत आलें आहे.”
सोफिया बेफिकीरपणें म्हणाली, ': मग त्यांत काय झालें ! फाद्र पोर्टो आले तर त्या आसनावर वसतील, त्यांना कांद्रीं यांत अपमान वाटायचा नाहो. फादर पोर्टोच तुमचे धर्मगुरु आहेत का!”
“ होय.”
“ तुर मग त्यांना 'फाद्र' मींच केलें आहे. त्यांचा अधिकार व मान मोठा तुम्दां का>या लोकांत; माझ्याशी ते नम्रतेनेंच वागतील, पाहिजे तर आतांच प्रत्यंतर पहा.” सोफिया समोरच्या चोघां बंदिवानांकडे पाहून बेफिकीरपणानें अन्टोनिओला म्हणाली. “ तें राहो; पण अन्टोनिओ, हेच तुमचे आरोपी काय! !
अन्टोनेओ उत्तरला, “ होय, हे मुख्य आरोपो.”
सोफिया त्या चार अभागी बोदिवानांपैकी त्या स्त्रीकडे पाहून लगेच अन्टो- निआकडे वळून म्हणाली, “ तर मग तुम्ही असें कां करीतनाद्दी! तोौस्त्री तुम्ही मला कां देऊन टाकीत नाह्दीं !
फादर पोर्टोच्या न्यायासनासमोर ८१
ककण कट ७७-७७” “१४५४४४५ -- 7८0४2० 2 --य्शीऱ २-५ ->५--५८८५८०--४८४०८५ 01-00: ४-४ 02 ४४५८५८ ८८४५४५४५८४ 0-४” ५ ०४००५०५०००
« तुम्हाला तिचा काय उपयोग आहे! ”
“ माझ्या व्यवसायांत तिचा मला चांगला उपयोग होईल; कारण ती सुंदर आहे, तरुणह्मी आहे. अशा दासी सहसा मिळत नाहींत. तुम्ही पाहिजे तर ती दासी मला विकत द्या. बोला, तिची काय किंमत! ”
“ तिची विक्री करण्याचा अधिक्रार मला नाहीं. फादर पोर्टो तिचा काय न्याय करतील तो खरा."
सोफिया हंसून म्हणाली, “ फादर पोंटोंच न्याय करणार ना! मग ते माझ्या शब्दाबाहेर कधींच जाय'्े नाहीत. बरे; पण केव्हांसे येणार आहेत ते! ”
इतक्यांत जॉन या नांवाचा एक शिपाई फादर पोर्टोच्या शोधार्थ गेला होता, तो फादर पोटोसहह माघारा आला. फादर पोर्टो. देवालयाच्या प्रवेशद्वारा- पाशी आलेला पाहून अँन्टोनिओ त्याला सामोरा गेला. इर लोक तेथें. बसले होते, त्यांना तेथल्या बंदोबस्ताच्या शिपायांनी लाथा मारून फादर पोर्टोच्या सन्मानार्थ उभं रह्वावयाला लावलें. सोफिया मात्र आपल्या आसनावरून मुळींच उठली नाहीं व शिपायांनींद्दी तिला उठविले नाही. नाद्दीं म्हणावयाला एका शिपायानें तिच्या उच्चासनापा्शीं जाऊन 'मेमसाहेब ! फादर पोर्टोसाहेब आले', असे सूचक शब्द उ'च्चारले; पण लोफियानें 'मला माद्दीत आहे', असें उडवा- उडर्वाचे उत्तर देऊन त्याची बोळवण केली.
फादर पोटो ह्या ऐन तिशीच्या उमरीचा तरणाबांड उमदा पोर्तुगीज गडी होता. दोन वषषांपूर्वी तो गोव्याहून लष्करांत भरती होऊन वतईकडे आला तेव्हां एक अगदीं सामान्य शिपाईंगडी होता. तेव्हां अंन्टोनिओच्या हुकमतीत. कांदरीं दिवस त्यानें सैनिकाचे काम केलें होतें. त्यानंतर तो मान्यतेला चढतां चढतां अवघ्या दोन वर्षोत श्लिस्त्यांचा एक धनंगुदद व मंडपेश्वरच्या धमेशासन-मंडळाचा एक सदस्य झाला होता आगि त्याच्या अधिकाराशीं तुलना करतां अन्टोनेओचा अधिकार आतां दुय्यम प्रतीचा ठलू्न अन्टोनेओ त्याच्या- पुढें आज्ञाधारक सेवकाप्रमाणें नमून वाण लागला होता. इतक्या जलदीने पोटोंचे भाग्य उद्याला कसे आलें हे पुढे कळेलच.
कां नकळे; पण आज फादर पोटोंची चर्या पिसाळडेल्या हिंल पशूसारखी कुद्ध दिसत होती. त्याला इतकें पिसाळण्याला काय कारण झालें असावे याविषयीचे वहत अँन्टोनिओच्या डोक्यांत धिंगाणा घालीत अहित तोंच तो भेन्टो-
»..द
(२ पेशबाहवतीळ धर्मसंप्राम
ल. -:-५--८-_ 7८/५०४-000 770 70“ ८
निओच्या अंगावर वसकन् ओरडून म्हणाला, “ अँन्टोनिओ ! तुम्ही दगलबाज आहद्वां असें माझ्य़ा प्रत्ययाला आले आहे. कां कॉ, तुम्ही माझ्या आज्ञिप्रमाणे रात्री एथल्या बेंडखोरांचा बंदोबस्त नीट केला नाहीं. त्यावरून तुम्हीद्दी बंड- वाल्यांना सामील आहां असें माझें मत झालें आहे. मीं धर्मशासन-मंडळासमोर तुमची चोकशी कां करूं नये! ”
“ साहेब ! मीं बंदोबस्त नीट केला होता.”
“ तर मग कळीचा कांटा दुलभजी मोरे तुमच्या बंदोबस्तांतून कसा निसटला ! शभर सशस्त्र सेनिक उभी रात्र ह्या गांवकऱ्यांच्या छाताडांवर नाचत असतां तेवढा एक अस्सल बेरड कसा मोकळा सुटला! ”
जी शका थोड्या वेळापूर्वी अन्टोनिओला आली होती, तीच अखेर खरी झाली; नेमकी दुळभजी मोऱ्याविषयींची ओरडच त्याच्या कानीं आली. त्यानें जॉनकडे वळून दरडावून विचारलें, “ हरामखोरा ! हा तुझ्या हळगर्जीपणाचा परिणाम ! ” लगेच तो पोटोंकडे वळून म्हणाला, “ साहेब ! हा कामचुकारू शिपायी दुल्भजीच्या सुटकेबद्दहद जबाबदार आहे. हा रात्रभर त्या घरावर पह्ाऱ्यासाठी होता. हा पहारा करतां करतां झोंपळा असेल, म्हणून गुन्हेगार निसटला.”
जॉन दीनवाण्या मुद्रेने दोन्ही हात जोडून उद्गारला, “ नाहीं सरकार! मी झोपलो नव्हतो; मी जागाच होतो.”
“ तर मग ह्या पट्टीचा लुचा असला पाहिजे. त्याच्या जागेपणी ज्या अर्थी दुलभजी निसटला, त्या अर्थी क्षानें त्याच्यापासून लांच खाली असली पाहिजे. त्याला त्याच्या अपराधाबद्दल कडक शासन होणें अवशय आहे.”
फाद्र पोटो जॉनला म्हणाळा, “ ए बेवकूब ! चल नीघ, व दोन प्रहरच्या आंत त्या हरामखोराला पकडून माझ्यासमोर घेऊन ये. त्याला मां लोहृस्तंभाशी बांधून जिवंत जाळण्याची शिक्षा फर्माविली आदे. याद राख, दोनप्रह्रपर्यंत जर त्याला आणून माझ्यासमोर हजर केलें नाह्वींस, तर त्याच्याऐवजी तुला ती शिक्षा देण्यांत येईल. कां कॉ, तुझ्या हृळगजींपणामुळें तो सेतानाचा पोर मोकळा सुटला आहे. लगेच तो अंन्टोनिओकडे वळून म्हणाला, “ त्याप्रमाणेंच आतां भैरवेश्वरापा्शी त्या काफराच्या पुढारीपणाखालीं ज्या पांच माणसांनी माझ्यावर द्या करून तेथल्या प्रार्थनामंदिरांतील कूस उपटून बाद्देर फेंकून दिला, त्यांनाही
फादर पोर्टोच्या न्यायासनासमोर ८रे
"शाशी
ल वट क कच्हक कळे 2-८ “५८४४-४४ ७७७०४४/क-कन्ह अश ४० “शक 0000४४४४०७ ००५९५ 2 "८४०८४४४
यकडून माझ्यासमोर आणण्यांत आलें पाहिजे. त्यांना मीं ह्या अमिकुंडांत जाळून ठार मारण्याची शिक्षा दिली आहे, त्या शिक्षेची अंमलबजावणी आतांच्या आतां , झाली पाहिजे.”
“ काय, साहेब ! आपणावर कोणा बदमाषांनीं हछा केला! ” अन्टोनिओरने विचारले.
“ होय.” फादर पोर्टो उत्तरला.
“ ते कोण होते! ते माझ्या माहितीचे नाह्दींत. पण ते दुद्भभजीचे साथीदार असावे.”
“ ते त्याचे साथीदार असतील; पण आतां त्यांना कसे ओळखावयाचे! ”
“ कसे ओळखावयाचे हं काय विचारतां! ते ढोक तेथेंच आजूबाजूला रद्दा- णारे असले पाहिजेत. तेथल्या सर्व लोकांना पकडून आणून चोकशी करा, ब त्यांनीं जर खऱ्या गुन्हेगारांची नांवे सांगितली नाहींत तर त्या सर्वांना अमिर कुंडांत लोटा. बस्स ! माझी अशी आज्ञा आहे कीं, ह्या गांवच्या सवे ढोकांना कठोर शासन करण्यांत येऊन त्यांच्या अंगचा सैतान गाडला पाहिजे. कां कौ, त्यांच्या अंतःकरणांत सैतानाने घर केलें आहे. त्यांच्या मनाचा ताबा सैतानाने घेतलेला आहे. आज इतकां वर्षे आमच्या प्रभचा पवित्र धर्म क्षा गांवीं प्रचलित असतां देखील हे लोक आमच्या धर्माज्ञा मोडून आमच्या शत्रंना-सैतानांच्या केवाऱ्यांना-मराग्यांना सामील आहेत, त्यांची गय करून उपयोगाची नाही.
“ पण साहेब! आपल्या हुकुमाची अमान्यता करून कारू गांवांत गुन्या उभारण्याचा अपराध ज्यांनीं ज्यांनीं केला, त्यांना सवांना आज येथें पकडून आणण्यांत आलें आहेच; व ज्यांच्या आगलाव्या उपदेशासुळे एवढी बजबजपुश गांवांत गेळे तीन-चार दिवस माजली आहे, त्या दोघांना त्याच्या परिवारासह सांखळदंडांनीं बांधुन येथें आणण्यांत आलें आहे. त्यांना आपण कठोर शासन
केल्याने आपला कार्यभाग होईल अर्से मला वाटते. त्यासाठी इतर निरपराधी लोकांना छळण्यांत काय अर्थ 1 ” अन्टोनिओनं विचारले.
“ निरपराधी व अपराधी ! अंन्टोनिओ, इतर लोक निरपराध, आहेत असें तरी तुम्ही कशावरून म्हणतां! चार-दोन गुंडानी आता दिवसांढवळया माझ्यावर हृळ्धा केला तेव्हां कोणीच लोक माझ्या साह्यासाठीं धांवून आले नाद्दीत,
८४ पेशवाईतील धर्मसंप्राम
र्टील प पटफ्धटटी “४८% ४८५८८५४५१४ 2१ -:९५- :-गप- "४९टशिशशटशश “ १५४४१ प शाशप्ट पटा लाट “2५-५५ ४७०७.
बन
हा काय त्यांचा लहानसान अपराध झाला ! तें कांहीं नाहीं. तुम्हीं माझ्या थर्मशासनाची अंमलबजावणी केलीच पाहिजे, नाहींपेक्षां तुम्ही देखील शत्रूला फितूर आहां असें समजून तुमच्याविरुद्ध कडक उपाययोजना करण्यासाठीं मला सेनापतीला सांगावें लागेल.” अशी निर्वाणीची आज्ञा करून फादर पोर्टो आपल्या बैठकीच्या जागेकडे वळतो, तोंच सोफियाला त्यानें पाहिले, व सोफियानें त्याला पाहिले. त्याबरोबर दोघेंही मनापासून हसली.
फादर पोर्टोनें सोफियाच्या उच्चासनापा्शीं जाऊन तिचा हात आपल्या हातीं घेऊन त्याचे चुंबन घेतां घेतां विचारळे, “ ओहो ! सोफिया ! तूं इकडे कुठें? ”
सोफिया फादर पाटोला संताषाने आपल्या हाताचे चुंबन घेऊं देतां देतां उद्गारली, “ माझें काय ! 'जिकडे पुढा तिकडे मुलूख थोडा. आज तुमचें चास्तठ्य ह्या गांवी आहे असें मला कळलें म्हणून इकडे आले. आपल्याच जातीचा पाठीराखा कोणी जवळ असल्याशिवाय मी अश्या खेडेगांवी कधीही येत नाही.”
“ तें बरोबर ! आपल्या लोकांनीं इतकी सावधगिरी बाळगलीच पाहिजे. कारण हे काळे लोक मोठे विश्वासघातकी असतात. हेंच पहाना, मी येवढा मोठ! धर्माधिकारी, एवढी सत्ता मार्झी पाठीराखी, तरी त्या एका बंडखोर हराम: खोरानें माझा ज॑ व घेण्याचा प्रयत्न करण्याला कमी केलें नाही.” फादर पोर्टो सोफियाजवळच्या दुसऱ्या उच्चासनावर अधिष्टित होऊन म्हणाला.
“ ते सारे मी आतां. ऐकत ह्वोतेंच. अशा लोकांना तुम्ही देऊं केळे आहे तेंच शासन योग्य आहे. एरव्ही हे लोक वठणीला यायचे नाहींत. बर॑;--” असें म्हणन सोफियाने आपल्या बरोबरच्या त्या अत्यंत सुंदर मुलींकडे एरूवार नजर फेकून जीभ चावलो व ती क्षणभर थांडून पुन्ह्या म्हणाली, “ पण इतक्यांत नको.”
फादर पोरटोचेंहो त्या सुंदर मुलीकडे लक्ष्य गेले व त्यानें सोफियाला विचारले, “ ओहो! सोफिया! ह्यो परी तूं कुठें पेदा केलोस! ”
सोफिया म्हणाली, “ तिच्याविषयींच मी बोलणार होते. तुमचें व माझें एका बाबतींत आठ दिवसांपूर्वी मंडपेखरीं मेरी नांवाच्या एका मुलींविषयी बोलणें झाले होते; आठवतें का तुम्हांला? ”
* होय, आठवते. तीच का ही मुलगी! ”
फादर पोटोच्या न्यायासनासमोर <%
« होय, पण प्रथम तुमचे धर्मशासनर्॑ः आटोपू दे, मग आपण त्या बाबतींत बोळूं. एक गोष्ट मात्र मी तुम्हांला प्रथमच सुचविणार आहे.” सोफिया आपणो- * ग ख्रिस्ती धमांत रोमन कॅथालिक्र व प्रॉटेस्टंट हे दोन पंथ सध्यां आहेत. रोमन कॅथोलिक पंथ हा जुना व प्रॉटेस्टंट ह्या नवा पंथ होय. इ० सनाच्या साळा- व्या शतकांत युरोपांत धर्मसुधारणेची प्रचंड लाट उसळून रोमन कॅथोलिक पंथ मागें पट्टू लागला; तेव्हां तिकडीऊ राजेव धर्माधिकारी हे जुन्या पंथाचे असल्या- नें त्यांनीं नवीन पंथाचा उच्छेद करण्यासाठीं ५1] तप1810101' या नांवाचें एक धर्मशासनमंडळ स्थापन केलें होतें. या संस्थेचा मूळ उद्देश विधर्मी लोकांना शासन करण्याचा होता; पण य॒रोपांत त्याचा प्रयोग भिन्नभिन्न पंथांच्या लोकांवर सरीस करण्यांत येत असे. होच धर्मशासनमंडळा'ची संस्था पोर्तुगीज लोकांनी हिंदुस्थानांतील आपल्या राज्यांत सुरू केल्यामुळें एथेंही अनंत घोर अनथं ओडवले, ह्या धर्मशासन-मंडळाचा कारभार जसा युरोपांत तसाच हिंःस्थानांतही सुरू होता व दोन्ही ठिकाणची शासनप्रणालिही एकच ह्वोती. यास्तव युरोपांत ह्या मंडळाचा कारभार कसा असे हे. थोडक्यांत सांगितल्याने युरोपाहून अगदीं परक्या अशा हिंइस्थानांत त्या कारभाराची काय अवस्था होती हे आपोआप कळण्याजोगें आहे. ह्या अपूर्व न्यायपीठावर कोणाचेही अपील चाळत नसे, त्यांचे हेर प्रत्येक कुटुंबांत राहून कोणाची काय मतें आहेत याची बातमी काढून शासन- मंडळाला कळवीत य मग न्यायार्धाश मेडळी लोकांना त्यांच्या मतांबद्दल शासन करी. प्रथक्ष कृत्यांबद्दल शासन करावयारचें,मतांबद्दह शासन करावयाचें नाही,हा कायदाचा मुख्य उद्देश मंडळानें प्रथमपासूनच गॅडाळून ठेविला होता. केवळ संशयावरून कोणालाह्दी पकडून तो आपला धर्म स्वीकारण्याचें कयूल करीपावेतों ते त्याला नाना प्रकारच्या यातना करीत व केव्हां केव्हां जिवेतही जाळीत. यातना सोसल्यावर 'मतुष्य धर्मोतर करण्याला तयार झाला तर त्यांची मालमत्ता हिरावून घेऊन त्याच्या अंगांत कफनी चढवून बाटवून सोडून देत. अंधारकोठडी, उपासमार वगेरे यातनांनी आरोपी वठणीवर न आल्यास त्यांना मध्यरात्री अंधारकोठडींत कोंडून त्यांच्या पायांत खिळ्यांचे खोडे घालीत. आरोपीला वकील देत नतत, किंवा साक्षीदाराच्या साक्षी त्यांच्यासमक्ष घेत नसत. पुरुष असो, खत्री असो,
विधवा असो, कुमारिका असो, त्या आरोपीला नभ करून लांकडी माचेवर निजवून जीव न जाईल अशा बेताने शरीराला अमानुष यातना देणें असले
ट्ट पेशवाईतील धर्मसंप्राम
हुं बराल न कुची
समार उभ्या असलेल्या चोघां बंदीवान केद्यांपेकीं त्या तरुण छ्यीकडे बोट दाखवून म्हणाली, “ ती पोरगी जर तुम्ही मला फुकट किंवा विकत मिळवून दिली, तर मला तिव्वा फार उपयोग होईल.”
“ हो हो! जरूर ! त्यांत एवढें भोठें अवघड तें काय आहे! ” असे म्हणून फादर पोर्टोनें त्या चार बंदीवानांना आपणासमोर आणून उभें करण्याला अल्बुकर्कला फमाविले.
फाद्र पोर्टो व सोफिया यांचें हा वेळपर्यंतचें सारे संभाषण पोतुंगीज भाषेंत चालले असल्यानें तेथें जमलेल्या फारच थोड्या लोकांना तें कळलें. ते ज्यांना कळले नाहीं, त्यांतीलच एक ती संदर मुलगी होती. फादर पोर्टोनें दुळमजी मोऱ्याला प्राणदडाची शिक्षा ठोठावून त्याच्या शोधार्थ जॉनला पाठविलें, ते सारे संभाषण त्याने धेडगुजरी मराठीतून केल्यामुळें तें मात्र त्या सुंदर मुलीला कळलें होतें. तें संभाषण ऐकतांच तिच्या चर्येत एकदम फरक पडून तिचे डोळे पाण्यानें भरून आले होत. तिची सोबतीण अनी हिचें तिच्याकडे लक्ष्य होतें. तिनें तिला ताबड. तोब विचारले, “ मेरी ! त्या बेडखाराला पाद्रीसाहेबांनीं शिक्षा ठोठावली, त्या- बद्दल तला वाइट वाटण्याचे काय कारण! ” यावर ती संदर मुलगी-मेंरी “मला वाईट वाटलें असें नाहीं कांही असें टाळाटाळीचें गुळमुळीत उत्तर देऊन स्वस्थ राहिली होती. अमळशाने फादर पोर्टोनें सोफियापा्शी मेरीविषयीं चवौकशो केली. तेव्हां पुन्हा अंनोने मेरीच्या कानाशीं लागून 'तुझी पाद्रीसाहेब सोफियाबाईशीां वाकशी करीत आहेत. तू मोठी नशीबवान आहेस' असे उद्गार
काढले. तेव्हां मेरीने 'ते चीकक्णी करूंदेत; तुला त्याच्याशीं काय करावयाचें आहे' असे तसडेपणाचे उत्तर देऊन अनोला खजील केलें होतें
क टन्णापा न्न्ट्ट बा
प्रकार हरह्दमेष चालत. सतत पंधरा वर्षे अश्या यमयातना सोसावयाला लावून शेवटां त्या जीवाला अभमिकुंडांत लोटल्याचीं उदाहरणेंद्दी धमशासनमंडळाच्या इतिहासांत नमूद आहेत. कित्येक प्रसंगीं शिक्षा झालेल्या अनेक केद्यांना पुष्कळ दिवस खितपत ठेवून मग एकदम त्यांची धिंड काढून त्यांना अमिकुंडांत लोटीत. अशा प्रसंगीं राजा, सरदार व धर्माधिकारी हया देखावा पाहून करमणूक करून घेण्यासाठीं मुद्दाम तेथें हजर असत. कित्येक बेळां भारोपीची जीभ तोंड उघडता य्रिटतां येऊं नये अशा बेतानें बांधून त्याच्यापुढे उत्तम पक्का्ञांचें ताट वाढून आणून ठेवीत व त्याचे हाळ पाहून तेथें जमलेले लोक आनेद मानीत!
फादर पोर्टोच्या न्यायासनासमोर ८७
>> *तट>०>५-५--४५०५५८॥५८ ४८४०००-/५९५--*-५८-/५/-५ ८ ८२ 0४९५-0५-००. “> ८: ४५५० 7 “५८-7५. “८ -. २-८ “%- प्न. ८८-८१ > ८ शा लाट 22-०2“
त्या बैदीवानांना प्राणदंडाची शिक्षा देण्याचा आपला विवार अंन्टोनिओने चौकशीपूर्वीच बोलून दाखविला होता. अथात आतां 'वौकशीचें नुसतें नाटक वहावयाचचें होते. फादर पोर्टोने त्या बंदीवानांना आपणासमोर बोलावतांच सोफियानें त्याला विचारलें, “ कणाला उगाच चांकशी करण्यांत वेळ दवडतां ! ते गुन्हेगार आहेत हें तुम्हांला माद्दीत आहे व त्या गुन्ह्याला काय शिक्षा द्यायची हेंही ठरल्यासारखे आहे, मग व्हाना एकदांचे शिक्षा देऊन मोकळे ! ”
फादर पोर्टो स्मितहास्यपूर्वक म्हणाला, “ तें खरें, पण सोफिया ! हें चोकशीचें नाटक आम्ही केलें नाही, तर मी धर्मशासन-मंडळांचा न्यायाधीश न ठरतां सामान्य खुनी ठरेन; तसें उपयोगाचे नाहीं. मरणाला मृत्यु हें कारण खरें; पण मृत्युदेखील ती जबाबदारी आपणावर पडूं नये म्हणून एखादा अपघात, एखादा आजार किंवा अश्याच आणखी एखाद्या निमित्ताचा बुरखा घेऊन जिवाच्या जीवितावर झडप घालतो. केलेलें कृत्य कितीही अनन्वित असलें तरी तें न्यायाच्या आवरणाखाली आपोआप सोज्वळ ठरतें. खरोखर, धर्मेशयासन मंडळ ही अमोघ शक्ति पोपमहाराजांनीं निर्माण करून आमच्या हाती दिली आहे, त्यामुळे आमची इतकी सोय झालेली आहे कीं, सांगण्याची सोय नाहीं. हेंच पद्ा, काल आम्हांला धर्मांच्या नांवावर 'कोणींही गुव्या उभाहं नये' अशी आज्ञा जाहीर करतां आली व त्या आज्ञेच्या जोरावर धर्मशासनाचें अवडंबर माजवून आम्हांला आमच्या मा्गीतील कांटे ठेचून टाकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.”
एवढें त्या दोघांचे संभाषण होत आहे तोंच अन्टोनिओ, दुळूभजी व त्याचे साथीदार कोणी असतील ते, व ते न सांपडल्यास फादर पोटॉनें सांगितल्या- प्रमाणें भैरवनाथाच्या आसपासचे लोक यांना केद॒ करून आणण्यासाठी शिपायांना रवाना करून तेथें आला. फादर पोटो आतां न्यायदानाला सुरुवात करणार असे पाहून अन्टोनिओनें आपल्या शिपायांना तेथें जमलेल्या सर्व संडळीसभोंवार दक्षतेने पहारा करण्याला सांधून त्यांतन्याच दोन शिपायांना अभिकुंडांत लांकडें लोटून तें प्र्वलित करण्याला सांगितलें.
“ सरदारसाहेब ! क्ला बंदीवानांना मोकळें करून पुढें आणावयाचे का! ” अल्बुककने विचारलें. त्याला हा प्रश्न पडण्याचे कारण असें कीं, त्या चारी बैदीवानांच्या हीखलाबद्ध पायांमधून लोखंडी सांखळी ओंवून घेऊन तिचीं दोन टॉक दोन बाजूंच्या भरभक्कम दगडाला बांधून टाकण्यांत आलीं शेती. ती
-६-- टाल “८. 0.९0 7२
८८ पेशवाईतीळ धर्मसंप्राम
ब. ०-५८-५८>-८८८८/५४४क्टश”0०७४०/०४४शटश४शीशरे शि शशश ४0 णी २)एकशीशीशशीॉह ह शो शीण एटीरशशशीश शशी शशी ४४४ शोण पणी शी 0शटशशी .--/८-८-८/८-०-५८/०/८/-/०/५-५/--८-८/-
सांखळी हातीं धरून त्यांना पुढे चाळवीत आणणें बरेंच जिकिरीचे काम होते. बरें; सांखळी सोडली व त्यांतला एखादा बंदीवान पळाला तर निष्कारण आपणांवर तोहमत यावयाची हें भय त्याला होतें.
अन्टोनिओनें ती अडचण ओळखून आज्ञा केली, “ त्यांची पायांतील दावण सोडून त्यांना पुढें घेऊन ये.”
अल्बुककंने हुकुमाप्रमाणे त्या बंदीवानांच्या पायांतील लोखंडी दावण सोडून त्यांना हुकूम केला, “ चला.”
“ कुठें 'वला ! ” तरुण बँंदीवानानें विचारलें,
“ न्यायासनासमोर,” अल्बुकक उत्तरला.
“ न्यायासन ! कोणतें न्यायासन ! ” म्हाताऱ्या बेदीवानानें एकदम खवळून विचारलें.
अल्बुक्क॑ म्हणाला, “ असें.पह्ा भगवानजी ! हुकूम म्हणजे हुकूम. हुकुमाची अभान्यता करणें ह्या गुन्हा आहे. माझें तुम्ही सारींजणें ऐका, मुकाटपणे न्यायासनासमोर चला. पाद्रीसाहब फार कनवाळू आहेत; त्यांना तुमची दया येऊन तुम्हांला तुमच्या गुन्य्याची माफी मिळण्याचाही संभव आहे.”
फादर पोर्टो व सोफिया पोतुगीज भाषेत कांद्दी गुजगोष्टी बोलण्यांत दंग होऊन गेल्यामुळे त्यांना अल्खुकर्क व तो म्हातारा बंदीवान यांच्यांतील संभाषण ऐकूं गेलें नाही; पण अन्टोनिओ तें संभाषण दुरून लक्ष्यपूवेक ऐकत होता. त्यानें आपल्या मागच्या आणखी दोघां शिपायांना आज्ञा केली, “जा. त्या बेमु्वतखोर हरामखोरांना लाथाबुक्क्यांनी तुडवीत इकडे घेऊन या.”
प्रकरण सहावे
चुळणें गांवाची कहाणी
ळणें% ग्रांव हा एका काळीं बराच वेभवसंपत्न होता. तेथील दरोबस्त वस्ती २5 हिंदूंची होती; पण आजला तो गांव दरोबस्त खिस्ती लोकांचा आहे. तो गांव बाटला केव्हां व कसा हॅ पहाण्यासाठी आपणांला कथानकाच्या मागें नऊ वर्षे काळाच्या उद्रांत डोकावून पहाणे अवश्य आहे. तेव्हां एके दिवशी एका ख्रिस्ती मिशनऱ्यानें त्या गांवीं येऊन 'कुऱह्ाडीचा गोताला दांडा काळ' शोभणाऱ्या एका बाटग्या गांवकऱ्याच्या साह्याने भाकरीचे तुकडे, गाईंचें मांस वगेरे रात्री सर्व गांवकरी झोंपीं गेळे आहेत अशा वेळीं गांवांतील दरोबस्त विहिरीतून फेकले. देवीच्या देवालयाजवळील तळ्यांतही थोडेसे रक्त शिंपडून तें भ्र केलें ब सकाळींच गांवकऱ्यांनीं उठून तें पाणी प्राशन करतांच 'गांवचे सर्वे लोक गोमांस १ ल्लिस्ती लोकांच्या हातचे भाकरीचे तुकडे टाकलेल्या विहिरांतील पाणी प्याले, त्या अर्थी ते सारे लोक बाटून आजपासून खिस्ती झाले' अशी उभ्या गांवांत दवंडी पिटण्यांत आली. लोकांनीं आपापल्या विहिरी शोधून पाहिल्या, तों आंत खरोखरीच भाकरीचे व मांसाचे तुकडे आढळून आले ! त्याबरोबर त्या दरोबस्त लोकांना वाटलें की, आपण बाटलों, ख्रिस्ती झालो. लगेच त्याच दिवशीं त्या गांवांतील देवीच्या देवाळयाचॅच खिस्ती प्रार्थनामंदिर बनविल्याचें दवंडी पिटवून जाहीर करण्यांत आलें, व त्या दिवशीं रविवार
-“----“- > -_पन-> "न
% चुळणें ह्या गांव वसईरोड रेल्वेस्टेशनाशेजारीं, वसई गांवापासून सुमारे पाच-सात मेलांच्या अंतरावर आहे. एर्थे सर्व वस्ती खिस्ती लोकांची आहे. खिस्त्यांशिवाय इतर धर्मांचे लोक आतां त्या गांवांत मुळींच नाहॉंत. एथले खिस्ती लोक इमारती लांकडाचा व्यापार करितात. एथे गांवांत एक तळें असून त्या तळ्याजवळ हिंदूंच्या देवीचे स्थान आहे. तें देवस्थान जागत आहे. गांवांत कोणीं डुकरे बाळगिल्यास देवी बाधते असा तेथील रहिवाशांचा फार दिवर्सा- पासूनचा अनुभव असल्यानें येथील लोक डुकरें पाळणें ह्या सर्व खिस्ती लोकांचा रूढिधर्म असूनह्दी गांवांत डुकरें पाळीत नाहींत. ज्यांना डुकरे पाळावयाची असतील ते शेजारच्या इतर गांवीं नेऊन पाळतात.
२० वेशवाइतीळ धमसंप्राम
००००००००००. ०५४८-८०-५९. हट “५ र क्ट “नट ९.०”. - >
सल्यानें सवे गांवकऱ्यांना त्या देवालयांत सक्तीने बोलावन आणन ख्रिस्ती धर्मानुसार त्या प्रार्थनामंदिरांत प्रार्थना करण्यांत आली. झाले, तेव्हांपासून त्या गांवीं दर रविवारी सक्तीनें सर्व लोकांना त्या देवालयांत ओढून आणावयाचे व प्राथना करावयाची असा क्रम सर्रास सुरू झाडा. ह्या ख्रिस्तीकरणाला प्रथम प्रथम कांहीं लोकांनीं विरोध केला; पण त्यांचा ख्रिस्ती धर्ममंडळाच्या आज्ञिनुसार अमानुष छळ करून त्यांचा नायनाट करण्यांत आला. पहिल्या पहिल्यानें सुमारें पांच पन्नास लोक असे विरोधक्र निपजले; पण त्या सर्वोना लोहस्तंभाशीं बांधून जिवंत जाळ, कोणाला-स्त्री किंवा पुरुष यांचा विचार न करितां नभ करून लांकडी माचेवर बांधून शरिरांत खिळे ठोकून, शरीराच्या नाजुक भागांना चाप लावून हाडे ठेचून हाळ हाल करून ठार कर, कणाला धडाडलेल्या अस्तिकुंडांत फेकून जाळत मार, अशा राक्षसी शिक्षा फर्मावण्यांत येऊन त्यांचा वेळींच समूळ उच्छेद करण्यांत आला. त्या छळांतून एक भवानजी नाईक व दुसरा त्याचा मुलगा भेरव असे दोन-फक्त दोनच जीव बचावले म्हणजे तरी काय, विहिरांतून गोमांस वगेरे टाकून त्या गांवाला बाटविल्याची दवंडी गांवांत पिटली गेली त्याबरोबर त्या दोघांनीं आपल्या घरादाराची व धनदोलतीची पर्वा न करतां त्या गांवांतून पाय काढला, म्हणून ते बचावले असें म्हणावयाचे. त्यांचा पुढें पुष्कळ शोध करण्यांत आला; पण तपास लागला नाहीं. तेव्हां त्यांच्या वाड्यांत ख्रिस्ती प्रार्थनामांदिर उनारून व त्यांची जिंदर्गा जस्त करूनच पोर्तुगीज अधिक्राऱ्यांना आपल्या मनाचा विरंगुळा कन ध्यावा लागला. ते दोघे जर त्यानंतर पोर्तुयीज अधिक्राऱ्यांच्या हाती लागले असते, तर त्यांनाही त्या देवालयासमोरील लोहस्तंभाळा बांधून अथवा त्या लोइस्तंभाजवळच आज धडाडत असलेल्या अस्तिक्रुंडांत लोटून जिवंत जाळण्यांत आळे असर्ते, किंवा अन्य अमानुष उपायांनी त्यांचा वध करण्यांत आला असता. आणखी एक गांवकरी मनुष्य त्या अरिष्टांतून बचावला होता, तो दुलूभजी मोरे होय. गांवावर दे अरिष्ट कोसळण्यापू्वीच तो पोरका झाल्यामुळें दूर गांवी मालाड येथें आपल्या धन्याच्या म्हणजे अंताजी रघुनाथ कावळे यांच्या आश्रयाला जाऊन राहिला होता. दुलूभजीचा बाप अंताजीपाशींच नोकर होता. तें स्मरून अंताजीनें दुळमजीला आश्रय दिला होता. तेव्हां दुळभजी सारा बारा वर्षांचा होता. भगवानजींचा तो शेजारी द्दोता.
चुळणें गांवची सारी हिंदू रयत अशी एकजात बाटून ख्रिस्ती झाल्याला आज
वुळर्णे गांवाची कहाणी ९१
कन ४४१ /णशी 7४ 0शा शो /*रोशा १ 7-7 ८४-५६ ५५४५-0५-५८ १८४४-५४" *-५ ४ “शा
समारे आठ नऊ वर्षे झाली होती. वसईचा किल्ला म्हणजे पोतुगीज लोकांचें त्या वसई साष्टी प्रांतांतील राजधानीवजा महत्त्वाचे ठिकाण होतें व चुळणें गाँव *बसईच्या अगदीं लगत म्हणजे सुमारे तीन चार कोसांच्या अंतरावर आह़े. असें असतां त्या प्रांती पोर्तुगीजांनी येशू ख्रिस्ताच्या नांवावर चालविलेल्या अमानष धार्मेक जुलुमाच्य़ा वणव्यांत तो गांव कसा सांपडला नाहीं यांचें कोणालाही आश्चर्य वाटणें साहजिक आहे. वसई प्रांतांत व खुद्द वसई गांवांतही हा ख्रिस्ती जुलुमाचा वणवा आपल्या कथानकाच्या दोन शतकें अगोदर पेटला होता; पण त्या वणव्यांत हें लहानसे चुळणें गांव शावूत राहहले, त्याचें एक कारण असें कीं, असलीं गांवेचीं गांवें बाटवून सोडणें तेव्हांच्या पोर्तुगीज अधि- काऱ्यांना व धर्मगरूंना तळहाताच्या मळाप्रमाणें वाटे व प्रथम तोच गांव बाट- विण्याची हरळ पाडण्याइतकी कोणतीच मोहकता त्या गांवांत नव्हती; उलट त्या गांवची देवी अत्यंत जाज्वल्य असून तो लोकांना धर्मातर करावयाला भाग पाडणारे लोक आणि धर्मांतराला बळी पडणारे लोक अशा उभयतांचाही समूळ उच्छेद करते, असा जनप्रवाद् रूढ होता. असा जनप्रवाद रूढ होण्याळा कारणेही घडली होतों. बऱ्याच वर्षांपूवी एका ख्रिस्ती धर्मगुरूनें त्या गांवच्या लोकांना बाटाविण्याच्या इराद्याने त्या गांवी येऊन तळ दिला व कांहीं लोकांना बाटविलें, तों हगेच दसऱ्या दिवशीं त्याला अकस्मात डुकरानें ठार मारले. आणखी कांहीं दिवसांनीं मरोळहून एक पाद्री त्या गांवीं येऊन लोकांना बाटविण्याचा कारभार करूं लागला. त्याचा गांवच्या लोकांनींच खन केला. हा प्रकार भगवानजीचा बाप भवानजी व त्याचाच दसरा एक दोस्त-गजाबा ह्या दोन मातबर व स्वाभि- मानी लोकांच्या मर्दुमकीमुळें झाला. भवानजी नाईक व गजाबा देशपांडे हे दोघेद्दी त्या गांवचे बुद्ठुक असामी होते. त्यांची जिंदगी मोठी, त्यांची दातत्वबुद्धि वाखाणण्यासारखी, त्यांचा दरारा विलक्षण व त्यांचा स्वाभिमान तर अनुपमेय ! वैभव, दानत, मर्दमकी व स्वाभिमान अशा गुणसमुचचयाच्या जोरावर दोघांनींद्दी सारा गांव आपलासा करून ठेविला होता व खुद्द त्या दोघांचा एकोपा. एकाला ठेच लागली तर दुसऱ्याला कळ झोबावी इतके ते दोघेही अभिन्न हृदयी होते. त्यामुळें ते दोघे गांवांत करतील ती पूबोदिशा होती. सर्व गांवकऱ्यांत त्यांनीं प्रशंसनीय एकोपा राखला होता. त्यामुळें एखाद्या परचक्रापासून त्या गांवाला तेव्हां आपलें रक्षण करतां येई, इतकेंच काय, पण झाजूबाजच्या गांवांना देखील
९२ पेशवाइईतीळ धमसंगप्राम
त्या गांवाचा मोठाच आधार होता. भवानजी किंवा,गजाबा यांच्या तोंडून शब्द् निघण्याचा अवकाश, कीं सारा गांव |शस्त्रास्त्रांनॉं सज होऊन धांवून यावयाचा. बरे, तेव्हां त्य; दोन पुण्य पुरुषांच्या पुण्याईने गांवांत धडधाकट व द्रदेही तरुणांचीह्दी वाण नव्हती. हांक मारतांच वीस ते तीस वर्षाच्या दरम्यानच्या पांचक्षे तरुणांची फोज खडी होई. त्यामुळें पोर्तुगीज अधिकाऱ्यांना त्या गांवाला बाटविण्याचा डाव मांडतांना बराच विचार पडे. ही चुळणें गांवची प्रशंसनीय एकी व भरभराट गजाबा व भवानजी यांच्या हयातीपर्यंतच खरी टिकली व त्या दोघांच्या पश्चात् त्या गांवाला उतरती कळा लागली. भवानजीच्या पश्चात् त्याचा मुलगा भगवानजी व गजाबाच्या पश्चात त्याचा मुलगा गुणाजी हेही आपल्या जन्मदात्यांभ्रमाणेच कर्ते पुरुष निपजले; पण दोघांचे कर्तेपण परस्परविरुद्ध दिशांना वाहूं लागलें. भवानजीच्या वंशावर पोतुगीजांचा पापी डोळा फार दिवसांपूर्वीपासून होता. याचें सुख्य कारण असं कौ, फार पूर्वीपासून विशाल वटवक्षाप्रमाण वसई-साष्टीप्रांती ठायींठायीं विखुरलेल्या प्रचंड नाईक वंशांतीलच भवानजीचा वंश ही एक प्रशाखा होती. वसईच्या पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी गजाबा व भवानजी यांच्या हयातीतच त्या दोघांत फूट पाडण्याचा प्रयत्न चालविला होता व तोच प्रयत्न त्यांच्या पश्चात् देखील सुरूच होता. पण त्या प्रयत्नांना गजाबा व भवानजी यांच्या हृयातींत जें यश लाभले नाही, तें त्यांच्या मुलांच्या हयातींत लाभले. गुणाजी हा हाडाचाच स्वार्थी व मत्सरी निपजला. त्यानें जिंदगीवरून भगवानजीशीं वेर मांडले. ही संधि साधून वसईच्या तेव्हांच्या पोर्तुगीज किल्लेदाराने गुणाजीला पाठीशी घालून तो वेराम़ि चेतबिला. त्यांत परिणामी दोघांचाही तोटा झाला व त्यांच्याबरोबरच गांवाचाही अपरिमित तोटा होऊन गांव रसातळाला जाऊं लागला. गांवांतील कांही लोक जसे गुणाजीला वश्य होते तसे कांहीं लोक भगवानजीला वश होते. ते दोन परस्परविरोधी गट बनून कोणाच पायपोस कोणाच्या पायांत नाहींसा झाला.
एवढथधावरच निभावले नाहीं. तेव्हांच्या वसईच्या किल्लेदाराने आपल्या धसे- गुरूंना 'चुळणें गांवांत धर्मप्रसार करण्यासाठीं पाठविले, तेव्हां गुणाजी व त्याच्या थाजूचे लोक यांनीं भगवानजीच्या पक्षाचा खास्ते छळ करण्याचें योजून ल्लिस्ती पाद्मांना भगवानजीच्या पक्षांतील वॅंचक लोकांचीं नांवे सांगून त्यांना बाटविण्याला प्रोत्साहन दिलें. पोलुंगीजांना तरी तेंच पाहिजे होतें व तेवढ्यासाठी च
चयुळर्णे गांवाची कहाणी ९३
०००५०५५०८८ डा की
तर त्यांनीं गुणाजीला पाठीशीं घातलें होतें. त्यांनी भगवानजीच्या पक्षांतील कांदा लोकांना मधून मधून बाटवावें, बाटविण्यासाठीं गांजावें, त्या वेळो भगवानजीनें .त्या धर्मळलाचा प्रतिकार करण्याला झटावे; पग गेणाजीच्या पक्षाचा त्या बाट- विणाऱ्या ख्रिस्ती लोकांना पाठिंबा मिळाल्यामुळे भगवानजीचा तेथें कांहीं इलाज चालूं नये, असा प्रकार वारंवार घडून येऊं लागला. गुणाजी व त्याच्या पक्षांतील लोक यांना वसईच्या पोर्तुगीज अधिक्राऱ्यांनीं आपल्या सेत्यांत मान्यतेला चढ: विळे. गुणाजीला तर त्या प्रांतांतील सरदार बनवून सोडलें; त्यामुळें चुळणें गांवांत पोतुगीज सत्तेचा पाय हळुहळू चांगलाच रुजू लागला. भगवानजीची बाजू दिवसेंदिवस लंगडी बनत चालली. त्याच्या पक्षांतील तेजस्वी लोक एकेक असे पोतुगीजांच्या अत्याचारांना बळी पडूं लागले. बाकीचे लोकही आपलें रक्षण करण्याचें त्राण भगवानजीच्या अंगीं उरलें नाहीं असं पाहून हळुहळू त्याचा पक्ष सोडून गुणार्जाच्या पक्षाला मिळु लागले व एका काळीं ज्या भगवानजीचा त्या गांवांत आणि गांवाच्या आसमंतांतील पंचक्रोशींत वाघासारखा दरारा होता, तो वाघ जणुं पिंजऱ्यांत कोंडला जाऊन अगदीं दीनवाणा बनला. आणखी थोड्या दिवसांनीं गुणाजी, गुणाजीचा दत्तकपुत्र अंताजी आणि भगवानजीचा मुलगा भैरव हे दोघे समवयस्क तरुण आपल्या आयुष्याच्या ऐन ज्वानींत येऊन कर्तेपणा गाजवू लागले. त्यांच्या कारकीदींत तर त्या दोन घराण्यांतील वेमनस्यानें आणखी पुढचा पल्ला गांठला. 'बापसे बेटा सवाई) या नात्यानें अंताजी पोर्तुगीजांना फितूर होऊन स्वदेशद्रोह, स्वजनद्रोह, स्वधर्मद्रोह ही पापत्रयी पुजण्याच्या कामी फार पुढे गेला. त्याच दरम्यान् म्हणजे अंताजी सुमारे वीस-एकवीस वर्षोच्या वयाचा असतांना गुणाजीचा अंत होऊन अंताजी त्याच्या सर्व दोलतीचा मालक झाला. अंताजी ह्वा स्वामिद्रोह्ी व देशद्रोही कायस्थाधम दादजीप्रभु देशपांडे याच्या वंशांतील होता. तो त्याच्या नातवंडांपेकों कोणी एक होता. अर्थात स्वाभिमानशून्यता, फितुरी वगैरे पाशवी दुर्गुण आनुबंशिकतेनेंच वसत होते. त्यांना आणखी जोड गुणाजीच्या दुर्गुणांची मिळाली, पोर्तुगीज सरकारनें गुणाजीची सरदारकी अंताजीला बहाल केली व त्याचा नादानपणा ध्यानी घेऊन आणखी एक मोहजाल त्याच्यावर फॅकलें. वसईच्या किल्ल्यावरील एका पोतुंगीज अधिकाऱ्याला हिंदु स्त्रीपासून झालेली जेन ह्या नांवाची पंधरा वर्षे वयाची सुंदर व चुणचुणीत कन्या होती. हा अधिकारी अंताजीला मेजवानीच्य!
२९४ पेशवाईतील धर्मसंप्राम
डड आग प वपयशशिशीशीीेशीओीओीयी रीओ
निमित्ताने वारंवार आपल्या वाब्यांत बोलावून नेई. तेथें जेनला मुद्दाम अंताजी- सभोवार मोहजाल पसरविण्यासाठी अंताजीच्या तैनातीला ठेवण्यांत येत असे. कांहीं दिवस असा कार्यक्रम वाळू होता व त्याचा व्हावयाचा तोच परिणाम झाला, अंताजी पूर्णपणें जेनच्या प्रेमपाशांत अडकला गेला व अखेर तिच्या प्राप्तीसाठी एके दिवशीं तो बाटून खिस्ती झाला !
झालें. त्या दिवसापासून चुळणें गांवांतील लोकांना बाटवून खिस्ती करण्याचा राजमार्ग मोकळा झाला. अंताजीचा अँटोनी झाला व त्याचें जेनशीं मोठय़ा थाटाने लग्न झालें. त्या वधूवरांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यांत आली व तीही भगवानजी आणि भैरव ह्या प्रतिस्पर्धी पितापुत्रांच्या नाकावर टिचवून ! त्या दोघांनी प्रथमच अंताजीळा बाटूं न देण्याचा शिकस्तीचा प्रयत्न केला; पण त्याचा कांद्री उपयोग झाला नादीं. नंतर त्यांनीं गांवांत अंताजीवर बद्विष्कार पुकारला; पण तो मानण्याल[ गांवकरी धजावेनात ! याच्या उलट अंताजीनें नव्हे,-अंन्टोनिओनें आपणाप्रमार्णेच गांवांतील सर्व लोकांना बाटवून आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा विडा उचलला, त्यानें गांवांतील भेरवनाथाचे देवालय भ्रष्ट करून त्याचें ख्रिस्ती प्रार्थनामंदिर बनविले व एका पाद्याच्या साक्षानें तेथें ल्रिस्ती धमालुसार प्राथना करण्याला सुरुवात केळी. त्याप्रमाणेच त्यानें आपल्या घरीं कोणत्याना कोणत्या निमित्ताने मेजवानीचा बेत करून गांवांतील शिष्टांना मेज- बानीला बोलावण्याचा कम ठेवला. बाटल्यानें नशीब कसे उद्याला येते, या- विषयीं अंटोनिआंचें मूर्तिमंत उदाहरण गांवकऱ्यांच्या डोळ्यांसमोर होतेच; ते पाहून कांहीं गांवकरी आपलेही नशीब असेंच उदयाला येईल ह्या आशेनें मेज- वानीला व प्रार्थनेला जाऊं लागले. कांद्दी लोक आपणांवर अटोनिओचा आणि त्याला साह्य करणाऱ्या जुलमी पोतुगीज सत्ताधाऱ्यांचा रोष होऊं नये म्हणून त्या प्रार्थनेत व मेजवानींत मिसळ लागले आणि जे क्षा गोष्टींना विरोध करण्याइतके धीट आणि स्वाभिमानी होते, त्यांचा अन्टोनिओच्या खास देखरेखीखाली अमानुष- पर्णें छळ होऊं लागला. भगवानजी व भेरव यांना जरी गांवावरील ही सार्वत्रिक आपत्ति ठाळतां आली नाही, तरी त्यांच्यावर मात्र ह्या छळाचा प्रसंग बरेच दिवसपर्यंत प्रत्यक्षपणे ओढवला नाहीं.
पण तो प्रसंग पुढें ओढवण्यालाही एक कारण घडून आलें. भगवानजीनें भरवासाठीं अर्नाळ्याच्या तानाजी पाटलाच्या गजरा नांवाच्या नातीशीं सोयरीक
४५४ ४९४०५१४ -२/४/०४ “/७७४११७५४५-/४०/ ४-/०-०१७४५७४0७४ ७४ 00४0 6७00५” ७७०१५७४०५/१७ 0७७९७0 “९-० क.”
ऱचुळणें गांवाची कहाणी ९५५
कश 7४ 0. होश तटी 9 > -८९- - हपशला अभ कटकटी १४० 0. हीक्हा्टीशीधेट क की शशश 0७४७७० र आ". 9 २४४0
ठरविली होती. गजरा तेव्हां वयाने चौदा वर्षांची होती; ती गुणी व रूपाने सुदर, एखाद्या पापी माणसाच्या विषारी दृष्टींत सढण्याइतकी सुंदर होती; म्हणूनच तानाजीची घरची गारेबी असतां व शिवाय तानाजी एकदां नजरचुकीने एका बाटग्या नातलगांच्या घरीं पाणी प्याल्यामुळें बाटून बद्दिष्कृत ठरलेला असतांही भगवानजीनें त्याच्या नातीला आपली सून करून घेण्याचें ठरविलें होते. त्याच सुमाराला अन्टोनिओ'ची बायको जेन ही अन्टोनिओशीं भांडून त्याच्याशीं काडीमोड करून एका पोतुगीज शिपायाचा हात धरून गोव्याकडे निघून गेली असल्यानें अंन्टोनेओला दुसरें लम करावयाचें होते. त्यानें आपल्या अधिकाराच्या जोरावर तानाजीपाशीं गजरेला मागणी घातली व तानाजीच्या खुषी-नाखुषीचा विचार न करतां गजरेला त्याच्या घरां- तून बळजबरीने ओढून नेण्याचा घाट घातला. तानाजीने अगोद्रच शैरवार्ष्ी गजरेची सोयरीक ठरविली असल्यानें त्याला अँन्टोनेिओचा शब्द मानतां येईना. सामोपचारांनीं ही बाब मिटत नाहीं अर्से पाहून अन्टोनिओनें एके दिवशी अर्नाळ्याच्या किेदाराच्या साश्वाने तानाजी व गजरा ह्या दोघांनाही केद करून तुरुंगांत डांबले व तानाजीचा नाना तऱ्हांनी छळ करून त्याला ठार मारून गजरेशीं लग्न केले. ह्या लमनाला भगवानजी व भैरव यांनीं शक्य तेवढा विरोध केला; पण त्या विरोधाला कोण जुमानतो ! उलट त्यामुळें अन्टोनिओ त्यांचा जास्त हाडवेरी बनला व त्यांचा निःपात करण्याच्या उद्योगाला तो लागला. अस्तेर एके दिवशीं पूर्वी सांगितल्याप्रमाणे अन्टोनिओल| हाताशी धरून एका ख्रिस्ती पाद्यानें उभा चुळणें गांव एका रात्रींत बाटविला, त्या वेळीं पुढच्या अनर्थाला भिऊन भगवानजी व भैरव यांनी ताबडतोब तो गांव सोडला. ह्या गोष्टीला आज नऊ वर्षे लोटली होती. ह्या नऊ वर्षाच्या अवधींत सारा चुळणें गांव अन्टो- निओरने ख्रिस्ती पाद्माच्या साह्याने समूळ ख्रिस्ती बनवून सोडला होता. त्या छोकांना काबूंत आणण्यासाठी पोतुंगीजांच्या धमशासन मंडळामार्फत केक दिवस- पर्येत त्या गांवांत एक पाद्री वास्तव्य करून राहिला होता. त्यानें तेथील देवीच्या दवाल्याचें ख्रिस्ती प्रार्थनामांदिर बनवून तेथें धमशास्त्रासाठीं म्हणून लोहत्तंभ, अमिकुंड वगेरे जीं आसुरी साधनें तेव्हां उपयोगांत आणलीं, त्यांचा कार्यभाग संपल्यावर तीं जीं आजवर तेथें नुसतींच पडून होतीं, त्याचा उपयोग करण्याची वेळ पुन्हा प्रा झालो होती. तोच कुलांगार अन्टोनिओ पोतुंगीजांचा एक लष्करी
२९६ पेशवाईतील धर्मसंम्राम
“*“ध्श ५-४ ४४ 2८९ ॥५/॥-५५८/५/५५५ 2 ८-६ शध्टा- 2८५४५४”. “क्ला ५२ २ “> > 2५८ ८०/१०/५५५५»
अधिकारी म्हणून त्या देवीच्या देवाळयासमोर आपल्या लवाजम्यानिशीं उच्चा- सनावर बसला होता व भगवानजी आणि भैरव हे त्याचे हाडवैरी आपल्या परिवारासद्द समोर बंदीवान होऊन ल्या चांडाळासमोर मृत्यूच्या जबड्यांत
उभे होते. भगवानजी व भैरव यांनीं अन्टोनिओ व त्याचे पोर्तुगीज सार्थादार यांच्या
अत्याचारांना भिऊन देशत्याग केल्याला आज नऊ वर्षे लोटलीं होतीं. एवढा दीर्घकाल त्या पितापुत्नांनीं पोतुगीज सत्तेपासून फार दूर अशा महाड तालुक्यांतील कुसगांव नांवाच्या खेड्यांत त्यांची थोडीशी वडिलार्जित वतनदारी होती तेथें काडला होता. तेथल्याच एका अब्रूदार स्वजातीयाच्या अंबिका नांवाच्या सुंदरव तरुण मुलीशी भैरवाचें लम हाऊन आजला पांच सहा वर्षे लोटलीं होतीं. लमनांत भैरव सुमारें तेवोस चोवीस वर्षांचा असून आंबिका पंधरा सोळा वर्षांची होती. कुसगांवांत त्यांनीं एवढ्या थोड्याशा काळांत आपला संसार पुन्हा चांगल्यापैकी थाटला होता. तेथेंच भेरवाचें लम झालें व तेथूनच त्याला मानाजी आंग्ऱ्याच्या पद्रां शिळेदारी मिळाली होती; त्यामुळें त्याचा चुळणें गांवाविषयींचा ओढाही बराच कमी झाला होता; म्हणून त्या पितापुत्रांना वसई प्रांतांतील पोर्तुगीजांच्या अत्याचारांचा विसर पडला होता असें मात्र नाही. स्वतः भगवांनजीनें मुद्दाम पुण्याला जाऊन एकवार आपलों गाऱ्हाणी पेशव्यांच्या कानांवर घातलीं होतीं व चिमाजीअप्पा सिहीसाताच्या पारिपत्यापाठी सागरगडच्या मोहिमेचा बेत ठरवून कोकणांत उतरल्यावर ते माघारे जाईपर्यंतच्या काळांत वसई प्रांतांतील अनेक शिष्ट लोकांनीं एकत्र जमून सवानी मिळून त्यांच्याकडे फिरंग्यांविद्द्ध गाऱ्हाणी नेली. त्या प्रयत्नांत भगवानजीनें चांगलाच पुढाकार घेतला होता. तात्पर्य, चिमाजीअप्पांनीं वसईच्या मोहिमेचे कार्य निकडीनें द्वाती घेण्याला भगवानजी'चे प्रयत्न बरेच कारणीभूत झाले होते, व पेशव्यांनीं हें पुण्यकार्य हाती घेतल्यावर त्यांना वसई प्रांतांतील गडकोट, मारगिरीच्या जागा, ठिकठिकाणचे गुस मार्ग वगेरे माहिती देण्याचे कार्य मालाडकर सरदेसाई, अंताजी रघुनाथ कामळे, खंडूजी भाणकर, गंगाजी नाईक, अणजूरकर वगेरे मंडळींनी स्वखुषीने आपल्या शिरावर घेतलें होतें. त्यांतच त्या सवाच्या सेगनमतानें भगवानजीनही कामगिरीचा योग्य वांटा उचलला होता. त्याच
॥ 'पेशवाईतील पश्चिम दिखिजय' पहा.
चुळर्णे गांवाची कहाणी ९७
द्रम्यान् त्यानें आपला वंशवृक्ष वाढीला कां लागत नाहीं याविषयीं देवषींमार्फत देवधर्मोपा्शी चोकशी केली; तेव्हां त्याला प्रामदेवतेची चूक लागलेली आढळून 'आली. त्याबरोबर त्यानें 'माझ्या मुलाला मुलगा होऊं दे, कौ, त्या मुलाला मी माझ्या गांवच्या देवीच्या पायांवर घालण्यासाठी घेऊन जाईन व पुढें तेथेंच कायमचे वास्तव्य करून देवसेवा करीन' असा नवस बोलून देवापाशी गाऱ्हाणे घातले होतें. नवस केल्यापासून एका वर्षाच्या आंत भगवानजीला नातू झाला. अंबिका पुत्रवती झाली. अर्थात आतां नवस फेडण्याची जबाबदारी भगवानजीच्या शिरा- वर येऊन पडली. त्याच सुमाराला चिमाजीअप्पांनीं बाजीराव पेशव्यांच्या सैमतीनें वसईच्या मोहिमेचे काम निश्चयपूर्वक हाती घेतलें व खंडूजी माणकर, अंताजी रघुनाथ, गंगाजी नाईक वगेरे मंडळींबरोबरच भगवानजीलाही चिमाजी-.. अप्पा च इतर मराठे सरदार यांचा हरएक बाबतींत पाठपुरावा करण्यापार्यी- घडीचीद्दी फुरसत मिळेनाशी झाली. भेरवदेखील मानाजी आंग्ऱ्यांच्या झेंब्या- खालीं ठायी ठायीं शत्रूचे पारिपत्य करण्यासाठीं लढत होताच ! पण मानाजी ऑग्ऱ्याला आपल्या प्रांतांतील बंदोबस्ताचे कामच फार डोईजड होऊन गेल्या- मुळें वसईच्या मोहिमेत पूर्णपणें ल&्य घालण्याला मुळींच अवसर मिळत नव्हता. त्यामुळे भगवानजी व भैरव ह्या पितापुत्रांची गेलीं तीन वर्षे भेटदेखील झालो नव्हती. फार काय, अंबिका वार महिन्यांची गरोदर असतांना एकदां भैरव घरीं आला दवोता, तेव्हांपासून आजवर त्याला आपल्या प्रिय पत्नीचे व नवस- सायासांनी झालेल्या प्रिय पुत्राचे मुखावलळोकन करण्यालाह्दी संधी मिळाली नव्हती. अखेर चिमाजीअप्पांनीं फिरंग्यांच्या पारिपत्याचा प्रश्न पूर्णपणें सोडविण्याच्या निय्धयानें हातीं घेतला. मानाजी आंग्रे कांहीं कारणामुळें रुसला होता, त्याचा रुसवा बाजीराव पेशव्यांच्या मध्यस्थीने काढून त्याला आपल्या पाठीशी घेतले. वाष्टी- वसई प्रांतांत ठायीं ठायी फिरंग्यांवर विजय मिळविण्यांत गुंतून पडळेल्या मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गंगाजी नाईक, अंताजी रघुनाथ, भगवानजी देषापांडे वगरे मराठे वीरांना आपापली कामागिरो निकडीनें पण यषास्वितेने आटोपून वसईला वेढा घालण्यासाठी एकत्र होण्याला पाचारण केलें. तेव्हां त्या निमित्ताने भगवानजी आणि भैरव ह्या पितापुत्रांची भेट झाली व आंबिका आणि तिचा लहानगा भवानजी हीं दोघेही भगवानजीबरोबरच असल्यानें तींद्दो
७०५७ ७
९ट पेशवाईतील धर्मसंप्राम
भैरवाला भेटली. आपल्या जन्मगांवीं जाऊन देवींच्या पायांवर मुलाला घालून नवसाची फेड करावयाची व या उप्पर तेथेंच कायम वास्तव्य करावयाचें, असा भगवानजी'चा फारां दिवसांपू्वीचा मानस हद्ोोता; पण तो सिद्धीला जाण्याला इतका अवकाश लागला. वसईजवळ अनो्याच्या किल्ल्यावर सर्व प्रमुख मराठे वीरांनी होळीच्या सणासाठी जमावयाचे अर्से चिमाजीअप्पा व बाजीराव यांनीं ठरविळें होतें व त्याप्रमाणे सर्वांना आमंत्रणेद्दी गेलीं होतीं. तेवढ्यासाठी बाजीराव पेशवे उत्तर हिंदुस्थानांत जावयाची निकड असूनद्दी मुद्दाम अर्नाळ्याला थांबले होते; पण जो तो माणूस कोणत्याना कोणत्या महत्त्वाच्या कामावर गुंतून पडल्या- मुळें हातची कामगिरी आटोपून सवाना एकत्र होण्याला थोडा अवकाश लागला. विशेषतः मानाजीराव आंप्रे सवांच्या मागाहून आले. मात्र मानाजीराव नक्की येणार व तेही तांतडीनें येणार यांत संशय नव्हता. म्हणूनच भगवानजी आपल्या सुनेला व नातवाला बरोबर घेऊन अगोदर चुळणें गांवीं गेला आणि पाढव्याच्या सणासाठी भैरवाने तिकडे यावें अशी व्यवस्था करून ठेवली. पेशवे व सर्वे मराठे सरदार यांची अ्नाळ्यावर एकत्र भेटण्याची वेळा थोडी पुढें ढकलली गेली. निमंत्रितांनीं आपापल्या मुक्कामावर गुढीपाडव्याचा सण साजरा करून दुसऱ्या दिवशीं अनांळ्याला यावें असें सर्वानुमते ठरलें.
भगवानजी गांवी जाऊन पहातो तों घर जाग्यावर कुठें आहे ! त्याच्या घराच्या मुख्य भागाचे ख्रिस्ती प्रार्थनामंदिर उभारलेले त्याला आढळलें. त्यामुळें त्याला निरुपायास्तव जवळच्या एका शेजाऱ्याच्या घरांत बिऱ्हाड करणें प्रास झालें. इतक्या वर्षोर्नी भगवानजी आपल्या परिवारासह गांवी आला आहे हवे पाहून बहुतेक सर्वे गांवकऱ्यांना समाधान वाटलें. त्याचे चद्दाते अनुयायी जे होते ते तर त्याच्या सभोवार हवां हवां म्हणतां जमा होऊन त्याच्यापाशी आपल्या सुखदुःखाची गाऱ्हाणी सांगू लागलेच; पण मध्यंतरी त्याचा पडता काळ पाहून जे लोक त्याला सोडून त्याचा प्रतिस्पर्धी अन्टोनिओ याला जाऊन मिळाले होते, त्यांतले बहुतेक लोकही आतां पश्चात्तापपूर्वक त्याला चाहूं लागले. अन्टोनिओ व इतर फिरंगी अंमलदार यांनीं सारा गांव जुलुमाने कसा बाटविला, त्यासाठीं गांवांत कसकसे अत्याचार गेल्या नऊ वर्षांत केळे, वगेरे गाऱ्हाणी ऐकतां ऐकतां भगवानजीचे कान किटून गेले.
इतक्यांत भैरवही उद्यां गुढीपाडवा तों आज रामानंदखामींसद्द सकाळीं तेथें
चुळणें गांवाची कहाणी ९९
येऊन दाखल झाला. त्यालादेखील गांवाची ती दुर्दशा झालेली पाहून अत्यंत विषाद वाटला व त्यानें भगवानजीच्या अनुमतीने पुन्हा गावाचे पुढारीपण पत्करून गांवाला फिरेग्यांच्या जाचांतून सोडविण्याचे ठरविलें. याच वेळीं द्दा प्रश्न द्वातीं घेण्यांत त्याचा आणखी एक उद्देश होता. आपल्या सत्पक्षाच्या बाजूनें वसईच्या थर्मसंप्रामांत लढण्याला त्याला गावांतून पूर्ववत शेपांचश्षें उमदे सैनिक सहज मिळण्याजोगे होते. हा प्रयत्न त्याने मानाजी आंग्रे व त्रिमाजीअप्पा यांच्या संमतीनेच आरंभिला होता. त्याची पूर्वतयारी म्हणून गांवांत प्रथम पूर्ववत एकी करावयाची असा त्याचा मानस झेता. एकी करण्यासाठींच त्याला प्रामस्थ पातितांचें प्रथम शुद्धीकरण करावयाचें होते. व तेवढ्याचसाठी रामानंदस्वामी त्या गांवी आले होते. हा त्याचा हेतु कांहीं वाईट नव्हता व तो बहुतेकांना पटलाही. मात्र हद्दी योजना कशी पार पाडावयाची एवढाच काय तो प्रश्न होता, पण भैरव 'आणि भगवानजी यांनीं तो प्रश्नही कसा समाधानकारक रीतीनें सोडावितां येईल, हॅ सर्व गांवकऱ्यांना पटवून दिलें. पेशव्यांनी सर्वे मराठे सरदारांच्या साह्याने फिरंग्यांच्या पारिपत्याचे महत्कार्य शिरावर घेतल्यापासून आजतागायत फिरंग्यांच्या ताब्यांतील वसई-साष्टी भागांतील बहुतेक महत्त्वाची ठाणी मराठ्यांच्या ताब्यांत आलीं होतीं व फक्त वसईचा किछा एवढेंच महत्त्वाचें ठिकाण काय ते फिरग्यांच्या ताब्यांत राहिले होते. तो किल़ादेखील जिंकण्याची मराठयांनी कशी कडेकोट तयारी चालाविळी आहे, हें भगवानजी व भरव यांच्या तोडून ऐकतांच सर्व गांवकऱ्यांना मोठा धीर आला ब ते ह्या महत्त्वाच्या धर्मसंम्रामांत भगवानजी आणि भैरव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना सर्वतोपरी साह्य करण्याला तयार झाले. त्या सर्व मेडळीनें ह्या धर्मसंप्रामाची मुहूर्तमेढ गुडीपाडव्याच्या दिवशीं रोंवण्याचें ठरविलें. फिरंग्यांनी भैरवनाथाचे देवालय व देवीचें देवालय हो भ्रष्ट केळी होती, तीं पुन्हा पावन करून घ्यावयाची व सर्व प्रामस्थांनाही पावन करून घ्यावयाचे असेद्दी ठरले. खुद्द भगवानजीच्या वाड्याचे जं प्रार्थनामादिर बनविण्यांत आले होते. तें तर त्या पितापुत्रांनीं त्याच दिवशीं तेथून उखडून टाकलें. ख्रिस्ताचा कूस वगेरे जे साहित्य तेथें कवेत, तें सारें उचलून बाहेर फॅकून देऊन आंत पंचगव्याचा सडा घाळून तेथें भगवानजीने आपलें वास्तव्य केले. तोंच उद्यां गुढीपाडवा म्हणतांच आज सकाळी मंडपेथ्वराहून तेथल्या मुख्य खित्ती भर्मगुरूचें आज्ञापत्र येऊन धडकळें, स्वतः अँन्टोनिओ आपल्या दोनरें हृत्यारबंद्
१.०० पेरावाइतीळ धर्मसंप्राम
सोनेकांसह तें आज्ञापत्र घेऊन सायंकाळी त्या गांवी आला. त्यानें त्या आज्ञापत्रका- च्या प्रती गांवांत ठिकाठिकाणीं प्रमुख जागी चिकटाविल्या व त्याच आशयाची उभ्या गांवांत दवंडी प्रिटविण्यांत आली. एवढ्याह्या कामासाठी अन्टोनिओ तेथें एवढया कडेकोट तयारीसह कां व कसा आला याचें गांवकऱ्यांना मोठें आश्चर्य वाटलें. कारण भगवानजी व भरव यांचें जरी गुढीपाडव्याच्या दिवशीं गुढी उभारण्याचे व त्याच सुमुहूर्तावर देवींच्या देवालयांत गांवांतील लोकांना पावन करून पुन्हा हिंदु धर्मात समाविष्ट करून घेण्याचे बेत चालले होते ते अत्यंत गुसपणें चालले होते. ही बातमी बाहेर फोडणार नाहीं अशाविषयीं सर्वे गांव- कऱ्यांकडून त्याच देवीच्या व भैरवनाथाच्या देवालयांत शपथा घेवविण्यांत आल्या होत्या. तरीही ती बातमी ताबडतोब बाहेर गेली. ती कशी व केव्ह्वां बाहेर गेलो याची द्वा वेळपर्यंत गांवांत कोणालाही दाद लागली नव्हती; पण बातमी बाहेर गेली एवढें मात्र खरे. म्हणूनच तर गुढीपाडव्याच्या पूर्व दिवशीं जाहीरनामा येऊन धडकला व दवंडी पिटण्यांत आली. तरीही त्या दिवशीं लोकांना-भगवानजी व भैरव यांनाही-त्या जाहीरनाम्याचे जास्त महत्त्व वाटलें नाहीं. पोतुगीज लोकांची हवी दडपशाहीची पद्धत सवांच्या पूर्ण परिचयाची होती. लोक तो जाद्वीरनामा वाचून व दवंडी ऐकून थोडेसे बिचकूं लागले; पण भगवानजीनें त्यावर ताबडतोब रामबाण उपाययोजना केली. त्यानें ताबडतोब दुलभजी मोऱ्याला पेशव्यांचा मुक्काम त्या दिवशीं जंजिरे-अनोळ्यावर होता तिकडे पाठवून गांवांतील शुद्धीकृतांना व जे कोणी लोक हिंदुधर्माप्रमाणे गुढी- पाडव्याचा सण साजरा करतील त्यांना जाहीर अभयपत्र आणण्याप्वी खटपट केली. पण काय असेल तें असो, पाडव्याच्या दिवशीं पहांटेपयंत अभयपत्र कांहीं आलें नाहो; आणि पोर्तुगीजांच्या जाहीरनाम्यानें बिचकून गेलेले लोक तर तज्या पेशव्यांच्या तफेच्या जाहीर अभयपत्राशिवाय निर्भयपणे शुद्धीकरणा- ला व॒ गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याला उभे रहार्णे शक्य नव्हते. अखेर भगवानजी, भेरव व रामानंद यांनीं खासगी रीतीनें एकत्र बसून पुढें काय करावयाचें याविषयीं विशवारविनिमय केला.
रामानंदांनीं सुचविले, “ दुल्ठभजी ज्या अर्थी अजून आला नाहीं, त्याअथी त्याला वाटेंत कांहींतरी दगा-फटका झाला असला पाहिजे.”
“ हो ! मलाही असेच वाटते; पण आतां पुढें काय करावयाचें! ह्या
चुळणें गांवाची कहाणी १०१
बिचकलेल्या लोकांना पुन्हा कसें ताळ्यावर आणावयाचे ! ” भगवानजीनें विचारलें,
“ त्यांना ताळ्यावर आणण्याचा एक उपाय आक्वे.”
“ तो कोणता ! ” भेरवानें विचारलें.
“ पेषवेसरकार आपल्या शुद्धीकरणाच्या चळवळीविरुद्ध नाहींत ह लर आपणां सर्वांना माहीत आहेच. ” रामानंद म्हणाले.
“ होय ” भैरव उद्गारला.
“ झालें तर आणि मलाही त्यांनीं बाटलेल्या हिंदुजनांना पुन्हा शुद्ध करून हिंदु धर्मात घेण्याची निरंतरची परवानगी देऊन ठेविळेली आहे. त्या परवा- नगीच्या आधारावर आपणच आपल्या अधिकारांत पेशवेसरकारांचें अभयपत्र आल्याची दवंडी पिटवू ब जाहीरनामा प्रसिद्ध करुं म्हणजे झालें,” रामानंद म्हणाले. ।
रामानेदांची ही योजना त्या पितापुत्रांना मानवली व ताबडतोब त्या योजने- भ्रमागें अंमळबजावर्णाही झाली. लोकांचा भगवानजी व भैरव यांच्यावर अढळ विश्वास होताच व रामानंद स्वामींच्या ठायींही त्यांची अनन्यसामान्य श्रद्धा होती. त्यांच्यावर त्मा पेशवेसरकारच्या अभयाचा अत्यंत इष्ट असा परिणाम झाला. ताबडतोब लोकांनीं ठायीं ठायीं चिकटविलेले पोर्तुगीजांचे जाहीरनामे जादवीर रीतीनें फाडून पार्यांखालीं तुडविले व पूर्वयोजनेप्रमाणें सूयोदयाला देवी- च्या देवालयासमोर बहुतेक सर्व गांवकरी जमा होऊन तेथें रामानंदस्वामींच्या पुरोहितत्वाखालीं टोलेजंग शुद्धिसमारंम साजरा झाला. तो समारंभ अथात् “जशास तसे' याच न्यायाचा होता. प्रथम एक गाय देवालयासमोर आणण्यांत आली. थोडें पंचगव्य देवालयासमोरच्या तळ्यांत शिंपडण्यांत आलें. नंतर त्या तळ्यांतील पाण्यानें पूर्वी बाटलेल्या सव लोकांनीं स्नान केलें, पूजा केली, देवालय घ देवाल्यापुढील पटांगण अगोदरच गोमयाने सारवून पवित्र करण्यांत आलें होतें. नंतर रामानंदांनीं देवीची पूजा करून तिला समंत्राभिषेक केला, त्यानंतर सर्व लोकांनीं गाईची, देवीची व भगवद्वीतेची पूजा केली आणि त्यांना रामानंदांनीं पंवगव्य आणि देवीचे तीर्थ प्राशन करावयाला दिलें. अगदी लहान मुले व अगदीं वद्ध किंवा आजारी माणसें जीं देवालयापार्शी इतक्या दूरवर येऊं शकली नाहीं, त्यांच्यासाठी घरीं तीर्थोदक पाठविण्यांत भालें. सर्व मंडळीने जातांना
रामानंद म्हणाले.
१०२ वेशवाईतील धर्मसंग्राम
आपल्याबरोबर देवाच्या पवित्र तळ्यांतील एकेक तांब्या पाणी नेऊन तें आपल्या विहिरांत ओतलें. त्यामुळें सर्व विहिरी शुद्ध झाल्या व सर्वाची घरेदारे, कपडालत्ता आणि चीजवस्तु हॉ त्या शुद्धोदकाच्या मार्जनानेंच पावन करून घेण्यांत आर्ली. याप्रमाणें शुद्धीचा विधि आटोपतांच त्या शुद्धीकृत हिंदूंनी आपापल्या घरांवर त्या गुढीपाडव्याच्या दिवशीं गुढ्यातोरणें उभारून तो नवसंवत्सराच्या प्रथम दिवशींचा सण आनेदानें साजरा केला. आपला मायधर्म पुन्हा आपणाला प्राप्त झाला म्हणून त्या गांवकऱ्यांना त्या दिवशीं जो आनद झाला, तो अपूर्व होता. पण ह्या सर्व गोष्टी जितक्या निर्विध्नप्णे पार पडल्या, तितक्ष्या त्या खरोखर निर्विध़् नव्हृत्या. त्या गांवांत स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान यांनीं प्रोरेत होऊन आत्मोद्वारासाठी मनःपूर्वक झटणाऱ्या लोकांचीच बहुतेक संख्या होती हॅ जरी खरे; तरी तेथें मुळींच कोणी देशकंटक -धर्मकंटक-समाजकंटक-प्रामकंटक नव्हता असें मात्र नाहॉ. प्रथमपासूनच अँन्टोनेओच्या उपदव्यापामुळें त्या गांवांत दुफळी उत्पन्न झालो होती व भगवानजी आणि भेरव तेथें बऱ्याच वर्षानंतर पुन्हा आले ते अगदीं नवीन असल्यानें त्यांचाही गांवांत अजून बसावा तसा जम बसला नव्हता. बरे; अँन्टोनेओ आणि भगवानजी-भेरव यांच्या- तील वितुष्टांत अन्टोनेओची बाजू घेऊन वागणारे लोक गांवांत कोणीच नव्हते असें नाहीं. त्यांना भगवानजी व भेरव हे अन्टोनिओचे प्रतिस्पर्धी पुन्ह्या गांवांत रद्दावयाला आलेले पाहून असूया उत्पन्न झाली. भगवानजी व भैरव हे दोघे गांवांतून पळून गेल्यामुळें पोतुगीज अधिकाऱ्यांच्या दृष्टीनें ते गुन्हेगारच होते. शिवाय पातुर्गाजांविरुद्ध पेशव्यांना शास्त्रम्रह्षय करावयाला लावण्यांत भगवानजी प्रामुख्यानें सामील होता हवी गोष्टही आतां त्या भागांत सर्वत्र महशूर झाली होती. अथोत् भगवानजी व भैरव हे पितापुत्र पोतुंगीज सत्तेचे कड्ठे वैरी आहेत याविषयीं वादच नव्हता. अशा वहिमी लोकांना पकडून दिल्यास पोतुर्गाज दरबारांत आपली मोठी चहा होईल व आपणाला मानधन-वैभवाचाही लाभ होईल, अशा आशेनें कोणींतरी गरांवकर्यानें पाडव्याच्याच दिवशी वसईला अंन्टोनिओकडे भगवानजी व स्वामी रामानंद यांच्या चळवळी'ची धर्दी पो्चावेली, त्याबरोबर अँन्टोनिओनें आपल्या वरिष्ट अधिकाऱ्यांना सांगून पाढव्याच्या दिवशीं गुढ्या उभारण्याला व धमातर करण्याला बेदी करण्याचा जाहीरनामा चुळणें गांबांत फडकविण्या'ची तांतडी केली होती; पण त्या जाहीरनाम्यालाही नः
व्चुळणें गांवाची कहाणी १०३
जुमानतां भगवानजी, भैरव व रामानंद यांनीं गांवांत शुद्धिकार्य आरंभिले व गुढया-तोरणें उभी करून त्या गावांतून ख्रिस्ती धर्माचें उच्चाटण केलें, ही बातमीही ताबडतोब अन्टोनिओला पोव्विण्यांत आली. त्यापूर्वीच अन्टोनिओ आपणाबरोबर थोडे शिपायी घेऊन गांवांतील बेंडाळीचा मोड करण्यासाठीं व भगवानजी, भैरव आणि रामानंद यांना शासन करण्यासाठीं वसईच्या किल्लेदारा- च्या हुकुमावरून चुळण्याकडेच यावयाला निघाला होता.त्याला गांवांतील शुद्धि- समारंभाची व सार्वत्रिक ध्वजारोपणाची वार्ता मागोतच कळली. तेव्हां अर्थात् हा झगडा आतां केवळ धार्मिक स्वरूपाचा उरला नसून त्याला राजकीय स्वरूप प्रास झालें आहे अशी अँन्टोनिओची खात्री होऊन पुढें कसें करावयाचें याबद्दल वरिष्ठांची गांठ घेण्यासाठीं तो तसाच माघारा वसईला गेला, व तेथें खलबत होऊन अखेर निर्णय ठरल्याप्रमाणे तो आपणाबरोबर फादर पोर्टो व शंभर हृत्यार- बँंद गोऱ्या सैनिकांची एक तुकडी घेऊन चुळणें गांवी आला. अँन्टोनिओ हा त्या गांवचाच असल्यानें त्याला गांवांतील कोण मनुष्य कसा आहे, कोण आपल्या बाजूचा आहे व कोण भगवानजोच्या बाजूचा आहे हें पूर्णपणें माद्दीत होतें. शिवाय त्याचे हस्तक गांवांत कोणी होते ते त्याला सर्व माहिती पुरावैण्याला सज्ज होतेच. अँन्टोनिओननें गांवांत येतांच प्रथम त्या हस्तकांच्या साह्याने वहिमी व गुन्हेगार लोकांची यादी ठरवून त्यांच्या त्यांच्या घरांवर पहारे बैसविळे व गांवांतील एकंदर रागरंग पाहून शंभर सैनिकांनी कार्यभाग व्हावया- चा नाहीं हें ओळखून वसईहून ताबडतोब आणखी शभर सैनिकांची तुकडी रातोरात मागविली.
हँ जादा सैन्य उजाडण्यापूर्वीच चुळणें गांवीं येऊन पॉचतांच त्या सैन्याकडे गांवांतील बंदोबस्ताचे काम सोंपविण्यांत आलें व नंतर पूर्वीच्या सैनिकांना वद्िमी लोकांना केद करून देवीच्या देवाल्यासमोर धर्मशासनासमोर हजर करण्याची आज्ञा करण्यांत आली. सर्व वहिमी लोकांना केंद करण्यांत आलें, ते केवळ द्राऱ्यासाठीं; पण अन्टोनिओ'चा खरा दांत असा भगवानजी, भैरव, त्याचा स्नेही दुद्ठभजी मोरे व रामानंद्स्वामी यांच्यावर होता. तीं चारद्दी माणसें पेशव्यांचे विश्वासू इस्तक असून त्यांच्याच चिथावणोनें गांव खिस्तीधर्म झुगारून देऊन हिंदूधर्माचा अंगीकार करण्याइतका धीट झाला, हें अन्टोनिओ व फादर पोटो ह्या दोघांनाही माहीत होते. त्यांतद्दी रामानंद स्वार्मीविषयीं अँन्टोनिओ 4१
१०४ पेशवाईतील धर्मसंप्राम
फादर पोटो यांना मनस्वी संताप येण्याचे कारण तेव्हां वसई भागांत शुद्धीची र्चळवळ अतिशय जोमाने चालविण्यांत जे धमंवीर प्रामुख्यानें भाग घेत होते, त्यांत रामानंदस्वामींची प्रामुख्याने गणना होत होती. किंबहुना बाटलेल्या लोकांच्या शुद्धीकरणाचा इतका सोपा मार्ग रामानंदांनींच अलीकडे जारीनें रूढ केला होता. “ज्याची हिंदुधर्मावर श्रद्धा आहे व जो आपणाला हिंदु म्हृणावेतो, तो हिंदु! अशी हिंदुत्वाची सर्वव्यापक व्याख्या त्या काळांत प्रथम रामानंद त्वार्मीनांच ठरविली व त्याप्रमाणें जन्मतः हिंदू असून बाटून ख्रिस्ती झालेल्या लोकांनाच ते शुद्ध करून घेत असें नसून हिंदु होण्याला इच्छिणाऱ्या कोणालाही ते हिंदु करून घेत असत. त्यामुळें कांद्दी पिढ्यांपूर्वाी जे हिंदू मुसलमानांकडून किंवा ख्रिस्ती पाद्मांकडून बाटविळे जाऊन मुसलमान किंवा ख्रिस्ती बनले, पण ज्यांची अज़नद्दी हिंदुधर्म, हिंदु देव व हिंदु चालीरीति यांच्यावरील श्रद्धा कायम होती, त्यांना आपल्या आवडत्या हिंदुधमात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला होता व त्या संधीचा ठिकठिकाणच्या अनेक्र लोकांनीं फायदाही घेतला होता. अज्शा लोकांना त्रास व्हावयाचा तो पोतुगीज अधिकारी व समाज यांच्याकडून. पण चिमाजीअप्पांनीं वसईच्या मोहिमेचे काम हाती घेतल्यापासून आज तीन वषीच्या अवधींत सर्वत्र मराट्यांचाच विजय होऊन पोतुंगीजांची सत्ता संपुष्टांत आल्यामुळें तोही प्रश्न बहुशः मिटल्यासारखा झाला होता. पेतुर्गाजांच्या निष्प्रभ सत्तेला आतां कोणी फारसें भीत नव्हते. शिवाय पेशव्यांच्या वतीने ठिकठिकाणच्या मराठा सरदारांनीं जाद्दीरनामे काढून शुद्धीकृतांच्या रक्षणाची जबाबदारी छत्रपतींच्या सरकारानें आपल्या शिरावर घेतल्याचे जाहीर केलें होतें व “अश्या शुद्धीकृतांना समाजांत कोणीह्दी पतित किंवा बहिष्कृत मानूं नये, त्यांना ज्यांनीं त्यांनी स्वजातीय समजून त्यांच्याशीं रोटी-बेटी-व्यवह्ार करण्याला मुळींच हरकत नाही', अश्या आशयाची आज्ञापत्नेद्दी पेशव्यांकडून जागोजागच्या समस्त त्रह्मवंदांना व बहुजनसमाजाला निघाला होतीं. हिंदुथर्मांचें क्षेत्र त्या प्रांती इतकें सर्वव्यापी व विशाल करण्यांत रामानंदांनींच विशेष पुढाकार घेतला होता. म्हणूनच त्यांच्यावर पोतुंगीजांचा विशेष दांत होता.
पण अँन्टोनिओ'ची सारी खबरदारी रामानंद व दुळभजी या दोघांच्या बाबतींत मात्र साफ फसली. त्याच दिवशीं-पाडव्याच्या सुसुहुर्तावर निर्मळ एथेंद्दी टोले- खंग शुद्धिसमारंभ रामानंदांच्याच द्वातून पार पडावयाचा असल्यानें ते चुळणें येथीळ
च्चुळणें गांवाची कहाणी १०५
शुद्दिकार्य आटोपून ताबडतोब तिकडे निघून गेले होते ब दुलभजीला पूर्व दिवशींच त्या मंडळीनें पेशव्यांकडे पाठविले होते. अंन्टोनिओ आपल्या सैन्यासह गांवीं येऊन पोंचण्यापूर्वींच ते दोघे तेथून निघून गेले असल्यानें ते अचानक बचावले. मात्र ते निघून गेळे हें भगवानजी व भेरव ह्या दोघांखेराज इतर कोणालाही माहीत नसल्यानें ते गांवांतच कोठें तरी असतील अशा समजुतीने अन्टोनिभोने त्यांचा शोध चालविला द्वोता.
दुल्लभजी आतां येईल, मग येईल अशी भगवानजी व भैरव यांनीं पाडव्या- च्या दसऱ्या दिवशीं सकाळपावेतों वाट पाहिली; पण तो कांद्दी आल नाहीं. दु्भजी यावयाचा होता तो अर्थात् बरोबर जरूर तेवढे सेन्य घेऊन यावयाचा होता. सैन्याशिवाय अन्टोनेओशीं टक्कर देणें भगवानजी व भेरव यांना शक्यच नव्हतें. त्यांतूनह्दी त्यांनीं सर्वे गांवकऱ्यांना पाठीशीं घालून अन्टोनिओशीं सामना दिला असता; पण तेवढी तयारी करण्याला त्यांना मोकळीक कोठें होती ! पूर्व- दिवशींच्या सूर्यीस्तापासूनच त्यांच्या घरासभोवार अन्टोनिओच्या सरास्त्र सेन्यानें गराडा दिला होता आणि अन्टोनिओनें इतक्या सफाईनें ती सारी व्यवस्था केली होती कीं, अन्टोनिओ त्याच्या मुळाशीं आहे याची भगवानजी व भैरव यांना परिवारासद्द दुसऱ्या दिवशीं सूर्योदयाच्या सुमाराला केद होऊन देवीच्या देवा. लयासमोर येईपावेतो. दाददेखीळ लागली नाहीं ! पण देवाल्यापा्शीं येतांच त्यांना सर्व गोष्टींचा उलगडा झाला. अन्टोनिओची सूडबुद्धि ह्या अनार्थाच्या मुळाशीं आहे हें त्यांना तेव्हांच कळून आलें. त्याबरोबर त्यांनीं आपल्या जीविता- -ची आशा सोडली.
दरम्यान् अन्टोनिओनें दुदठभजी व रामानंद यांचा तपास चालविला, तेव्हां मात्र भगवानजी व भैरव यांना आपल्या जिवलग साथीदारांपॅकी दोघेजण तरी अजून शत्रूच्या कक्षेबाहेर आहेत त्यांना तरी परमेश्वराने गांवावरीळ संकट निवारण्याची कांद्दीं तजवीज करण्याची शक्ति द्यावी अशी त्या बापलेंकांनीं भग- वंताची मनोमन करुणा भाकठी. आणखी अंमळशानें फादर पोर्टो आला व त्यानें आपणावर दुलूभजीनें हक्का केल्याचें सांगितलें, तें ऐकून त्या बापलेंकांना वाटलें कीं, भगवेताला आपली करुणा आली; दुळूभजी ज्या अर्थी पुन्हा गांवीं आला आहे त्या अर्थी तो शत्रूशी सामना देण्याच्या तयारीनेंच आला असला पाहिजे. पण रात्र अमावास्येची,, ऐन पावसाळ्याचे दिवस, आकाश काळ्याकुट्ट
१०६ पेशवाईतील धर्मसंप्राम
मेघांनीं व्यापून गेलें आहे व त्यामुळें आपण आपलीं बोटें तोंडांत, घातलीं कॉ, डोळ्यांत घातलीं हेदेखील कळण्याची पंचाईत, अशा वेळीं मध्येंच एकदां विदुुल्ता चमकून क्षणभर डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश दिसावा व लगेच दूसऱ्या क्षणाला काळोखाची भीषणता पूर्वीपेक्षा अनेकपटींनीं वाढावी, तशी भगवानजो व भैरव यांच्या आशेची गत झाली. दुल्लभजीरचें नांव ऐकतांच त्यांना धीर आला खरा; पण पुढें काय ? ळर 2 ी
पुढें काय ! तें आपणांला आतां ओघाओघानें कळेलच; पण तो लोहत्तंभ -कॉ ल्याला बांधून आजवर शेंकडों निरपराधो माणसांना जिवंत जाळण्यांत आलें होतें, तें प्रज्वलित अमिकुंड-कॉँ. ज्यांत आजवर केक अभागी जीवांच्या आहुती देण्यांत आल्या होत्या; ती लांकडी माच-कीं आरोपी ठरविण्यांत आलेला अभागी जीव पुरुष किंवा स्त्री कोणोद्दी असला तरी त्या जीवाला निर्लज्जपणे नमन करून ज्या मावर जखडून बांधण्यांत येई व त्य़ाच्या देहांत खिळे ठोकून, देहाला अम्नीचे चटके देऊन नाना प्रकारच्या यंत्रांनी शिरा ताणून, हाडे ठेंचन फक्त जीव जाणार नाही अशा बेताने सतत महिनेच्या महिने, वर्षेच्या वर्षे त्या जीवाचे हवाल हाल करण्यांत येत असत; असल्या साहेत्यानें सजलेल्या त्या यमपुरॉत डाम्बून पडलेल्या त्या असहाय जीवांना दारुण यमयातना व अंती मरण यापेक्षां निराळें पुढे काय दिसणार !
प्रकरण सातवे धमेशासन ! न्टोनिओनें भगवानजी वगैरे मंडळीला ओढून आणण्यासाठी अल्बुककला हुकूम सोडला, तो कांहों अगदीं हळू सोडला नाहीं. तो हुकूम ऐकून तेथें
तारेच्या कुंपणांत डाम्बून ठेवण्यांत आलेले लोक हादरून गेले व सोफिया- बरोबरच्या दोन्ही दाखी कावऱ्याबावऱ्या नजरेनें तिकडे पाहूं लागल्या. त्यांतल्या- त्यांत मेरीच्या मनाला तर ती गोष्ट इतकी लागली कौं, तिच्या नेत्रांत दुःखा उभे राहिले. त्या दुःखाश्रूंनीं डबडबलेल्या दीनवाण्या दृष्टीनें ती त्या चार अभागी बैदीवानांकडे पहात होती. फादर पोटो. आणि सोफिया यांचें तर तिकडे मुळींच लक्ष्य नव्हतें. ती दोघें अगदीं बेफिकीरपणें एकमेकांशीं बोलत होती. असले प्रसंग वारंवार पाहून त्यांचीं अंतःकरणे बधिर झाल्याचा तो परिणाम होता. अन्टोनिओनें दरडावून त्या केद्यांना लाथांबुक्क्यांखालीं तुडवीत आणण्याचा हुकूम अल्बुकर्कला दिला, तरीद्दी अल्घुककंला ते बंदीवान बधेनात म्हणून स्वतः अँन्टोनिओ रागारागाने शिरा ताणीत तिकडे गेला, तेव्हां इकडे सोफिया व फादर पोर्टो यांच्या निराळ्याच गोष्टी चालल्या होत्या.
फादर पोर्टो सोफियाश्ी बोलत होता, तरी त्याची चंचळ नजर लोलुपतेनें मेरीकडे खिळली होती. मेरीर्चे चित्त त्या बेदीवानांच्या भावी दुर्दशेच्या कल्पनाज्वालांत होरपळत होतें. ती फादर पोटोंकडे कशाला पाहील ! पण अँनी मात्र शक्य तेवढी सुरडत मुरकत फादर पोटॉकडे टक लावून उभी होती व फादर पोटो आपणाकडे न पदह्ातां मेरीकडे पहातो म्हणून मत्सरप्रस्ततेनें मनांतल्या मनांत मेरीच्या नांवानें जळफळत होती.
फाद्र पोटोंवें चित्त मेरीकडे वेघलेले आहे असें पाहून सोफिया गालांतल्या गालांत किंचित् हंवून मित्किळपणानें किंचित् ओंठ चावून म्हणाली, “ पोटो ! धर्माधिकाऱ्याची पवित्र कफनी तुमच्या अंगावर चढल्यापासून तुमचा बाहेरचा वेष बदलला तरी तुमचें रंगेल अंत:करण कांहीं बदललें नाही. मधांपासून मी पहातें आहें, मेरीवरून तुमची दृष्टि कांहीं ढळत नाहीं.”
फादर पोर्टो यावर निर्लजपर्णे नुसता हसला व म्हणाला, “ सोफिया ! तूं फार मार्मेक बोलतेस.”
२०८ पेशबाईतील धर्मसंप्राम
“ बरे; मग मेरीला तुमच्या स्वाधीन करण्यासंबंथाची माझी अट तुम्हांला मान्य आह्वेना ! ”
“ कोणती ती ! सेनापाते आणि आल्काकोव्हा--”
“ होय. तीच अट. त्या दोघांचा निःपात अगोदर झाला पाहिजे, मग मेरी तुमचीच आहे.”
“ सोफिया ! हो अट फार भयंकर आहे. आल्काकोव्हाची गोष्ट परती निराळी; त्याला क्ला जगांतून नाहींसा करणें अवघडह्ी नाहीं व धोक्याचेंद्दी नाही. पण सेनापति--”
“ मसणांत ग्रेला तुमचा सेनापांते ! त्याला नाहींसा करणें तुम्हांला एवढे अवघड व धोक्याचे कां वाटते दंच मला समजत नाही.”
“ सोफिया |! तें अवघड नाहीं, पण थोक्याचें आहे. आज आमचें एथलें भवितव्य सेनापति सिल्व्हेरावर सर्वस्वी अवलंबून आहे. त्याळा संकटांत ओढून मी माझ्या देशाशी व धर्माशी द्रोह कसा करूं! ”
“ जळ्ळा तुमचा देश व पेटला तुमचा धर्म ! पोर्टो, देशाच्या व धर्माच्या असल्या थापा तुम्ही माझ्यापाशी तरी मारूं नका. मला सारें माहीत आहे. ज्यानें त्यानें आपल्यापुरते पह्दार्वे, तुमचा देश व तुमचा धर्म तुम्हांला मेरीसारखी अस्मानची परी थोडीच मिळवून देणार आहे! बस्स ! मेरी तुम्हांला पाहिजे असेल तर मीं सांगितली ही तिची किंमत. एखादी दगड-धातूची मुकी देवता प्रसन्न होण्यासाठीं वेळों बारा रेब्यांचाही बळी मागते; तिथे मी एवढ्या दोनच रेब्यांचा बळी घेऊन तुम्हांला प्रसन्न व्हायला तयार आहे हें तुमचें थोर भाग्य समजा.
“ पण सोफिया ! तूं मेरीसाठी मागतेस हें मोल फार जबर आहे.”
“ याचें कारण भेरीच त्या मोलाची आहे. तिच्या मानानें तुम्हांपार्शी मी मागतें हें मोल कांहींच नाहीं. तुम्हांठा माहीत आहे ! पोर्तुगालच्या राजाला किंवा राजपुत्राला नजर म्हणून मेरीला मीं आमच्या व्हाइसरेयांच्या स्वाधीन केली तर माझ्या' नवऱ्याच्या पगाराइतकें दरमहा पेन्शन मळा मिळेल; किंवा आणखी- ही एक नामी बेत माझ्या डोक्यांत आहे. तो मीं अमलांत आणला तर मग तुमचा देश व तुमचा धर्म कुठें रद्दातो तें मी पाहीन. पेशवे हे तुमचे कट्टे हाढ- वेरी ना ! अशा सुंदर नारींची पेशब्यांपार्णी “थांगली चहा असते असें मी ऐकले
धमशासन ! १०९
आहे. त्यांना जर मीं मेरी नजर केली व त्यांजपा्शी एवढें मोल मागितले, तर ते मला दामदुप्पटच काय पण दसपटीनें मिळेल. तुमच्या धर्मासह तुम्हांला वसई- च्या खाडींत बुडवून जमीनदोस्त करण्याची ताकद आज पेशव्यांच्या अंगीं आहे हें तुम्ही ओळखतां'व --?
इतक्यांत अन्टोनिओ त्या चार बंदीवानांना ओढून आणण्यासाठी पुढें गेला शोता तिकडे एकाएकीं बरीच अस्वस्थता माजली व अन्टोनिओ मोठमोठ्याने “खून ! खून ! धांवा ! थांवा ! असें ओरडला. त्याच वेळीं 'हर हर महादेव? ह्वा मराव्यां- चा संग्रामपरवल तेथल्या वातावरणांत एकसमयावच्छेदेंकरून दुमदुमूं लागून त्या धव्वन्याघातानें दशदिशा कॉपेत झाल्या. त्याबरोबर सोफिया'चें संभाषण तेवढ्या- वरच खुंटले व फादर पोटो तसाच लगबगीने तेथून उठून तिकडे गेला. अन्टोनिओ मोठयाने ओरडला, याचें कारण त्या चार बंदीवानांपेकी भेरव नांवाचा बंदीवान संता- पून अन्टोनिओवर तुटून पडला व त्याच वेळीं भगवानजीच्या हांकेसरसे तारेच्या कुंपणांत कोंडून ठेवण्यांत आलेले सर्वे तरुण लोक उठून अन्टोनिओ, त्याचे साथीदार व शिपायी ल्ला सर्वाचा निःपात करावयाला सज झाले. त्यांतल्या कांहीं तरुणांनी त्या बंदीवानांशीं मदोन्मत्तपर्णे लगट करणाऱ्या अल्बुकर्कला उचलून तेथें जवळच चेतलेल्या अमिकुंडांत फेंकून दिलें व अन्टोनिओची देखील तीच दका करण्याचा त्यांचा विचार होता. इतक्यांत अन्टोनेओ भीतीनें ओरडला. त्या ओरडीसरसे सभोंवारचे सारे हत्यारबंद शिपायी अंन्टोनिओच्या रक्षणासाठी आपापली हत्यारें सरसावुन तिकडे धांवून गेले. तोंच फादर पोटोंही तेथे जाऊन पोंचला होता. खवळलेल्या बंदीवान तरुणांनी फादर पोर्टोवरद्दी द्दा केला. पण तेवढ्यांत त्या हत्यारबंद शिपायांनी मध्यें पडून कांद्दीं तरुणांना जखमी केलें. एक दोघांना तेथल्या तेथें गोळ्या घालून ठार मारले, दोघांना अमिकुंडांत लोटलें. याप्रमाणें दूडुकेशाहीच्या जोरावर ती लाट तात्पुरती थोपवुन अंन्टोनिओ आणणि फाद्र पोर्टो यांचा बचाव केला. एवढा अनर्थ तेथें गुदरलेला पाहून सोफिया अत्यंत घाबरली व सर्व मंडळीचा डोळा चुकवून देवालयाच्या मागील बाजूनें हळूच आपल्या दोन दासींसह एकदांची देवालयाच्या आवाराबाहेर पडून आपल्या पालखीकडे गेली.
मात्र जातां जातां मेरी किंचित् आंतल्या गांठीनें पण बाह्यतः भाबडेपणाने सोफियाला म्हणाली, “ मेमसाहेब ! फादर गुन्हेगारांना प्राणदंडाच्या शिक्षा कशा
११९० वेशवाडतील धर्मसंम्राम
देतात हँ आपणाला पाहायचे भाहेना ! मग थोडा वेळ थांबा. ह्या मूठभर बंड- खोरांचें एवढें कसले भय घेऊन बसलां ! एक तर ते निःशस््र आहेत व आपले शिपायी त्यांच्या दुप्पट असन शिवाय सशस्त्र आहेत, आपण जरा थांबा.” .
मेरीच्या ह्या सल्ल्यांतील खॉच जरी सोफियाच्या ध्यानीं आली नाहीं, तरी तिला मेरीचा सा रुचलाही नाही, ती तिकडे कानाडोळा करून आपल्या पालखीच्या भोयांना म्हणाली, “ चला.”
अनीनें मेरीचें बोलणें लक्ष्यपू्वक ऐकले होते. फार काय पण कांहीं क्षणांपूर्वी स्रोफेया व फादर पोर्टो मेरीविषयीं बोलत होतीं तेंही तिने ऐकलें होतें. तों दोघे पोतुगीज भाषेत बोलत होती. व अंनीला पोर्तुगीज भाषा कोण काय बोलते तें चांगले समजण्यापुरती अवगत होती. मेरीला मात्र ती भाषा फारशी अवगत नव्हती. वारंवार सोफिया व फादर पोर्टो यांच्या संभाषणांत मेरीचें नांव निघे, तेवढ्यावरून व फादर पोर्टोच्या पापी दृष्टीवरून मेरीला ती दोघे आपणावेषयींच कांद्दींतरी बोलत आहेत एवढें माचर ओझरते कळलें होते. मेरी स्रोफियाला तेथें रद्दावयाळा आग्रह करीत आहे असे पाहून अनीला चाटले कीं, ती त्या संभाषणावरून फादर पोर्टोची प्रियतमा झोण्यासाठींच तेथें थबकण्याचा प्रयत्न करीत आहे. क्ला संशयाने अनीच्या मत्सरग्रस्ततेला जास्त जोर चढून ती मेरीला हळूच म्हणाली, “ मेरी, आपण सुंदर आहों म्हणून तुला कांद्दी एवढे शेफारून जायला नको. मेमसाहेबांनीं फादरपाशीं तुझ्याबद्दल एवढें मोठें मोल मागेतले, तें वेळीं फादरनीं त्यांना देऊन तुला विकत घेतलें, तरी त्यापासून तुझ्या पद्रात काय शिंपा पडणार आहित तें मला माद्दीत आहे. एवढे मोठे रथी- महारथी तुझ्य़ा प्रीत्यर्थ बळी पडले तरी तूं कांहीं कोणी सेनापतीण होत नाहींस कों वसईची किल्लेदारीण होत नाहींस. त्यांची कुळंबीण म्हणूनच तुला सारा जंन्म काढावा लागणार, त्या कुळंबीणपणासाठों एवढी चढाओढ कशाला दवी ! ” _ अनीच्या बोलण्यांतील रथी-महारथी कोण व मोल कोणतें हे जरी मेरीला नीटसे कळले नाहीं, तरी आपणावर फाद्र पोर्टोची मजीं बद्दाल असल्याचा अनीला मत्सर वाटत आहे एवढें मात्र तिला कळलें. ती त्या रथी-महारथींच्या व मोलाच्या खोल पाण्यांत न शिरतां अनीला म्हणाली, “ अनी, माझी चढा- ओढ नाहीं बरें ! मुळींच चढाओढ नाहीं, माझ्या ऐवजीं तूंच फादरची किंवा अन्टोनेओची कुळंबीण हो; मग तर झालें! ”
धर्मशासन ! १११
यावर पुन्हा अनी मेरीला म्हणाली, माझ्या नशिबी असलें तर मी होईनच. कुळंबीणचकश्ी काय, अन्टोनिओची पदट्टराणीदेखील होईन. तूं तुझ्या सुंदरपणाचा एवढा दिमाख दाखवूं नकोस.”
“ देव तुझे मनोरथ पूर्ण करो.” एवढेंच यावर मेरी उत्तरली व त्या दोन दासींमधी७ तो गूढ विषय तेवढ्यांतच थांबला.
« झेमसाह्देब ! पालखी कोठें न्यावयाची । ” भोयांनीं विचारलें.
“ प्रथम गांवाबाहर तर चला ! तेथून मग आपणांला थेट आपल्या मकाणाला जायचे आहे.” सोफिया म्हणाली. इतक्यांत पालखीच्या पुढच्या भोयाला धाड्कन् शिंक आली. मेरीला शिंकेचा शकून-अपशकून भाहीत होता. ती पालखीच्या अग्रभागी चालत होती; ती आपणाशांच पुटपटली, “ डावी तारी, उजवी मारी, समोर करी घात, पाठीं उभा जगन्नाथ' माझ्या पाठीशी माझा जगन्नाथ उभा आहे; कारण शिक माझ्यापाठीमागें झाली आहे; पण मेमसाहेबांच्या समोर- ची शिक त्यांचा घात बोलते आहे. कांहीं हरकत नाहीं, देवा ! तूं त्या बिचाऱ्या अभागी बंदींचें रक्षण कर म्हणजे झालें.”
ळू ळू ळू
तेथल्या सशस्त्र शिपायांनी आपल्या शास्त्रांच्या जोरावर तेथें तालुरती स्थिरस्थावर केल्यावर व आपणासभोंवार आणि अन्टोनिओच्या सभोवार आपल्या सहस्त्र सैनिकांचा मजबूत संरक्षक कोट निर्माण झाला आहे असें पाहून फादर पोटो तेथल्या सर्व केद्यांना उद्देशून म्हणाला, “ प्रभूच्या अभागी संतानांनो ! आकाशांतील बापाच्या पापी अपत्यांनो ! येशूच्या कळपांतील वेड्या कोकरांनो ! तुम्हा प्रभूची आज्ञा मोडून सेतानाच्या शिकवणीला बळी पडून पाप जोडलें; तुम्हांला हाय ! हाय ! कां कीं, त्या पापाचें प्रायाथित आतां तुम्हांला भोगावे लागणार आहे. प्रभूच्या आज्ञेितुसार स्थापन झालेल्या धर्मशासन- मंडळाचा जाहीरनामा अव्हेरून काल तुम्ही शुद्धीच्या चळवळींत स्वतःस बुडवून घेतलें व॒ घरोघर गुढ्या उभारल्या,” तो भगवानर्जा व भेरव यांच्याकडे बोट दाखवून इतर बैदींना म्हणाला, “ ह्या देशद्रोद्दी व धर्मद्रोद्दी दुरात्म्यांच्या नादानें तुम्ही हें पाप केळे हें मला माहीत आहे. ह्याबद्दल ह्या मुख्य गुन्हेगारांना देहान्त शासन होणें अवश्य आहे. यांच्याप्रमाणेच तो दुहभजी व तो रामानंद यांनाही पकडून आणून देह्वान्त शासन देण्यांत येईल.---”
११२ पेशवाईतील धर्मसंभ्राम
इतक्यांत भगवानजीनें आवेशानें विचारले, “ साहेबड्या ! किरिस्तांव भटुर्ज्या ! जरा जीभ आंवरून बोल. तूं आम्हांला ठार मारणार तर खुशाल ठार मार; पण शासन करण्याचा आव आणि नकोस. तुला जर शास्ता म्हणावयाचे तर जगांतील प्रत्येक खुनी माणसाला, हकनाहक जीवांना देश करून ठार करणाऱ्या सर्पव्याघ्रादि हिं पशूंनाही शास्ते म्हणावें लागेल, पाजी माणसा ! आम्हांला देशद्रोही म्हणतोस? तो आम्हीं देशाचा व धर्माचा द्रोह काय केला तें दाखवून दे; तरच तूं खरा शास्ता शोभशील.”
फादर पोटो एखाद्या निर्ढावलेल्या बेरडाप्रमाणें शांत वृत्तीनें म्हणाला, “ तुम्ही थ्मानें ख्रिस्ती असून हिंदूंच्या शुद्धिसंघटणाच्या चळवळींत पुढाकार घेऊन व गुढीपाडव्याचा हिंदूंचा सण पाळून आपल्या धर्माविरुद्ध आचरण केलें आहे; हा तुम्हीं धर्मद्रोह्ह केला. त्याम्रमार्णेच ह्या देशांतील पोर्तुगीजांच्या सार्वभोम सत्तेचा पाडाव करण्यासाठीं चालून आलेल्या मराठ्यांचा पक्ष स्वीकारून एथल्या ख्रिस्ती प्रजेला बंडाला प्रोत्साहन देऊन देशद्रोद्द केला आहे.”
“ खासे ! “याळाच चोरांच्या उलव्या बॉम्बा' म्हणतात त्या ! आम्ही ख्रिस्ती ! म्हणे तुम्ही खिस्ती ! आम्ही ख्रिस्ती कसे ! ” भगवानजीनें विचारलें.
मध्येंच अन्टोनिओ उत्तरला, “ जसे हे इतर लोक खिस्ती, तसाच तूही ख्रिस्ती.”
« बेशरम, तुला असें बोलतांना कांहीं लाज वाटाबयाला हृवी ! तुझ्या- सारखा एक कुलांगार आमच्या गांवांत उत्पन्न झाला; पण त्या एकानेंच साऱ्या गांवाची दैना उडवून दिली.” भगवानजी म्हणाला.
“ मिठाचा एकच खडा असला तरी तो इंडाभर दूध नासूं शकतो.” भैरव म्हणाला.
« पहा, पोर्टोसाहेब हें पहा ! तुम्ही पोतुगीज ह्या देशाचे राज्यकर्ते, तुमच्याशी मी राजनिष्ठेने वागतो व इमानदारीने आपला धर्म पाळतो, म्हणून मला ह्या देशद्रोही-धर्मद्रोद्दी चांडाळांकडून अशी विटंबना सहन करावी लागते व ती आपणांसारख्या धर्माधिकाऱ्यांसमोर ! ” अन्टोनिओ म्हणाला.
“ पुन्हा तॅंच ! कुळबुडन्या-घरबुडव्या-गांवबुडव्या-देशबुडव्या, कुलकलंका ! 'कोणालारे पुनः पुन्हा देशद्रोद्दी व थमंद्रोह्ी म्हणतोस ! तुझी अवलाद एखाद्या फिरंगडब्याची म्हणावी, तर त्या माउलीच्या नर्कात पडावें लागेल, म्हणूनच केवळ
धर्मशासन ! ११२
क ०००५. केकिव्देळीव्ये -&*,/७ ७०” ..०५०.४० ७.४७... ७७४७७ ८४१४७५१७५७ ४.५. “४ “५४१.” “७ “०
“४.५५... /% “४.७ ७७.४७ ./7१_/४७ _/४0७ “के » ४७.
७-०”
तसे,म्हणावयाचें नाहीं. बाकी, असले खोडसाळपणाचे अथशब्द आमच्यासारख्यांना बेसुवतखोरपणें वापरणारा मतुष्य-पण तो मनुष्य तरी कसला ! पशुच तो !-तो फिरग्यांच्या कमअस्सळ अवलादीचाच असला प्राहिजे.” भगवानजी गर्जून म्हणाला.
“ ऐका ! पोटोसाहेब ऐका ! हो शिवी आपणाला आहे बरें ! हा अहेर आपणाला आहे.” अन्टोनिओ उद्गारला. अन्टोनिओच्या ह्या उद्गारांत फार खोळ असा सत्यार्थ भरलेला होता. फादर पोर्टोचें जन्मस्थान खरोखरच असे संशयित होतें. संशयित तरी कसले ! फादर पोर्टो ह्या खरोखरच मंडपेश्वराच्या एका धर्मा- ्यक्षाचा दासीपुत्र होता. आठां, तो दासीपुत्र झाला तरी एवढ्या बड्या माणसाचा दासीपुत्न असल्यानें त्याची जन्मापासूनच पाक जातकुळींच्या पोतुगीज लोकांत गणना होऊं लागली होती. पोटों वयाने बीस वषांचा झाला नाही, तोंच बापाच्या बशिल्यानेंच त्याला लुर्ड बुथेलो-सोफियाचा शेवटचा पति याच्या अमदानींत ठाण्याच्या किल्ल्यावर मोठी मानाची सरकारी नोकरी मिळाली. पुढे थोड्याच दिवसांत तो सोफियांच्या प्रेमपा्यांत सांपडला किंवा सोफिया त्याच्या प्रेमपाद्यांत सांपडली असें म्हणावे पाहिजे तर; व सोफियाच्या वशिल्यानें त्यानें प्रथम ठाण्याच्या धर्माधिकाऱ्याची जागा पटकावली. त्याच्या बापानें त्याचें पोर्टा हें नांवदेखील आपला हा मुलगा भविष्यकाळीं मेडपेथ्वराचा धर्माध्यक्ष होईल ह्या आशेने मंडपेश्वरच्या देवा- लयाचें प्रथम ख्रिस्ती प्रा्थनामंदिर बनविणारा फादर अन्टोनेओ पोर्ट याचेंच ठेवलें होतें. आपला हा पुत्र पोर्टो, पूर्वीच्या अन्टोनिओ पोटोप्रमाणें किंबहुना त्याच्याहूनदी कांकणभर सरस असा धर्माभिमानी निपजेळ व तो वसई-साष्टी प्रांतांतील झाडून साऱ्या हिं देवाल्यांचीं ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे बनवून एकजात सारी रयत ख्रिस्ती करून सोडील असा पोर्टोच्या बापाला भरंवसा होता. तो भरंवसा अगदी अस्थानी होता अशांतली गोष्ट नाहीं. मराठ्यांनी वसईचा धर्मसंम्राम हळुइळ उभारण्याला ब पोर्टो हा मंडपेश्वरचा धर्माध्यक्ष व्हावयाला एक गांठ पडल्यामुळें पो्टोला धर्मप्रसाराचें काम सनावर घेण्याला भरपूर सवड मिळाली नव्हती. तरीही त्यानें आपल्या अमदानीचा प्रारंभ मोठ्या जोरांत आवेश्यांत केला होता. मराठ्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले तेव्हां ठाण्याच्या किल्ल्याचे बांधकास पुरे झालें नव्हतें. त्या धर्मावर मराठे अचुक घाव घालतील हें ओळखून लुई बुथलेनं त्या किल्ल्याचे बांधकाम तांतडीने पुरे करण्याचें योजिले; पग एवडे भ्र्वंड कम पुरें करण्याला पुरेसे मजूर कोठून मिळवावे ही त्याला पंचाईत पडली.
4
११४ पेशवाईतील धर्मसंप्राम
॥....7.7202421021 02९0-07 ५: :2-*0/८५/४५-५४०५४/४0॥४४ ४ 2५०/-५५५-५८५॥५५५/५५-/-८-५५ ८९-८५: ८८८४८५४0८४ १९४८ “८८ ८-८...“
ती त्याची अडचण फादर पोर्टोनें दूर केली. त्यानें त्या भागांतील लोकांना सप्तीनें 'बाटावयाला तरी तयार व्हा किंवा किल्ल्याच्या कामावर वेठीला तरी चचला' असा पॅच घातला व त्याची सर्रास अंमलबजावणी सुरू केली. त्या वेळो थोडे लोक बाटले, त्यांना नंतर 'तुम्ही खिस्ती आहां; हें राज्य तुमचें आहे; मराठ्यांनी तुमच्या राज्यावर संकट ओढवून आणलें आहे तें निवारण करण्या- साठीं तुम्ही आपल्या प्राणांची पर्वा न करितां झटले पाहिजे' असें सांगून वेठीला धरलें. जे लोक बाटण्याचें टाळून वेठीला तयार झाले, त्यांना तसें वेठीला धरलें. आणि जे लोक दोन्ही गोष्टींना तयार होईनात त्यांना किल्ल्याच्या बांधकामात 'जिवत गाडण्यांत आलें.
फादर पोर्टोला सोफियाच्या वशिल्याने पुढें मंडपेश्वरच्या थर्माध्यक्षाची जागा मिळण्याचे आणखी एक नाजुक कारण या ठिकाणीं नमूद करून ठेवणें अस्थानी होणार नाहीं. बुथेलो'ची धर्मपत्नी या नात्यानें बुथेलळोचा संसार करतांनाच सोफिया- चे मन रोबर्टसन नांवाच्या एका इंग्रज गोळंदाजावर बसल्याचे पूर्वीच नमूद करण्यांत आले आहे. रांबर्टसन हा ख्रिस्तीच खरा; पण मिन्न व विरोधी अशा “प्रोटेस्टंट' पंथाचा असल्यानें तो जेव्हां सोफियाच्या फंदांत पडल्यामुळें गुन्हेगार ठरला तेव्हां त्याला सक्तीनें रोमन कॅथोलिक पंथाची दीक्षा देण्याचा हुकूम फादर 'पोर्टोने धर्माधिकारी या नात्यानें सोडला. रोबर्टसनचा प्रॉटेस्टंट पंथावर दढ- विश्वास्र असल्यानें 'मी मरेन पण धर्म सोडणार नाहीं. असा दवका त्यानें धारेला. तेव्हां सोफियाने त्या आपल्या प्रियकराला वांचविण्यासाठीं फादर पोर्टोची मन- धरणी केली, त्याबद्दल त्याला पाहिजे असलेली मंडपेश्वराच्या मुख्य धर्माधिकाऱ्या- ची जागाही आपल्या खटपटीनें मिळवून दिली, व त्यामुळें रॉबर्टसनवर धर्मातरा- चा जुलूम न होतां त्याला नुसती हृद्दपारीची शिक्षा झाली. अँन्टोनिओपाशीं बोलतांना "फादर पोर्टाला मींच फादर केला आहे' असें जें सोफिया ठांसून उद्गारली, त्यांतलें इंगेत ६.
असो. भगवानजी जो 'पोतुंगीजांची कमअस्सल अवलाद' असें रागाच्या सपाट्यांत बोलून गेला, तो सहज उपरोधाने बोळून गेला. त्याला खरोखर पाहूं गेल्या, फादर पोर्टोचे जन्मरहस्य माहीत नव्हते. तें फक्त अन्टोनिओला माहीत झालें होते. अन्टोनिओनें त्या माहितीचा ऐन वेळीं भगवानजी वगेरे संडळीविरुद्ध फाद्र पोर्टोला चेताविण्यासाठीं प्रसंगावधान राखून उपयोग केला.
धर्मशासन ! ११६
'फादर पोटोला भगवानजीचे ते शब्द वर्मी झोंबले. त्यानें मनांतून चिडून संतार्पाने आठ 'ावृुन, पण बाह्यात्कारी शांतपणाचा आव आणून भगवानजीला म्हटलें, « कमनशिबी म्हाताऱ्या ! तुला तुझ्या आयुष्याच्या अखेरच्या घटकेला काय पाहिजे तें बोलण्याला मुभा आहे. कां की, कोणाही अपराध्याला अतस वासनेने मरूं द्यावयाचें नाहीं ह्या धर्मदंड पाळणे महा अवश्य आहे.”
“ अहारे बेरडा ! हाच तुझा न्याय ! हेंच तुझें धमशासन ! पण तुला तरी दोष देण्यांत काय अथे आहे! ” भगवानजी अन्टोनिओकडे वळून कडकडा दांत चावीत व आपले देखलाबद्ध दोन्ही हात-कारण नुसता अंगुलिनिदेंश त्याला करावयाचा असतांही हात मोकळा नसल्यानें तो आपले दोन्ही हात अन्टोनिओ- कडे दाखवून उद्गारला, “ आमच्यांतच असले कऱ्हाडीचे दांडे निपजले, तिथे इतरांना काय बोल लावावयाचा ! गुलामा ! आपला गांव बुडविलास, धम बुडविलास, देश बुडविलास, सरदारकी व एक चवचल पोर यांचा लाभ करून घेण्यासाठीं तूं आपल्या गांवावर, देशावर-धमावर निखारा ठेवून मोऱ्यांच्या- अस्सल मराठांच्या-जातकुळीला बद्च लावलास ! तुला सरदारकी मिळवा- वयाची होती, सुंदर बायको मिळवावयाची होती, तर मराठशाद्वीच्या उद्योगात तुझ्या मःमकीळा काय थोडाथोडका वाव होता ! मराठ्यांच्या अस्सल जात- कुळींत संदर बायकांना काय दु"्काळ होता ! आणि एवढें सर्वे करून पुन्हा देशासाठी व धर्मासाठी मरणाच्या मोलाने झटणाऱ्या आम्हांला तूं देशद्रोईी व धमेद्रोद्दी म्हणतोस ! ”
“ संपले तुझे बोळून ! तुला तुझ्यावरील आरोपांविषयी आणखी कांद्दी सांगावयाचें आहे काय ! आपल्यावरील आरोपांची नाशाबिती करणारा कांही साक्षीपुरावा द्यावयाचा आहे काय! व कां का, अपराध्याला शक्य तेवढया उपायांनी आपला बचाव करण्याची साधे द्यावा असा धर्मदूंड पाळणे हवे माज्ञें कर्तव्य आहे.” फादर पोटो पूर्ववत् शांतपणे म्हणाला.
“ तुझा न्याय व तुझा धर्म मळा माहीत आहे. द्वा लोहस्तंभ, हे धडाडलेलें अमिक्कुड आणि आमचा बळी घेण्यासाठीं तुला झालेली घाई दवी तुझ्या न्याया- ची व धमाची साक्ष देत आहेत. कसायाच्या सुरीखालीं सांपडलेला मुका जीव कसायापार्शी न्याय मागणार काय व त्याजा न्याय मिळणार काय!”
८ झालें ] आटोपले ” फादर पोटोने गेतीर् व निश्रयी स्वरांत विवारळें.
११६ पेशवाह्दर्ताळ धर्मसंप्राम
अ आ्न - £-- ८५८५-४८ पधश १ > ८ ८-५ 72 2 -२ ८५.८५” शा. ४४८५५ ---८८/५८५--८४५५-५५४५४१/८ ५ “५५५५८५५८५५
यावर भगवानजी कांद्दीं बोलला नाहीं. फादर पोर्टा क्षणभर थांब्रन पुन्हा म्हणाला, “« ठोक आहे. भगवानजी ! संनाताच्या मगरमिठींत सांपडलल्या अभागी कोकरा ! तू प्रभूच्या धर्माविरुद्ध आचरण केलेस व इतरांना करावयाला भाग पाडलेस, हा तूं धर्मदोह केलास. तू प्रभू येशूच्या कृपेनें ह्या देशावर राज्य करणाऱ्या आम्हां राज्यकर्त्याविरुद्ध मराठ्यांना फितूर हाऊन राजद्रोद्द केलास. ह्या दोन भयंकर अपराधांबद्दल तुला आतां शासन करणे हें न्यायासनाचें कर्तव्य आहे. कां कॉ, तुला तुझ्यावरील आरोपांचे निरसन करण्याची संधि न्यायासनाने दिली असतांददी त् आपली [नदोषता सिद्ध करूं शाकला नाहींस. या अपराधाबहळ तुला न्याया. सनाकडून असमिकुंडांत लोटून जाळण्याची शिक्षा देण्यांत येत आहे.”
फादर पार्टोच्या तोंडून त्या भयंकर शिक्षेचा उच्चार होतांच अन्टोनिओच्या अतःकरणांत आनदाच्या उकळ्या फुटूं लागल्या. त्याच्या हत्यारबंद शिपायांना दुःख किंवा आनंद कांद्दींच वाटलें नाद्दी.' कारण असले प्रसंग रोजच्या रोज पाडून त्यांची दाळ मेली हाती व अंतःकरणे बधिर झालीं हातीं. ते शिक्षेची अंमल- बजावणी करण्यासाठीं पुढे सरसावून अँन्टोनिओच्या आज्ञिची वाट पाहूं लागले. इतर मंडळीला मात्र ती भयेकर शिक्षा ऐकून अत्यंत हळहळ वाटलो. भेरव व अंबिका यांच्या नेत्रांतून तर ढळढळां अश्रवधारा वाहूं लागल्या. आपली आईबापें रडूं लागलीं ह पाहून लहानग्या भवानजीनें हंबरडा फोडला. मात्र झाला तो प्रकार अपेक्षितच असल्यामुळें कोणाला त्याविषयी आश्चर्य वाटले नाहो.
भरव आपले शंखलाबद्ध हात फादर पोटोंसमोर जोडून उद्गारला, “ साहेब ! आपण म्हणतां ते सारे अपराध एकटया माझ्या हातून घडले आहेत. माझ्या बाबांचा त्यांत कोणत्याही प्रकारचा संबंध नाहो. ते पूण निदोषी आहेत. यास्तव आपण त्यांना सोडून द्या व प्राणदूंडाची शिक्षा मला करा.”
इतक्यांत भगवानजी डोळे वटारून भरवाकडे वळन उद्गारला, “ खबरदार ! भैरव ! अस्या अधमां, पापी चांडाळांसमोर हात जोडण्याळा तुला लाज नाही वाटत ? तुला माझ्या ग.याची शपथ आहे. तूं माझ्या रक्ताचा असशील, तुझ्या आईच्या त्या माउलीच्या पातित्रत्यावर तुय्मा विश्वास असेल,तर तं अशा चांडाळांना ज्यांनीं आपल्या देवधमर्चिं व देशाचे वाटाळे केले, ज्यांनी आज इतकीं वर्षे आपल्या भरीब हिंदू बांधवांना त्राहि भगवान् करून सोडलें,अशा सेतानांना हात जोडूं नकोस; त्यांच्यासमोर क्रोणत्याही कारणासाठी मान वांकवं नकोस. आपण सर्व मराग्यांनीं
बर्मशासन ! ११७
अ“ “00 शशश शी ष्टी ण ळू थ्ट्प्श > मट 0८ "> ----/- ५५५४७०५४८८ - ४४-0४ शी टश टश ४नकक्न्न्टकशीशीच अीशफशॅफशधशीश ऐश टीच
कापल्या देशावरून. व आपल्या धर्मावरून आपल्या जीवनसर्चेस्वाची कुरवंडी करून ह्या धमसंग्रामांत उडी घेतली आहे. माझ किंवा मरु, पण माघार घेणार नाहीं व मान वांकविणार नाह्दीं ह्या बाण्याने ह्या धर्मसंम्राम खेळेल तोच अस्सल जातकुळीचा मराठा; बाकीचे सारे कमअस्सल ! आज आपण उन आहा ही- देखील रणभूमीच आहे. ह्या रणभूमीवर मी बळी पडलो तर स्वर्गाचे महाद्वार मला मोकळे आहे. मला त्याबद्दल यत्किंचित खेद् वाटत नाहदी; यत्किचित भय
चाटत नाही. माझ्यासाठी तूं कष्टी होऊ नकोस, आपल्या ब्रीदाला ब्च लावूं नकोस. माझी तर काय कथा, माझ्यासारखाच प्रसंग तुझ्यावर व तुझ्या बायको- मुलांवर आला तरीदेखील तूं न डगमगतां देशासाठी, धर्मासाठी व स्वतःच्या ब्रीदासाठी हसत-खेळत यातना भोगल्या पाहिजेत. जो प्रसंग या क्षणाला माझ्या- वर कोसळला आहे, तोच पुढच्या क्षणाला तुम्हां सवांवर आहे, हे उघड उघड दिसत आहे. दुृंवीला आमची सेवा मानवली नाही-पण देवीला तरी कां दोष द्यावा! आम्ही आमचे क्तेब्य करतां करतां आमच्या मायभूमीत-आमच्या ग्रामदेवतेच्या चरणांपा्शी इहलोकची यात्रा आटोपीत आहों, ही तरी त्या देवीची आपणावर केवढी कृपा ! मरण कोणाला चुकले आहे ! जन्माला आलेला प्राणी आज ना उद्यां मरावयाचाच. त॑ मरण अशा गोरवानें आपणांला आले, तर आपल्या आयुष्याचे सोने झालें. सारा गांव म्हृणेळ व॒ धनीद्दी म्हणतील कॉ, शाबास ! भगवानजी मोऱ्याचा उभा वंश देशाकारणे-देवाकारणे-धमोकारणे धारतीर्थी मरून अजरामर झाला. आतां वसईच्या घर्मसंप्रामांत आपला विजय होऊन आपल्या शात्रंचे समूळ निर्दालन झालेलें पहावयास आम्ही जगली असतों तर फार बर॑झालें असतें; पण तेवढी आमची पुण्याई नाही. परमेश्वर ! परमेश्वर ! ” असं म्हणून भगवानजीनें समोरच्या देवीला हात जोडले. त्याच्या- च्यानें पुढें बोलवेंना. त्याचा कंठ दाटून आला व चर्या गंभीर झाली. बोलतां बोलतां तो मधून मधून एकसारखा भरव, अंबिका व भवानजी यांच्याकडे स्नेहाद्र दृष्टीने पहात होता; तोही त्याच्याकडे पद्यात होती
अन्टोनिओनें आतुरतेने फादर पोर्टोला विचारलें, “ साहेब ! शिक्षेची अंमल- बजावणी करावयाची ना! उगाच उशीर नको.”
“ हो ! करावयाची.” असें उत्तर देऊन फादर पोर्टो लगेच भैरवाकडे वळला 'ब म्हणाला, “ भैरव ! एकाच्या अपराधाबद्दल दुसऱ्याला शासन करावें अशी
११८ पेशवाईतील धर्मसंप्राम
- -२५ ५८१८ / 7८-70
टच पा शकय.
आमच्या प्रभूची आज्ञा नाही. भगवानजी अपराधी ठरला व त्याला शासन झाले, आतां तुझा न्याय करावयाचा---”
इतक्यांत अन्टोनिओचे शिपाई भगवानजीला अभिकुंडाकड ओठून नेऊं लागले, त्याबरोबर अंबिका व भवानजी यांनीं आकान्त मांडला. त्या गोंगाटासुळें फादर पोटोंच्या भाषणाला अंमळ अडथळा झाला. शिपाई भगवानजीला ओढून नेऊ लागले तेव्हां त्यानें जरादेखील विरोध केला नाही. त्याने आपल्या परिवाराकडे पाहून 'येतों बरें !' एवढे दोनच शब्द मोठया कष्टाने उच्चारले. त्या वेळीं इतर ळोक दंगा करतील तर त्यांच्या सभोंवारचे शिपायी आपलीं शस्त्रें सरसावून सावधागेरीने उभे होते व दोन शिपायांनी भैरवाला जागच्या जागीं घट्ट आंवळून धारेले होते. लगेच शिपायांनी भगवानजीला त्या धडाडलेल्या अमिकुंडांत लोटून दले. भैरव व अंबिका यांनीं डोळे मिट्टन घेतले. भगवानजी “आजोबा ! आजोबा !' असा हंबरडा फोडीत पुढें जाऊं लागला, तों पायांतील शेखलांत. अडखळून धाडकन खालीं पडला. एका शिपायाने त्याला मार्गे ओढले. गोगाट होतो म्हणून फादर पोटो शिपायांवर कावूं लागला. तेव्हां त्यांनी अंबिका व भवानजी यांना दरडावून गप्प केले. आमिकुंडांतील आगीच्या डोंबांत भगवानजीचा देहू स्वालामय होऊन दिसेनासा झाला !
प्रकरण आठवें
ह्र | ह्र |) महादेव 8। स् क्यांतता झाल्यावर फादर पोटो पुन्हा भैरवबाकडे वळला व म्हणाला, “ भेरव ! तूं तर अगोदरच सर्व अपराध कबूल केले आहेस; तेव्हां पुराव्या- ची गरजच नाहीं. तेव्हां तुझ्या अपराधाबद्दल न्यायासन तुला लोहर्स्तभाशीं वांधून जाळण्याची शिक्षा देत आहे.”
ही शिक्षा कानीं पडतांच भैरवानें एक दोर्घ उसासा सोडला ! अंबिका त्याच क्षणीं त्या शुंखलाबद्ध पायांनी अडखळत पुढें येऊन फादर पोर्टोच्या पायांवर लोटांगण घालून उद्गारली, “ नका हो नका ! त्यांना एवढी कठोर शिक्षा देऊं नका. त्यांच्या ऐवजीं मला ती शिक्षा द्या; मी ती भोगण्याला आनंदार्ने तयार आहें. माझ्या ल्ला कोवळ्या अर्भकाकडे तरी पहा!”
अंबिकेचा टाहो खरोखरच पाषाणालाही पाझर फोडणारा होता. पण त्या दोघां पाषाणह्ृदयी माणसांच्या मनावर त्याचा काय परिणाम होणार ! फादर पोर्टो अगदीं शांतपणानें म्हणाला, “ बाई ! असा शोक करूं नकोस, असा धीर सोडूं नकोस. तुझ्यासभोंवार व तुझ्या पतीच्या सभोंवार निराशेचा निबिड अंधार पसरलेला आहे हो गोष्ट जरो खरी, तरी मला त्या अंधारांतह्ी प्रकाश दिसत आहे. कां कीं, मी प्रभूचा एकनिष्ट सेवक आहे. तो आकाशांतील बाप आपल्या निष्ठावंत लेंकरांवर कधांच निष्ठुर होत नाहीं. जे कोणी त्याला भजतात, त्यांच्या- विषयीं त्याच्या अंतःकरणांत सदैव दयेचा ओलावा असतो. कां कीं, तो परम- दयाळु व परम सामर्थ्यवान् आहे.”
“ मृग सांगा, मला सांगा ! मीं काय केले म्हणजे तो प्रभ आम्हांला प्रसन्न होईल ! मीं काय केलें म्हणजे तो तुमचा आक्राशांतील बाप आम्हांला आपली लेंकरें मानून आमचें संकट निवारण करील ! ” आंबिक्रेनें आातुरतेनें फादर पोर्टो- समोर गुडधे टेकून त्याला दोन्ही हात जोडून काकुळतीला येऊन विचारलें,
फादर पार्टे आकाशाकडे पाहून दोन्ही हात जोडून क्षणभर डोळे मिटून विचारे केल्यावर म्हणाल!, “ मला प्रकाश दिसतो आहे; पण अभागी जिये !
तुला तो दिसत नाहीं; तुझ्या सासऱ्यालाही तो [दैसला नाहीं व तुझ्या नवऱ्यालाही ती दिसणार नाहीं. कां कीं, तुमची त्या प्रभच्या परम कृपाळपणावर श्रद्धा नाही. हे.
१२० फेशबाईतीळ धर्मसंग्राम
अल ८पप्टट“- 2 टी-श४८्कोण फशरशएशीरशधिशीश ४ टीषशणह पी ए0 शी शशश ४४शशककटाकहीशाल -पशध्लोशणश णा 0001 ल>-. --८५-४५--५-५५४-५५४७ ४४ टका
आकाशांतील बापा ! कनवाळू हो; कनवाळ हो ! ह्या न्यायासनावर उभा राहून ह्या अज्ञानांधकारांत बुडून गेलेल्या वेड्या कोंकरांना प्रकाश दाखव. अश्रद्धेच्या डोहांत बुडणाऱ्या ह्या अजाण लेकरांना हात देऊन त्यांचें तारण कर. माझ्या अंतःकरणांत उभा राहून तू ह्या जीवांवर दया करू पहात आहेस, त्याप्रमाणेच ह्या दोघां स्त्रीपुरुषांना त्या देला पात्र ठरू दे!” असें म्हणन फादर पोर्टोमें पुन्हा डोळे मिट्रून घेतले,
फादर पोर्टोच्या भाषणाने भरव, अंबिका व तेथले इतर बंदी यांच्या अंतः- करणांत आशेचा उद्य झाला; तेव्हांच अन्टोनिओच्या अंतःकरणांत आशेचा अंधार पडूं लागला. फादर पोटोला आपणांबिषयीं दया उत्पन्न होत आहे या विषयांची भैरव, अंबिका वगैरे मंडळांची ती आशा होती, तर हा पाद्री आतां दयेची अस्थानीं खैरात करून आपल्या हाडवैऱ्याला जिवंत ठेवणार असें पाहून अन्टोनिओची जी आपल्या प्रतिस्पध्यांचें निर्मूलन आपल्या डोळ्यांसमोर झालेलें पद्दाण्याची आशा, त्या आशेची निराशा झाली होती, फादर पोर्टोची ही कृपाळु वात्ते भशीच कायम टिकून सर्वोचा बचाव व्हावा म्हणून भैरव, अंबिका वगेरे सवे संडळी मनांतून परमेश्वराची करुणा भाकीत होती,-ख्रिस्त व ती देवी यांना सारख्याच पूज्य भावाने आळवीत होती; तर अन्टोनओ मनांतल्या मनांत जळफळून बोलत होता, 'छे ! असे होतां उपयोगीं नाहीं. फादर पोटोला कांहींद्दी करून चिडावेळेंच पाहजे.